शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
4
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
5
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
6
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
7
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
8
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
9
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
10
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
11
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
12
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
13
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
14
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
15
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
16
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
17
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
18
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
19
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
20
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट

सत्संगामुळे मनाला स्थिरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 10:03 IST

सत्संगामुळे मन हलके व स्थिर होते म्हणून सत्संगाला महत्व आहे. ज्यावेळी तुमचे मन अस्थिर झालेले असेल. अशावेळी धर्मस्थानात जावे. संत संगतीचा, त्यांच्या आशीर्वादाचा लाभ घ्यावा. सत्संगात भाग घ्यावा. मनाला स्थिरता लाभेल आणि नंतर तुम्हाला तुमच्या समस्या सोडविण्याचा मार्ग सापडू शकेल.

सन्मतीवाणी

सांसारिक जीवनात अनेक संकटे, समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येते. अशावेळी मन स्थिर व शांत ठेवण्याची गरज असते. मनावर एक प्रकारे समस्यांचा दबाव असतो. तो कमी करण्यासाठी सत्संगाची आवश्यकता असते. सत्संगामुळे मन हलके व स्थिर होते म्हणून सत्संगाला महत्व आहे. ज्यावेळी तुमचे मन अस्थिर झालेले असेल. अशावेळी धर्मस्थानात जावे. संत संगतीचा, त्यांच्या आशीर्वादाचा लाभ घ्यावा. सत्संगात भाग घ्यावा. मनाला स्थिरता लाभेल आणि नंतर तुम्हाला तुमच्या समस्या सोडविण्याचा मार्ग सापडू शकेल. आजकाल कुणावर विश्वास ठेवणे धोकेदायक आहे. कोण कधी धोका देईल हे सांगता येत नाही. अशावेळी आपण सावधगिरीने वागण्याची गरज आहे.राजकारणात कूटनीती असते. एकमेकाविरुध्द लढावे लागते. राजकारणातील नीती घरात प्रपंचात आणू नये. तशी कूटनीती संसारात आली तर घराची बरबादी होईल. सदगुरुंवर श्रध्दा व भक्तिभाव ठेवला तर मनाला स्थिरता लाभते. संकट दूर होण्यास मदत होते. पृथ्वीला पर्वत आणि सागराचा भार कधीही होत नाही. पृथ्वी आनंदाने हा भार सहन करते. घरातील गोपनीय गोष्टी जाहीरपणे उघड करु नका. सदगुरुंचे उपकार लक्षात ठेवा नाहीतर विश्वासघात होईल. महावीरांच्या जीवनगाथा ऐका. यामुळे जीवनात आत्मप्रकाशाची ज्योत प्रगट होते. तपश्चर्येचा मुखवटा लावू नका, श्रध्दापूर्वक तपसाधना करा. तपसाधनेशिवाय आत्मिक ज्ञानाची प्राप्ती होणार नाही.जीवनात जो चुका वारंवार करतो, त्या कबूल करत नाही. त्या माणसाला अहंमपणाची भावना येते. तो ताठर होतो.  तो ताठरपणा जीवनाचा घात करु शकतो. ताठरपणा सोडून नम्रतेने वागले पाहिजे. तरच आपण आपले ध्येय गाठू शकतो. दुसºयांना रागावू नका, दुसºयांवर आपला राग दाखवू नका. रागामुळे चांगली कामे बिघडतात. दुसºयांच्या मनाला लागतील असे विषारी शब्द बोलू नका. रागावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करा.     - पू. श्री. सन्मती महाराज

टॅग्स :Jain Templeजैन मंदीर