शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाचे दिग्दर्शक झालात तर...; अक्षय कुमारच्या प्रश्नावर CM फडणवीसांचं दमदार उत्तर, टाळ्यांचा कडकडाट
2
जशास तसे उत्तर! जरांगेंचा एल्गार, १९९४ च्या ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणार
3
योगी बुलडोजर चालवत आहेत तर...? बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर यांचा CJI बीआर गवईंना थेट सवाल
4
कर्ज फेडण्यासाठी अदानी घेणार २,२०० कोटींचं लोन; जगातील ४ मोठ्या बँका करणार मदत, शेअर्समध्ये तेजी
5
मोठी चूक! 'डेलॉइट' कंपनीला AI मुळे कोट्यवधींचा फटका; चुकीच्या रिपोर्टसाठी ऑस्ट्रेलियन सरकारला परत करावे लागणार पैसे
6
बिहारमध्ये भाजपाच्या अडचणी वाढणार, चिराग पासवान-प्रशांत किशोर यांना टाळी देण्याच्या तयारीत?
7
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे
8
जखमींना हॉस्पिटलला पोहचवा, २५ हजार ते १ लाख मिळवा; योगी सरकारनं आणली जबरदस्त योजना
9
VIRAL : तो नवरा आहे गं, महिषासुर नाही... करवा चौथची पूजा करण्यासाठी महिलेनं काय केलं, Video बघाच!
10
"आम्हाला दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं नव्हतं...", रेणुका शहाणेंचा मोठा खुलासा, म्हणाल्या...
11
'या' एका निर्णयाने फिरलं वातावरण! ग्राहक जोडणीत BSNL ने Airtel ला टाकले मागे; जिओची काय स्थिती?
12
Cough Syrup : "पप्पा, घरी जाऊया...", कफ सिरपमुळे मुलीने गमावला जीव; १६ डायलिसिस, २२ दिवस मृत्यूशी झुंज
13
कतरिना कैफचं झालं बेबी शॉवर, 'या' फोटोमुळे मिळाली हिंट; ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
14
धक्कादायक! विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची १२ व्या मजल्यावरून उडी; दोघांचाही मृत्यू
15
“गेम करण्याएवढी ताकद नाही, आम्ही भांडी घासायला बसलोय का”; ओबीसी नेत्यांचे जरांगेंना उत्तर
16
Australia Squad Against India : टीम इंडियाच्या २ कॅप्टनसमोर ऑस्ट्रेलियाकडून मार्श दाखवणार ताकद
17
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
18
VIDEO: रस्त्याखाली काम, रस्त्यावर 'जॅम'! मेट्रो सुरू झाली, पण कार अजूनही ट्रॅफिकमध्येच; वरळी नाक्याजवळची कोंडी कधी फुटणार?
19
Video - राईड संपल्यानंतर 'ती' रॅपिडोवाल्याशी भिडली, पैसे मागताच डोळ्यात फेकली मिरची फूड
20
१५ राण्या, ३० मुलं अन् १०० नोकरांसह दुबईला पोहोचला 'या' देशाचा राजा; शेख पाहत राहिले...

संत साहित्याला बाद करण्याचा डाव

By admin | Updated: December 17, 2015 23:37 IST

संगमनेर : काही अभ्यासक संत साहित्याला कालबाह्य ठरवून सुधारणावादाच्या कक्षेतून बाद करू पाहत आहे, हे योग्य नाही,

संगमनेर : काही अभ्यासक संत साहित्याला कालबाह्य ठरवून सुधारणावादाच्या कक्षेतून बाद करू पाहत आहे, हे योग्य नाही, असे परखड मत पिंपरी चिंचवड येथे होणाऱ्या नियोजित ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. संगमनेर महाविद्यालयात गुरूवारी ‘संत साहित्याचे समाज प्रबोधनातील योगदान’ या विषयावर दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्रास प्रारंभ झाला. चर्चासत्राचे उद्घाटन मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांचे हस्ते झाले. अध्यक्षस्थानी नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ.सबनीस होते. संत साहित्य केवळ अध्यात्मिक साहित्य म्हणण्याचा प्रघात पडत चालला आहे. वास्तविक भौतिकवाद आणि प्रापंचिकतेसाठी संत साहित्य उपयुक्त आहे. संताची अध्यात्मिक व सामाजिक समता ही वैश्विक आहे. सामाजिक समतेसाठी संत साहित्य पूरक आहे. संत तुकारामांची समता आधुनिक समतेला पूरक असल्याचे सांगत डॉ.सबनीस यांनी तुकारामांच्या काही वचनांची उदाहरणे दिली. संत साहित्य श्रध्देचे साहित्य जरूर आहे. माणसातील विकृती दूर करण्यासाठी आणि निखळ माणूस बनण्यासाठी संत साहित्य गरजेचे आहे. संत साहित्य व समाज सुधारकांची परंपरा या दोन्हीमध्ये समतेचे सूत्र आहे. हे दोन्ही प्रवाह वेगळे नाहीत. या प्रवाहांना जोडण्यासाठी समतावादी संचित जरूरीचे आहे. त्यामुळे विद्वानांची विभागणी दोन टोकांच्या वर्तुळात नको. यावेळी कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी, प्राचार्य डॉ.के.के.देशमुख यांनी मनोगते व्यक्त केली. प्रास्तविक समन्वयक प्रा.डॉ.अशोक लिंबेकर यांनी केले. सूत्रसंचलन प्रा.डॉ.जितेंद्र पाटील यांनी केले तर आभार मराठी विभाग प्रमुख प्रा. रघुनाथ खरात यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)