शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

गोवर-रुबेला लसीकरणात ग्रामीण भाग आघाडीवर

By साहेबराव नरसाळे | Updated: January 16, 2019 10:45 IST

राज्याच्या ग्रामीण भागात गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेला मोठे यश मिळाले असून, त्या तुलनेत महानगरपालिका हद्दींमध्ये थंडा प्रतिसाद मिळत आहे़

साहेबराव नरसाळेअहमदनगर : राज्याच्या ग्रामीण भागात गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेला मोठे यश मिळाले असून, त्या तुलनेत महानगरपालिका हद्दींमध्ये थंडा प्रतिसाद मिळत आहे़ नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक १०५ टक्के लसीकरण झाले आहे़ तर भिवंडी महापालिका हद्दीत अवघे ४१ टक्के लसीकरण झाले आहे़२०१६ मध्ये देशभरात गोवर आजाराने ५० हजार बालकांचा मृत्यू झाला होता़ त्यामुळे सरकारने गोवर-रुबेला लसीकरण मोहीम हाती घेतली़ राज्यात २७ नोव्हेंबर २०१८ पासून गोवर-रुबेला लसीकरणास प्रारंभ झाला़ प्रत्येक आठवड्याला या मोहिमेचा सरकारकडून आढावा घेतला जात आहे़ १४ जानेवारी २०१९ पर्यंत राज्याच्या ग्रामीण भागात ८८ टक्के तर शहरी भागात ६५ लसीकरण झाले आहे़नाशिक, लातूर, पुणे, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये अपेक्षित बालकांपेक्षा जास्त बालकांना लसीकरण झाले आहे़ त्यामुळे या जिल्ह्यांमधील टक्केवारी १०० पेक्षा अधिक झाली आहे़बुलढाणा जिल्ह्यात सर्वात कमी ७४ टक्के लसीकरण झाले असून, त्यानंतर रायगड व जालना जिल्ह्यात ७५ टक्के लसीकरण झाले आहे़ ७५ टक्क्यांपेक्षा कमी लसीकरण झालेले हे तीन जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे़ तर महापालिका हद्दीत केवळ धुळे महापालिकेने १०० टक्के लसीकरण करुन आघाडी घेतली आहे़ तर १५ महापालिकांच्या हद्दीत ७५ टक्केपेक्षा कमी लसीकरण झाले आहे़ अहमदनगर महापालिका हद्दीत ७२ टक्के लसीकरण झाले असून, ७५ टक्यांपेक्षा कमी लसीकरण असलेल्या महापालिका व जिल्हा आरोग्य यंत्रणांना लसीकरणाची गती वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़दुर्गम वाड्या-वस्त्या, उसाच्या फडात पोहोचले अधिकारीजिल्ह्यात डॉ़ संदीप सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवकांनी दुर्गम वाड्या-वस्त्यांवर जाऊन लोकांना लसीकरणाची माहिती दिली़ तसेच सर्व मुलांना लसीकरण घडवून आणले़ परजिल्ह्यातील अनेक ऊसतोड मजूर नगर जिल्ह्यातील उसाच्या फडांमध्ये मुलाबाळांसह आलेले आहेत़ या मुलांचे लसीकरण घडवून आणण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक थेट उसाच्या फडात पोहोचले़ शेतातील राहुट्यांमध्ये जाऊन बालकांना लस दिली़ त्यामुळे ग्रामीण भागातील लसीकरणाची आकडेवारी ९३ टक्यांवर पोहोचली आहे़ एकही मुलगा लसीपासून वंचित राहू नये, असे नियोजन करण्यात आल्याचे डॉ़ सांगळे यांनी सांगितले़राज्याच्या तुलनेत नगर जिल्ह्याने समाधानकारक काम केले आहे़ नगर जिल्ह्यात ९३़५१ टक्के लसीकरण झाले असून, शहरी भागात लसीकरण मोहिमेला कमी प्रतिसाद आहे़ पण पुढे लसीकरण चांगले होईल़-डॉ़ संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारीसर्वाधिक लसीकरण झालेले जिल्हे व महापालिकाजिल्हा                                   महापालिकानाशिक (१०५ टक्के)             धुळे (१०० टक्के)लातूर (१०४)                         चंद्रपूर (९६)पुणे (१०४)                            वसई-विरार (९३)उस्मानाबाद (१०१)                कोल्हापूर (९२)भंडारा (९८)                          लातूर (९१)सांगली (९७)                        सांगली (८८)धुळे (९५)                             नवी मुंबई (८०)अहमदनगर (९३)                 कल्याण (८०)वर्धा (९३)                             पिंपरी चिंचवड (७९)हिंगोली (९१)                       उल्हासनगर (७७)

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर