शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

महा ई सेवा केंद्रांकडून विद्यार्थ्यांची लूट

By admin | Updated: June 25, 2016 00:39 IST

अण्णा नवथर/नागेश सोनवणे , अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील महा ई सेवा केंद्रांकडून दाखल्यांच्या नावाखाली विद्यार्थी व पालकांची सर्रास लूट सुरू असल्याचे

अण्णा नवथर/नागेश सोनवणे , अहमदनगरशहरासह जिल्ह्यातील महा ई सेवा केंद्रांकडून दाखल्यांच्या नावाखाली विद्यार्थी व पालकांची सर्रास लूट सुरू असल्याचे वास्तव ‘लोकमत टीम’ने शुक्रवारी केलेल्या स्टिंगदरम्यान उघड झाले. नगर शहरात दाखल्यांसाठी प्रत्येकी ७० तर, जिल्ह्यात दीडशे रुपये आकारले जात आहे. प्रशासनाने मात्र बघ्याची भूमिका घेतल्याचेही स्टींगमधून समोर आले आहे़शाळा व महाविद्यालयांच्या प्रवेशाची लगबग सध्या सुरू आहे़ शाळा प्रवेशासाठी आवश्यक दाखले मिळविण्यासाठी शहरासह जिल्ह्यातील महा ईसेवा केंद्रांवर विद्यार्थी व पालकांची गर्दी झाली आहे़ प्रत्येक दाखल्यांसाठी ३२ रुपये ८० पैसे इतके शुल्क आकारावे, असा सेतू समितीचा निर्णय आहे़ मात्र त्यापेक्षा जास्तीचे शुल्क महाईसेवा केंद्र चालक आकारत असल्याच्या विद्यार्थी व पालकांच्या तक्रारी आहेत़ या पार्श्वभूमीवर ‘लोकमत प्रतिनिधींनी’ शहरातील नगर तहसील कार्यालय, नवनागापूर, सावेडी, बुरुडगाव, नालेगाव आदी ठिकाणी भेटी दिल्या़ दाखला काढायचा आहे, किती रुपये लागतील, अशी विचारणा केंद्रातील कर्मचाऱ्यांना केली असता या केंद्रात ७० रुपये लागतील, असे उत्तर मिळाले़ याशिवाय नागापूरसह तालुक्यातील विविध केंद्रांवर एका दाखल्यासाठी दीडशे रुपये लागतील, असे सांगण्यात आले़ जिल्ह्यातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही़ ग्रामीण भागात एका दाखल्यासाठी सर्रास दीडशे रुपये शुल्क आकारले जात असून, यावर कळस असाकी पैसे देऊन तत्काळ दाखला मिळत नाही़ नोंदणी केल्यानंतर सहा ते आठ दिवसांनी दाखला मिळतो़ महाईसेवा केंद्रांना दाखल्यांचे दरपत्रक लावण्याचे निर्देश सेतू समितीचे अध्यक्ष दत्तात्रय बोरुडे यांनी गेल्या शुक्रवारीच दिले आहेत़ मात्र त्याचीही अंमलबजावणी केंद्र चालकांकडून झाल्याचे दिसले नाही़ एकाही केंद्रावर दरपत्रक लावलेले नाही़ दरपत्रक न लावता दुपटीने शुल्क आकारले जात असून, यावर प्रशासकीय यंत्रणेचे नियंत्रण नाही़ महाईसेवा केंद्रांची तपासणी करण्याचे तहसीलदारांना आदेश देण्यात आले आहेत़ त्यांच्याकडून केंद्रांची तपासणी होत नसल्याने सेतू चालकांची मनमानी वाढली असल्याचे बोलले जात आहे़ लोकमतच्या प्रतिनिधींनी विद्यार्थी बनून दाखल्यांची मागणी केली़ आमचा प्रतिनिधी व केंद्रांतील कर्मचारी यांच्यातील संभाषण पुढीलप्रमाणे़प्रतिनिधी- दाखला काढायचा आहे.कर्मचारी- कोणता दाखला हवा आहे?प्रतिनिधी- उत्पन्नाचा दाखल काढायचा आहे.कर्मचारी-अर्जासाठी १० रुपये द्या.प्रतिनिधी- एकूण किती रुपये लागतील?कर्मचारी- एका दाखल्यासाठी ७० रुपये लागतील.दाखले काढण्यासाठी आलेल्या काही विद्यार्थ्यांशी प्रतिनिधींनी चर्चा केली असता, त्यांनी ७० रुपये दिले असल्याचे सांगितले़ दाखला कोणताही घेतला तरी ७० रुपये द्यावे लागतात़ पैसे दिल्यानंतर नोंदणी करून घेतली जाते़ त्यानंतर सहा दिवसांनी दाखला मिळतो, असे काही विद्यार्थ्यांनी सांगितले़ शासकीय दराबाबत विद्यार्थ्यांकडे चौकशी केली असता माहिती नाही, असे अनेकांनी सांगितले़ जिल्हा सेतू समितीचे ई सेवा केंद्रांवर नियंत्रण असते़ महा ई सेवा सुरू करताना त्यासाठी सेतू समितीने नियम निश्चित केले आहेत़ मात्र त्याची अंमलबजावणी महा ई सेवा केंद्रांकडून होताना दिसत नाही़ दरपत्रक लावणे, दाखला मिळण्याची मुदत, दाखल्यांसाठी विद्यार्थी व पालकांना पाठवू नये, यासारखे नियम आहेत़ परंतु, त्याचे पालन होत नाही़