शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

राजकारणासाठी नेत्यांनी हिरावला लाखो मुलांच्या तोंडातला घास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:19 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील दोन मातब्बर नेत्यांच्या वादात शालेय पोषण आहाराचे टेंडर नोव्हेंबर २०२० पासून अडकले आहे. आपल्याच कार्यकर्त्याला हे ...

अहमदनगर : जिल्ह्यातील दोन मातब्बर नेत्यांच्या वादात शालेय पोषण आहाराचे टेंडर नोव्हेंबर २०२० पासून अडकले आहे. आपल्याच कार्यकर्त्याला हे टेंडर मिळावे, यासाठी हे दोन्ही नेते जिद्दीला पेटले आहेत. त्यामुळे डिसेंबरपासून शालेय पोषण आहाराचे वाटप रखडलेले आहे. परिणामी, जिल्ह्यातील ४ लाख ६३ हजार ९६१ मुलांच्या तोंडचा घास हिरावला आहे.

जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारतर्फे पोषण आहार पुरविला जातो. हा पोषण आहार खिचडीच्या रूपाने दिला जातो. मात्र, कोरोनामुळे शाळा बंद असल्याने खिचडीऐवजी कोरडा शिधा पालकांपर्यंत पोहोचविला जात होता; परंतु तांदूळ व इतर धान्य पुरवठा करण्याचा ठेका ज्या पुरवठादाराला दिला होता त्याचा करार संपलेला आहे. नवीन कराराच्या निविदाही काढण्यात आल्या होत्या. मात्र, कोट्यवधी रुपयांचा हा धान्य पुरवठ्याचा ठेका जिल्ह्यातील दोन मातब्बर नेत्यांच्या वादात अडकला आहे.

मागील पुरवठादाराचा कालावधी नोव्हेंबर २०२० अखेरीस संपला. मागील टेंडर जिल्ह्यातील एका दिग्गज भाजप नेत्याच्या कार्यकर्त्याला मिळाले होते. मात्र, आता जिल्ह्यातील एका दिग्गज काँग्रेस नेत्याने हे टेंडर आपल्या कार्यकर्त्याला मिळावे, यासाठी ताकद पणाला लावली. त्याचवेळी त्या भाजप नेत्यानेही हे टेंडर आपल्याच कार्यकर्त्याला मिळविण्यासाठी ताकद पणाला लावली. टेंडरचा विषय दोघांकडूनही प्रतिष्ठेचा करण्यात आल्यामुळे गेल्या नोव्हेंबरपासून आतापर्यंत पोषण आहाराचे टेंडर होऊ शकले नाही. दोघांच्या वादात पोषण आहाराचे टेंडरच रखडले अन् चिमुकल्यांच्या तोंडातला घास हिरावला गेला.

.........................मुंबईचा करार झाला, नगरचाच रखडला

नोव्हेंबर २०२० अखेरीस मुंबई व नगर जिल्ह्यातील पुरवठादारांच्या कराराची मुदत संपली होती. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये नवीन करार करण्याबाबत निविदा निघाल्या. मुंबईचा करार फायनल झाला; परंतु नगर जिल्ह्याचा करार अद्यापही अंतिम होत नसल्याने प्राथमिक व माध्यमिक शाळांमधून शिकणारे लाखो विद्यार्थी शालेय पोषण आहाराच्या धान्यापासून वंचित आहेत.

...............

शिधा वाढविण्याची तरतूद

शालेय पोषण आहारातून प्रत्येक विद्यार्थ्याला पाच ते दहा किलोपर्यंत तांदूळ व डाळ असा कोरडा शिधा मिळणार आहे. मागील वेळी तांदळाबरोबर मूग डाळ, मटकी आणि हरभरा हे कडधान्य देण्यात आले होते. यावर्षी मसूर डाळ देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र, दोन दिग्गज नेत्यांच्या वादात अद्याप टेंडरच होत नसल्यामुळे शालेय पोषण आहाराचा घास विद्यार्थ्यांच्या मुखी कधी जाणार, असा सवाल पालकांमधून उपस्थित केला जात आहे.

..........

पोषण आहार योजनेस पात्र विद्यार्थी

१ ली ते ५ वी - २ लाख ७६ हजार १७०

६ वी ते ८ वी - १ लाख ८७ हजार ७९१

................

टेंडर प्रक्रिया राबविणे आमच्या हातात नाही. ते सरकारच्या हातात आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये पूर्वीच्या पुरवठादाराचा करार संपला आहे. नवीन पुरवठादार अद्याप नियुक्त झालेला नाही. त्यामुळे पोषण आहाराचे वाटप सध्या बंद आहे.

-गुलाब सय्यद, प्रभारी शिक्षणाधिकारी.