शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

‘लोकमत’चा शहिदांना सलाम; शूरा आम्ही वंदिले! सैनिकांच्या सन्मानार्थ विशेषांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 11:00 IST

देशाच्या सीमांचे अहोरात्र रक्षण करताना बलिदान दिलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील शहीद जवानांच्या शौर्यकथा ‘लोकमत’ आपल्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्ताने वाचकांसमोर आणत आहे. ‘लोकमत’ने आपला वर्धापनदिन विशेषांक शहीद जवान व देशासाठी लढणाऱ्या सर्वच आजी-माजी सैनिकांना अर्पण केला आहे.

अहमदनगर : देशाच्या सीमांचे अहोरात्र रक्षण करताना बलिदान दिलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील शहीद जवानांच्या शौर्यकथा ‘लोकमत’ आपल्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्ताने वाचकांसमोर आणत आहे. ‘लोकमत’ने आपला वर्धापनदिन विशेषांक शहीद जवान व देशासाठी लढणाऱ्या सर्वच आजी-माजी सैनिकांना अर्पण केला आहे. यानिमित्त ‘लोकमत’ व रेणुकामाता मल्टिस्टेट को-आॅपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड ही संस्था शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सत्कार करणार आहे.स्वातंत्र्योत्तर काळात देशासाठी लढताना नगर जिल्ह्यातील अनेक जवान शहीद झाले. या सर्व शहिदांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘लोकमत’ने आपल्या वर्धापनदिनानिमित्त ‘शूरा मी वंदिले’ या विशेषांकाची निर्मिती केली आहे. या विशेषांकात या शूर वीरांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला आहे. विशेषांकातून या शौर्यकथा १४ ते १८ आॅगस्ट या कालावधीत वाचकांच्या भेटीला येणार आहेत.

वर्धापनदिन समारंभात झाडांची रोपे आणण्याचे आवाहन

सालाबादप्रमाणे १५ आॅगस्टला ‘लोकमत’भवनच्या हिरवळीवर सायंकाळी ५ ते ९ या वेळेत ‘लोकमत’चा वर्धापनदिन समारंभ साजरा होणार आहे. या समारंभात कुठल्याही भेटवस्तू आणू नयेत असे आवाहन करण्यात येत आहे. भेटवस्तूंऐवजी झाडांची रोपे आणावीत. ही रोपे शहीद जवानांच्या स्मृत्यर्थ त्यांच्या गावांना भेट देण्याचा उपक्रम ‘लोकमत’ राबविणार आहे.

‘रेणुकामाता’ शहिदांच्या कुटुंबीयांसाठी पाच टक्के जागा आरक्षित ठेवणार‘लोकमत’च्या ‘शूरा मी वंदिले’ या उपक्रमाचे रेणुकामाता मल्टिस्टेट को-आॅपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेचे अध्यक्ष प्रशांत भालेराव यांनी स्वागत केले. देशासाठी बलिदान दिलेल्या या जवानांच्या स्मृतींना ‘लोकमत’मुळे उजाळा मिळणार आहे. या जवानांच्या परिवारांची काळजी घेण्याची जबाबदारी समाजाची आहे. त्यामुळे आपण आपल्या संस्थेतील पाच टक्के जागा या शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी यापुढे राखीव ठेवणार असल्याची भावना त्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरIndependence Dayस्वातंत्र्य दिनLokmatलोकमत