शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

छावण्यांअभावी जनावरांची ससेहोलपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 18:16 IST

नानासाहेब जठार विसापूर : दुष्काळी परिस्थिती गंभीर असल्याने जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पण विसापूर (ता. ...

नानासाहेब जठारविसापूर : दुष्काळी परिस्थिती गंभीर असल्याने जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पण विसापूर (ता.श्रीगोंदा ) येथे जनावरांची छावणी सुरू करण्यासाठी कोणत्याही सामाजिक संस्थेने अथवा व्यक्तींनी प्रस्ताव दाखल करण्यास उत्सुकता दाखविली नाही. त्यामुळे जनावरांची छावणी सुरू होऊ न शकल्यामुळे विसापूरमधील जनावरांची ससेहोलपट सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव जवळच्या छावण्यांची वाट या जनावरांना दाखवावी लागत आहे.पशुवैद्यकीय विभागाच्या पिंपळगाव पिसा कार्यालयाकडे विसापूर येथे ७२४ मोठी व २४२ लहान अशा एकूण ९६६ जनावरांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी काही शेतकऱ्यांनी आपली जनावरे शेजारी असणाºया कोरेगव्हाण, सुरेगाव, चांभुर्डी, उखलगाव व कोळगाव (लगडवाडी) येथील छावण्यांमध्ये सोयीनुसार स्थलांतरित केले आहेत. मुंगूसगाव येथेही लहान मोठे ५४८ जनावरे आहेत. मात्र तेथेही जनावरांची छावणी न झाल्याने शेतकऱ्यांनी आपली जनावरे इतरत्र स्थलांतरित केले आहेत.शेतकºयांना आपल्या गावात छावणी नसल्यामुळे दुसºया गावांमधील छावणीचा आश्रय घेऊन आपले गोधन वाचविण्यासाठी धडपड करावी लागते आहे. दुसºया गावातील छावणीत राहून जनावरांचे संगोपन करण्यात अडचणी येत आहेत. जनावरांच्या संगोपनासाठी किमान कुटुंबातील एका व्यक्तीला छावणीत मुक्काम करावा लागतो. त्यामुळे चार पाच किलोमीटर अंतरावर छावणीवर राहताना कुटुंबाची काळजी घेताना जेवणासाठी दररोज दोन वेळा घरी हेलपाटे मारावे लागतात. मोटारसायकल नसल्यास जेवायला मोठी पायपीट करावी लागते.ज्या शेतकºयांची जनावरे छावणीत जाऊ शकत नाहीत, त्यांच्या चाºयाचा प्रश्न गंभीर बनला आहे. काही लोकांना मजुरी केल्याविना गत्यंत्तर नाही. मग त्यांनी आपली जनावरे छावणीत घेऊन जायची कशी? असा प्रश्न विचारला जात आहे. ज्या जनावरांची पशुसंवर्धन विभागाकडे नोंदणी आहे, मात्र ती छावणीत दाखल झालेली नाहीत, अशा जनावरांचे अनुदान थेट अशा शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करावे अथवा गोठ्यात चारा पुरविण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी पशुपालकांकडून केली जात आहे. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा