शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

१५ लाखांच्या कामांसाठी सरपंच परिषद खंडपीठात जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 14:04 IST

अहमदनगर : १५ लाख रुपयांपर्यंतची कामे ग्रामपंचायतींनी करावीत, असा निर्णय सरकारने घेतला होता़. मात्र, या निर्णयाविरोधात ठेकेदार संघटनांनी न्यायालयातून मनाई ...

अहमदनगर : १५ लाख रुपयांपर्यंतची कामे ग्रामपंचायतींनी करावीत, असा निर्णय सरकारने घेतला होता़. मात्र, या निर्णयाविरोधात ठेकेदार संघटनांनी न्यायालयातून मनाई हुकूम मिळविला आहे़. संघटनांनी मिळविलेल्या मनाई हुकूमाविरोधात सरपंच परिषद औरंगाबाद खंडपीठात पुनर्याचिका दाखल करणार आहे, अशी माहिती परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गिते यांनी दिली़.गिते म्हणाले, राज्य शासनाकडे सरपंच परिषदेच्या सततच्या मागणी व पाठपुराव्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामपंचायतला १५ लाख रुपयांपर्यंतची कामे करण्याबाबतचा निर्णय घेतला होता़. ज्या ग्रामपंचायती सक्षम असतील त्यांनी स्वत: ही कामे करावीत किंवा ई-निविदा काढून कामे करुन घेतली जातील. तसेच एका ग्रामपंचायतीला एका वर्षात असे ५० लाख रुपयांची कामे स्वत: करता येतील, असे शासन निर्णयात म्हटले होते़. ग्रामपंचायती सक्षम व्हाव्यात व गावातील कामे दर्जेदार, वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले होते़. मात्र, या निर्णयाविरोधात सुशिक्षित बेरोजगार अभियंते आणि शासकीय काम करणारी ठेकेदार संघटना यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान देऊन मनाई हुकूम मिळवला आहे़. राज्य शासनाच्या वतीने अहमदनगर जिल्हा परिषदेने या बाबत औरंगाबाद खंडपीठात प्रतिवाद केलेला आहे़. न्यायालयाने दिलेल्या मनाई हुकूमाविरोधात अधिक सक्षमपणे ग्रामपंचायतींची बाजू मांडण्यासाठी याचिका दाखल करण्याचा निर्णय सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे व अनिल गिते, विकास जाधव, अविनाश आव्हाड, जितेंद्र भोसले, कैलास गोरे यांनी घेतला आहे, असे गिते म्हणाले़.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरsarpanchसरपंच