शहरं
Join us  
Trending Stories
1
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
2
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
3
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
4
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
5
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
6
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
7
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
8
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
9
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
10
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
11
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
12
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
13
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
14
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
15
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
16
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
17
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
18
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
19
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
20
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद

संत साहित्याला बाद करण्याचा डाव

By admin | Updated: December 17, 2015 23:37 IST

संगमनेर : काही अभ्यासक संत साहित्याला कालबाह्य ठरवून सुधारणावादाच्या कक्षेतून बाद करू पाहत आहे, हे योग्य नाही,

संगमनेर : काही अभ्यासक संत साहित्याला कालबाह्य ठरवून सुधारणावादाच्या कक्षेतून बाद करू पाहत आहे, हे योग्य नाही, असे परखड मत पिंपरी चिंचवड येथे होणाऱ्या नियोजित ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. संगमनेर महाविद्यालयात गुरूवारी ‘संत साहित्याचे समाज प्रबोधनातील योगदान’ या विषयावर दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्रास प्रारंभ झाला. चर्चासत्राचे उद्घाटन मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांचे हस्ते झाले. अध्यक्षस्थानी नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ.सबनीस होते. संत साहित्य केवळ अध्यात्मिक साहित्य म्हणण्याचा प्रघात पडत चालला आहे. वास्तविक भौतिकवाद आणि प्रापंचिकतेसाठी संत साहित्य उपयुक्त आहे. संताची अध्यात्मिक व सामाजिक समता ही वैश्विक आहे. सामाजिक समतेसाठी संत साहित्य पूरक आहे. संत तुकारामांची समता आधुनिक समतेला पूरक असल्याचे सांगत डॉ.सबनीस यांनी तुकारामांच्या काही वचनांची उदाहरणे दिली. संत साहित्य श्रध्देचे साहित्य जरूर आहे. माणसातील विकृती दूर करण्यासाठी आणि निखळ माणूस बनण्यासाठी संत साहित्य गरजेचे आहे. संत साहित्य व समाज सुधारकांची परंपरा या दोन्हीमध्ये समतेचे सूत्र आहे. हे दोन्ही प्रवाह वेगळे नाहीत. या प्रवाहांना जोडण्यासाठी समतावादी संचित जरूरीचे आहे. त्यामुळे विद्वानांची विभागणी दोन टोकांच्या वर्तुळात नको. यावेळी कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी, प्राचार्य डॉ.के.के.देशमुख यांनी मनोगते व्यक्त केली. प्रास्तविक समन्वयक प्रा.डॉ.अशोक लिंबेकर यांनी केले. सूत्रसंचलन प्रा.डॉ.जितेंद्र पाटील यांनी केले तर आभार मराठी विभाग प्रमुख प्रा. रघुनाथ खरात यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)