शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
4
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
5
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
6
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
7
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
8
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
9
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
10
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
11
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
12
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
13
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
14
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
15
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
16
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
17
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
18
बचाव मोहिमेंतर्गत ताडोबातील गंभीर अवस्थेतील छोटा मटका वाघ जेरबंद; 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'ला हलवलं
19
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
20
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?

सरपंच ते मुख्यमंत्री सर्व लोकनियुक्त असावेत - आण्णा हजारे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 20:54 IST

'थेट जनतेतून सरपंच निवडला जावा हेच महत्त्वाचे आहे. '

राळेगण : गावचा सरपंच नव्हे तर राज्याचा मुखमंत्री सुद्धा जनतेने निवडून दिला पाहिजे, तीच खरी लोकशाही म्हणता येईल. खेड्यांचा विकास पक्ष आणि गटामुळेच खुंटला आहे. घटनेप्रमाणे समुदायाला निवडणूक लढवता येत नाही. ती व्यक्तीनेच लढवली पाहिजे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. 

थेट जनतेतून सरपंच निवडला जावा हेच महत्त्वाचे आहे. जर तो निवडला जात नसेल तर यासंबंधाने राज्यभर आंदोलन उभे होणे गरजेचे आहे. लोकशाही लोकांची आहे. लोकांच्या लोकसहभागातूनच ती चालली पाहिजे, असेही ही अण्णा हजारे म्हणाले. राज्य शासनाने लोकनियुक्त सरपंच पद रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष अनिल गीते पाटील आणि  सरपंच पदाधिकाऱ्यांनी आज आण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली. त्याप्रसंगी आण्णा यांनी वरील संदेश दिला आण्णा हजारे यांनी सध्या मौनव्रत धारण केले आहे. त्यामुळे  कागदावर लिहून त्यांनी सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. 

याप्रसंगी अण्णांच्या चालू असलेले मौनास  सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र च्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला. तसेच राज्य शासनाने जनतेतून लोकनियुक्त सरपंच रद्द बाबत घेतलेला निर्णय राज्यातील सरपंचांना मान्य नसून याबाबत अण्णांचे  लक्ष  वेधले. राज्य शासनाच्या निर्णयाबाबत अण्णांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सरपंच पदापासून मुख्यमंत्रिपदापर्यंत सर्व पदाची निवड जनतेतून निवड व्हावी, राज्य शासनाने जनतेचा हा अधिकार हिसकावू घेऊ नये. खेड्यांचा विकास गटतट आणि पक्षीय  राजकारणामुळे थांबलेला आहे. राज्यातील सरपंच व जनतेने याबाबत तीव्र स्वरूपाचा विरोध करावा. राज्यातील सरपंचांनी तसे ठराव करावेत व राज्य शासनाला पाठवावेत, असे सांगितले. 

याचबरोबर, प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी सरपंच परिषदेच्या माध्यमातून या असणाऱ्या शासनाच्या निर्णयाला प्रचंड विरोध करणार असल्याचे सांगितले. राज्यातील जनतेने याबाबत सरपंच परिषदेला सहकार्य करावे असे आवाहन सुद्धा त्यांनी केले. यावेळी महिला प्रदेश उपाध्यक्ष अश्विनी थोरात, प्रदेश सदस्य नारायण वनवे, आबासाहेब सोनवणे ,अरुण ठाणगे, स्वाती नऱ्हे व सरपंच उपस्थित होते.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे