शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बचत गट महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करतात : शालिनी विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 19:07 IST

महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचत गट हे महत्वाचे साधन असून, बचत गटाच्या माध्यमातून महिला आपल्या कुटुंबाला आर्थिक पाठबळ देऊन कुटुंब प्रगती पथावर नेण्याचे महत्वाचे काम करतील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी केले.

अहमदनगर : महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचत गट हे महत्वाचे साधन असून, बचत गटाच्या माध्यमातून महिला आपल्या कुटुंबाला आर्थिक पाठबळ देऊन कुटुंब प्रगती पथावर नेण्याचे महत्वाचे काम करतील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी केले.शहरातील तांबटकर मळा येथील मैदानावर राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण विकास विभाग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साई ज्योती स्वयंसहाय्यता यात्रा - 2019 चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजश्री घुले, पंचायत समिती सभापती रामदास भोर, शरदराव झोडगे, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, अनिल कराळे, राजेश परजणे, शिवाजीराव गाडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक परिक्षित यादव आदी यावेळी उपस्थित होते.विखे म्हणाल्या, महिला बचतगटांच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे ही काळाची गरज बनली आहे. आजही ग्रामीण भागात कौटुंबिक अर्थव्यवस्थेत महिलांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली तर त्या कुटूंबाच्या कौंटुबिक अर्थव्यवस्थेला मदत होते. बचत गटाच्या माध्यमातून आत्मविश्वास व आर्थिक स्थिरता मिळण्याचे महत्वाचे काम केले जाते. महिला बचतगटाचे कर्ज परत फेडीचे प्रमाण अत्यंत चांगले असून महिला आर्थिक नियोजनात महत्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगून आजही राज्यातील महिला टंचाईस्थितीतही सक्षमपणे उभ्या आहेत हेच बचतगट चळवळीचे महत्वाचे यश असल्याचे त्यांनी सांगितले. आजही शिर्डी व ग्रामीण भागात बचतगटाच्या माध्यमातून सेंद्रीय अगरबत्ती तयार करण्याचे महत्वाचे काम केले जात आहे.प्रदर्शन 14 जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद