शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

संभाजी ब्रिगेडची श्रीगोंद्यात साखरेविरुद्ध भाकरीची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 11:39 IST

‘साखरेविरुद्ध भाकरीची लढाई’ असा नारा देत संभाजी ब्रिगेड श्रीगोंदा मतदारसंघात निवडणुकीत उतरली आहे. टिळक भोस यांनी ऊस उत्पादकांच्या थकबाकीसाठी गत ७९ दिवसांपासून बबनराव पाचपुते व राहुल जगताप यांच्या घरासमोर आंदोलन सुरु  केले आहे. आता त्यांनी थेट निवडणुकीतच पाचपुते यांना आव्हान दिले आहे. 

श्रीगोंदा : ‘साखरेविरुद्ध भाकरीची लढाई’ असा नारा देत संभाजी ब्रिगेड श्रीगोंदा मतदारसंघात निवडणुकीत उतरली आहे. टिळक भोस यांनी ऊस उत्पादकांच्या थकबाकीसाठी गत ७९ दिवसांपासून बबनराव पाचपुते व राहुल जगताप यांच्या घरासमोर आंदोलन सुरु  केले आहे. आता त्यांनी थेट निवडणुकीतच पाचपुते यांना आव्हान दिले आहे. श्रीगोंदा मतदारसंघात पाचपुते यांच्याविरोधात राष्टÑवादीकडून उमेदवारी कोण करणार? याची मोठी चर्चा रंगली. नागवडे यांची भूमिका भाजपला अनुकूल असल्याचे समजताच राहुल जगताप यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. नागवडे यांनीही दोन्ही काँग्रेसकडून उमेदवारी केली नाही. त्यामुळे ऐनवेळी घनश्याम शेलार यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. अनुराधा नागवडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र, त्या रिंगणात राहतील की नाही हे नक्की नाही. त्यांनी माघार घेतल्यास पाचपुते व शेलार हे प्रमुख पक्षांचे उमेदवार मैदानात राहतील.  या सर्वांना पर्याय म्हणून भोस हे मैदानात उतरले आहेत. त्यांनी श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीतही उमेदवार उभे केले होते. तालुक्यातील ऊस उत्पादकांच्या थकीत पेमेंटबाबत एकही नेता बोलत नाही. पाणी, रोजगार, फळबागा याचा प्रश्न आहे. यावर्षी अनेक शेतक-यांना चारा छावणीत दिवस काढावे लागले. टँकरचे पाणी प्यावे लागले. या मुद्यांकडे ते गावोगावच्या सभांमधून लक्ष वेधत आहेत. आम्ही साखर कारखानदार नाहीत. आमच्याकडे पैसा नाही. आमची लढाई भाकरीची आहे, अशी भूमिका घेऊन ते मैदानात उतरले आहेत. श्रीगोंदा तालुका प्रस्थापित नेत्यांनी वेठीस धरला आहे. हे नेते नेहमी वैयक्तिक हितासाठी तडजोडी करतात. जनतेला यांनी गृहित धरले आहे. त्यामुळे सामान्य शेतक-याचा मुलगा व जनतेचा प्रतिनिधी म्हणून निवडणुकीत उतरलो आहे, असे संभाजी ब्रिगेडची जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी सांगितले. 

टॅग्स :PoliticsराजकारणAhmednagarअहमदनगर