शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

संजय कळमकर यांची ‘शुभमंगल सावधान’ ठरली विद्यार्थीप्रिय कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 14:53 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला विभागाच्या अभ्यासक्रमात येथील साहित्यिक डॉ़ संजय कळमकर यांची ‘शुभमंगल सावधान’ ही कथा विद्यार्थीप्रिय ठरली आहे़. पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात स्थान मिळालेले कळमकर हे नगर जिल्ह्यातील पहिलेच साहित्यिक आहेत़.

अहमदनगर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला विभागाच्या अभ्यासक्रमात येथील साहित्यिक डॉ़ संजय कळमकर यांची ‘शुभमंगल सावधान’ ही कथा विद्यार्थीप्रिय ठरली आहे़. पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात स्थान मिळालेले कळमकर हे नगर जिल्ह्यातील पहिलेच साहित्यिक आहेत़.प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमातील ‘समकालिन मराठी कथा’ या क्रमिक पुस्तकात कळमकर यांची ‘शुभमंगल सावधान’ ही कथा आहे़. या पुस्तकाचे संपादन डॉ. शिरीष लांडगे, डॉ. दिलीप पवार, डॉ. संदीप सांगळे यांनी केले आहे. कळमकर यांनी विवाहातील प्रथांचा फोलपणा रंजक पद्धतीने या कथेत मांडला आहे. विवाहाचा मूळ हेतू बाजूला पडून भव्यदिव्यता; उत्सवी स्वरुप, श्रीमंतीचा बडेजाव, खोटी प्रतिष्ठा, अमाप खर्च, राजकीय पुढा-यांची सहेतूक हजेरी यालाच आपल्याकडील विवाहात जास्त महत्त्व आले आहे. यावर भाष्य करताना कळमकर यांची कथा विनोदी अंगाने हसता- हसवता अंतर्मुख करते. म्हणूनच नर्मविनोदी शैलीतील ही कथा विद्यार्थ्यांना  भावली आहे. कथेमध्ये विवाहातील सोपस्कार, त्यातील संगती -विसंगती, गंमतीजमती प्रत्ययकारीपणे प्रकट झाल्या आहेत. उपरोध, उपहास आणि विविध विनोदी प्रसंगातून हे कथानक लय पकडते. सहज, सोप्या भाषेत वास्तवतेला विनोदाच्या साहाय्याने कथारुप दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये कळमकर यांची कथा प्रिय झाली आहे़. लग्न विधीतील पैशांच्या उधळपट्टीतून निर्माण होणा-या समस्यांचे, प्रथा-परंपरेचे कंगोरे उलगडत त्यांची कथा मानवी स्वभावातील विसंगतीवर प्रहार करते़. प्रसिद्धीचा हव्यास, धूर्तपणा, संधीसाधूपणा यातून साधलेला विनोद कथेची उंची वाढवणारा असल्याने ही कथा विद्यार्थ्यांच्या आवडीची ठरली आहे, असे मराठी विषय शिकविणा-या प्राध्यापकांचा अभिप्राय असल्याची माहिती कळमकर यांनी दिली़.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत असलेल्या महाविद्यालयांमध्ये मराठी विषय शिकविणा-या अनेक प्राध्यापकांकडून मला प्रतिक्रिया येत आहेत़. महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांसाठी गेल्यानंतरही विद्यार्थी आवर्जुन ‘शुभमंगल सावधन’ या कथेविषयी प्रतिक्रिया देतात व ही कथा आमची आवडती कथा असल्याचे सांगतात़ या कथेतून विवाहातील अनावश्यक बाबींवर केलेल्या मार्मिक टिपण्या कायम स्मरणात राहत असल्याचेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे़. या कथेतील काही उतारे, प्रसंग विद्यार्थ्यांच्या तोंडपाठ झाल्याचे पाहून आनंदाचा सुखद धक्का बसला, असे कळमकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर