शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

६०० रुपये ब्रास वाळूसाठी ५ दिवसांपासून रांगेत कसोटी; श्रीरामपुरात तोबा गर्दी

By शिवाजी पवार | Updated: December 12, 2023 15:38 IST

ओटीपी येत नसल्यामुळे नोंदणीही खोळंबली

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : राज्य सरकारच्या महसूल विभागाने आणलेल्या नवीन धोरणानुसार मिळणाऱ्या ६०० रुपये ब्रास वाळूच्या मागणीसाठी तहसील कार्यालयात तोबा गर्दी पाहायला मिळत आहे; मात्र चार-पाच दिवसांपासून रांगेत उभे राहूनही अनेकांची वाळूसाठी नोंदणी होऊ शकली नाही. मोबाईलवर ओटीपी मिळत नसल्यामुळे अनेकांना दिवसभर ताटकळत बसावे लागत आहे. मोठी प्रतीक्षा करूनही वाळू मिळत नसल्याने रोज नागरिकांना रिकाम्या हाती माघारी परतावे लागत आहे.

श्रीरामपूर तालुक्यात नव्याने वांगी व एकलहरे येथे शासकीय वाळू डेपो सुरू करण्यात आले आहेत. महसूल विभागाने नुकतेच या दोन्ही केंद्रांचे उद्घाटन केले होते. तत्पूर्वी मात्र अनेक दिवसांपासून नागरिकांना वाळू मिळत नव्हती. त्यामुळे बांधकामांची कामे ठप्प झाली होती. तहसील कार्यालयात वाळूच्या दोन्ही केंद्रांवरून बांधकामासाठी वाळूची विक्री सुरू होताच लाभार्थींची मोठी गर्दी उसळली आहे. चार दिवसांपासून लोकांची रांग असून अनेकांना माघारी परतावे लागत आहे.

उक्कलगाव येथील विनायक तांबे यांनी आपण चार दिवसांपासून शेतीची कामे सोडून तहसीलमध्ये येतो; मात्र दिवसभरात खूप कमी लोकांचे चलन भरले जाते. त्यामुळे माघारी जावे लागते. ६०० रुपये ब्रास वाळूसाठी दररोज पाचशे रुपयांचे नुकसान होत आहे. कामे सोडून दररोज श्रीरामपुरात यावे लागते, त्याचा खर्च वेगळाच, असे तांबे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर