शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

संग्राम जगताप यांनी राखला नगरचा गड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 16:20 IST

आमदार संग्राम जगताप यांच्या विजयाने नगर शहरावरील राष्ट्रवादीची मांड पक्की झाली़. गतवेळी जगताप यांचा निसटता विजय झाला़ त्यामुळे सेनेला येथून आशा होती़. परंतु, सरळसरळ झालेल्या लढतीत संग्राम जगताप यांनी सेनेच्या राठोड यांना चितपट करून नगरचा गड राखला़.

अहमदनगर मतदारसंघ विश्लेषण - अण्णा नवथर । अहमदनगर : आमदार संग्राम जगताप यांच्या विजयाने नगर शहरावरील राष्ट्रवादीची मांड पक्की झाली़. गतवेळी जगताप यांचा निसटता विजय झाला़ त्यामुळे सेनेला येथून आशा होती़. परंतु, सरळसरळ झालेल्या लढतीत संग्राम जगताप यांनी सेनेच्या राठोड यांना चितपट करून नगरचा गड राखला़.गत विधानसभा निवडणुकीत झालेल्या चौरंगी लढतीत संग्राम जगताप यांनी बाजी मारली़. २५ वर्षे आमदार राहिलेल्या अनिल राठोड यांना आस्मान दाखविले़. लोकसभा निवडणूक जगताप यांनी भाजपचे डॉ़. सुजय विखे यांच्याविरोधात लढविली़. या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला़. तेव्हापासूनच त्यांनी विधानसभेची तयारी सुरू केली़. ‘विकासासाठी वन्स मोअर’, हा मुद्दा जोरकसपणे ते निवडणुकीत मांडत राहिले़. सेनेने गुंडगिरी आणि भयमुक्त नगरसाठी उमेदवारी, हा जुनाच मुद्दा पुढे आणला़. भयमुक्त नगर, यापेक्षा नगरकरांनी यावेळी विकासाला साथ दिली़. जगताप यांना मध्यवर्ती शहर वगळता, सर्वच ठिकाणाहून कमी अधिक प्रमाणात मताधिक्य मिळाले़. होम टू होम प्रचार करत जगताप यांनी राठोड यांच्यासमोर आव्हान उभे केले़. महापालिका निवडणुकीतही जगताप यांनी भाजप लाटेतही लक्षणीय विजय मिळविला़. लोकसभेत सेनेने शहरात विखे यांचे काम केले़. त्यामुळे विधानसभेत खासदार विखे आणि शहर भाजप, यांचे सेनेला बळ मिळाले़. परंतु, संग्राम जगताप व वडील अरुण जगताप यांच्यापुढे विखे यांची यंत्रणा कमी पडली़.  संग्राम जगताप हे सेनेकडून की भाजपकडून, असा संभ्रम शेवटपर्यंत राहिला़. सेनेत कधी नव्हे ते यावेळी इच्छुकांची संख्या वाढली़. उमेदवारी कुणाला, यातच सेना गुरफटली गेली.  तोपर्यंत जगताप यांनी प्रचारात आघाडी घेतली होती़. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी सभा घेतल्या़ पण, ते नगरमध्ये आले नाहीत़. पक्षाच्या नेत्याची एकही सभा न घेता निवडून येणारे जगताप हे जिल्ह्यातील पहिले आमदार आहेत़. संग्राम जगताप यांनी संकल्पनामा जाहीर केला व तो सोशल मीडियाच्या माध्यमातून नगरकरांपर्यंत पोहोचविला़. प्रचारात राष्ट्रवादी आघाडीवर होती़. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता़. तसा सेनेच्या गोटात दिसला नाही़. नेहमीप्रमाणे सेनेचे सर्वच नेते प्रचारात कमीच दिसले़. 

टॅग्स :Sangram Jagtapआ. संग्राम जगतापAhmednagarअहमदनगर