शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

संभाजी ब्रिगेडची श्रीगोंद्यात साखरेविरुद्ध भाकरीची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 11:39 IST

‘साखरेविरुद्ध भाकरीची लढाई’ असा नारा देत संभाजी ब्रिगेड श्रीगोंदा मतदारसंघात निवडणुकीत उतरली आहे. टिळक भोस यांनी ऊस उत्पादकांच्या थकबाकीसाठी गत ७९ दिवसांपासून बबनराव पाचपुते व राहुल जगताप यांच्या घरासमोर आंदोलन सुरु  केले आहे. आता त्यांनी थेट निवडणुकीतच पाचपुते यांना आव्हान दिले आहे. 

श्रीगोंदा : ‘साखरेविरुद्ध भाकरीची लढाई’ असा नारा देत संभाजी ब्रिगेड श्रीगोंदा मतदारसंघात निवडणुकीत उतरली आहे. टिळक भोस यांनी ऊस उत्पादकांच्या थकबाकीसाठी गत ७९ दिवसांपासून बबनराव पाचपुते व राहुल जगताप यांच्या घरासमोर आंदोलन सुरु  केले आहे. आता त्यांनी थेट निवडणुकीतच पाचपुते यांना आव्हान दिले आहे. श्रीगोंदा मतदारसंघात पाचपुते यांच्याविरोधात राष्टÑवादीकडून उमेदवारी कोण करणार? याची मोठी चर्चा रंगली. नागवडे यांची भूमिका भाजपला अनुकूल असल्याचे समजताच राहुल जगताप यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. नागवडे यांनीही दोन्ही काँग्रेसकडून उमेदवारी केली नाही. त्यामुळे ऐनवेळी घनश्याम शेलार यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. अनुराधा नागवडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र, त्या रिंगणात राहतील की नाही हे नक्की नाही. त्यांनी माघार घेतल्यास पाचपुते व शेलार हे प्रमुख पक्षांचे उमेदवार मैदानात राहतील.  या सर्वांना पर्याय म्हणून भोस हे मैदानात उतरले आहेत. त्यांनी श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीतही उमेदवार उभे केले होते. तालुक्यातील ऊस उत्पादकांच्या थकीत पेमेंटबाबत एकही नेता बोलत नाही. पाणी, रोजगार, फळबागा याचा प्रश्न आहे. यावर्षी अनेक शेतक-यांना चारा छावणीत दिवस काढावे लागले. टँकरचे पाणी प्यावे लागले. या मुद्यांकडे ते गावोगावच्या सभांमधून लक्ष वेधत आहेत. आम्ही साखर कारखानदार नाहीत. आमच्याकडे पैसा नाही. आमची लढाई भाकरीची आहे, अशी भूमिका घेऊन ते मैदानात उतरले आहेत. श्रीगोंदा तालुका प्रस्थापित नेत्यांनी वेठीस धरला आहे. हे नेते नेहमी वैयक्तिक हितासाठी तडजोडी करतात. जनतेला यांनी गृहित धरले आहे. त्यामुळे सामान्य शेतक-याचा मुलगा व जनतेचा प्रतिनिधी म्हणून निवडणुकीत उतरलो आहे, असे संभाजी ब्रिगेडची जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी सांगितले. 

टॅग्स :PoliticsराजकारणAhmednagarअहमदनगर