शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

राज्यमार्ग सात तास ठप्प

By admin | Updated: December 16, 2015 23:09 IST

राशीन : कुकडीचे हक्काचे पाणी मिळावे, या मागणीसाठी दौंड-उस्मानाबाद महामार्गावर कर्जत तालुक्यातील धुमकाई फाट्यावर शेतकऱ्यांनी अचानक रास्ता रोको केला़

राशीन : कुकडीचे हक्काचे पाणी मिळावे, या मागणीसाठी दौंड-उस्मानाबाद महामार्गावर कर्जत तालुक्यातील धुमकाई फाट्यावर शेतकऱ्यांनी अचानक रास्ता रोको केला़ सुमारे सात तास सुरू असलेले आंदोलन पाणी सोडण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर मागे घेण्यात आले़ सध्या कुकडीचे आवर्तन सुरू आहे़ या आवर्तनातून हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी बुधवारी सकाळी बारडगाव दगडी, तळवडी, येसवडी, पिंपळवाडी, करमनवाडी येथील शेकडो शेतकरी अचानक दौंड-उस्मानाबाद महामार्गावर आले़ धुमकाई फाट्यावर महामार्गाच्या मधोमध बसकन मांडून रास्तारोको आंदोलन सुरू केले़ ‘टेल टू हेड’ पाणी सोडलेले असताना आम्हाला पाणी देण्यास अधिकारी का टाळाटाळ करतात, प्रत्येक आवर्तनावेळी आम्हाला आंदोलन करण्याची पाळी का येते, असे प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केले़ सकाळी ९ वाजता अचानक पुकारलेल्या रास्ता रोको आंदोलनाला सहा तास उलटूनही कुकडी विभागाचा एकही अधिकारी आंदोलनस्थळी फिरकला नाही़ त्यामुळे पाणी मिळाल्याशिवाय रस्त्यावरून उठणार नाही, असा पवित्रा घेत शेतकऱ्यांनी कुकडी प्रशासनविरोधात धिक्काराच्या घोषणा दिल्या़ या आंदोलनात शहाजी कदम, शशिकांत लेहणे, बाळासाहेब मरळ, सुभाष राऊत, दादासाहेब कांबळे, शिवाजी गुळमे, मनोहर राऊत, काशिनाथ थोरात, नवनाथ शिंदे, अशोक तुरकुंडे, अशोक बनसोडे, डॉ. रवींद्र जंजिरे, तात्याराम गवळी, दत्तू पाटील, शिवाजी तुरकुंडे, भाऊसाहेब राऊत आदींनी सहभाग घेतला़ रास्ता रोको आंदोलन सात तास चालल्याने दौंड-उस्मानाबाद महामार्गावर वाहनांनी मोठी कोंडी झाली होती. (वार्ताहर)