शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

कोरोनाबाधित महिलांचीही प्रसूती सुखरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST

--------- लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : गर्भवती महिलांना कोरोना झाल्याचे प्रमाण जिल्ह्यात नगण्य आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधित १३ ...

---------

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : गर्भवती महिलांना कोरोना झाल्याचे प्रमाण जिल्ह्यात नगण्य आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधित १३ महिलांची प्रसूती झाली असून आई व बाळ दोन्ही सुखरूप व कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना झाल्याने गर्भपात करावा लागला, असे प्रकार जिल्ह्यात शून्यावर असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

कोरोना किती घातक आणि जीवघेणा आहे, याची तीव्रता संपूर्ण जगाने अनुभवली आहे. आता तर कोरोना रूप बदलून मनुष्य जीविताला दिवसेंदिवस नवनवा धोका निर्माण करीत आहे. आबालवृद्धांच्या सुरक्षेची चिंता कायम ठेवणाऱ्या या विषाणूने जन्माआधीच कोवळ्या जीवांचा बळी घेतल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. या विषाणूने गर्भवती महिलांच्या प्रकृतीवर गंभीर आघात केला असून त्यांना विषाणूच्या संसर्गामुळे नैसर्गिक गर्भपात करावा लागल्याच्या घटना राज्यात अनेक ठिकाणी घडल्या आहेत. सुदैवाने कोरोना झाल्यामुळे गर्भपात करण्याची वेळ एकाही महिलेवर आली नाही. उलट कोरोना झालेल्या महिलांच्या प्रसूती झाल्या असून महिला व बाळ दोन्ही सुखरूप झालेल्या आहेत, असे येथील महापालिकेतील वैद्यकीय तज्ज्ञ व जिल्हा रुग्णालयातील स्त्री रोग तज्ज्ञांनी सांगितले. कोरोनामुळे नैसर्गिक गर्भपाताचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात मागील दीड वर्षांमध्ये खासगी रुग्णालयात एकूण नैसर्गिक गर्भपाताच्या प्रकरणांमध्येही कोरोना विषाणूचा संसर्ग अत्यंत कमी असल्याचे दिसून आले आहे. --------

मृत बाळांचा जन्माचेही प्रमाण कमीच

गेल्या दीड वर्षात मृत बाळांचा जन्म झाल्याच्या घटनाही अत्यंत कमी आहेत. यातील काही प्रकरणातही कोरोना विषाणू कारणीभूत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नैसर्गिक गर्भपातासाठी प्रदूषण, तणाव, अयोग्य जीवनशैली, इन्फेक्शन आदी कारणे महत्त्वाची मानली जातात. पण कोरोनाची गंभीर लक्षणे असलेल्या गर्भवती महिलांमध्ये गर्भपाताच्या घटना होतात. सुदैवाने नगर जिल्ह्यात असे प्रमाण अत्यंत कमी आहे.

-----------

गर्भवती महिलांना सावधगिरीचा सल्ला

कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा धोका आपल्या देशावरही ओढवण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गर्भवती महिलांनी विशेष सावधगिरी बाळगायला हवी, असा सल्ला स्त्री रोग तज्ज्ञांकडून दिला जात आहे.