शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

साठे महामंडळातील घोटाळ्याला माजी उपमुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 06:28 IST

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील घोटाळा पाचशे ते साडेपाचशे कोटी रुपयांच्या घरात आहे.

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील घोटाळा पाचशे ते साडेपाचशे कोटी रुपयांच्या घरात आहे. तत्कालीन अर्थमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा या घोटाळ्याला कृपाशीर्वाद होता, असा आरोप सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केला आहे.हरेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या विकास कामांच्या भूमिपूजनाकरिता मंत्री कांबळे हे रविवारी श्रीरामपूरला आले होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, महामंडळ ही एक नोंदणीकृत संस्था असताना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सरकारने त्याचे नूतनीकरण केले नाही. त्यातच आर्थिक घोटाळा केला. त्यामुळे महामंडळाची मान्यता रद्द झाली. चार पट दंड भरून पुन्हा मान्यता घ्यावी लागली. शिखर संस्था असलेल्या नॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनकडे महामंडळाची पत राहिलेली नव्हती. राज्यातील हिंगोली, बीड, उस्मानाबाद, सोलापूरसह ११ जिल्ह्यांमध्ये शेकडो जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले. महामंडळाच्या अधिकाऱ्यांसह काँग्रेस व राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांचा त्यात समावेश आहे. आजअखेर ८२ अधिकारी निलंबित झाले आहेत. राष्ट्रवादीच्या एका जिल्हाध्यक्षाला तब्बल २१ वाहने देण्यात आली. चार वर्षात महामंडळाच्या कर्जाची वसुली झाली नाही. ५० हजार रुपयांपर्यंतची कर्जे खिरापतीसारखी वाटण्यात आली. अनेक बोगस लाभार्थ्यांच्या नावे पैैसे काढण्यात आले. आता प्रतिज्ञापत्रे लिहून घेतली जात आहे. या पैैशांचा हिशोब मागितला आहे.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचार