शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
4
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
5
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
6
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
7
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
8
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
9
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
10
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
11
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
12
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
13
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
14
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
15
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
16
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
18
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
19
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
20
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार

शहरातील रस्ते अंधारात

By admin | Updated: March 17, 2016 23:41 IST

अहमदनगर : महावितरणची महापालिकेकडे असलेली अडीच कोटी रुपयांची थकबाकी वसुलीसाठी वीज तोडण्याची कारवाई महावितरण कंपनीकडून गुरूवारी करण्यात आली.

अहमदनगर : महावितरणची महापालिकेकडे असलेली अडीच कोटी रुपयांची थकबाकी वसुलीसाठी वीज तोडण्याची कारवाई महावितरण कंपनीकडून गुरूवारी करण्यात आली. या कारवाईमुळे नगर शहरातील रस्ते अंधारमय झाले आहेत.शहरातील पथदिव्यांसाठी महापालिका महावितरण कंपनीकडून वीज घेते. त्याचे वीज बिल महापालिकेकडून महावितरण कंपनीला अदा करते. अहमदनगर महापालिकेकडे महावितरणची ५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसुलीसाठी महावितरण कंपनीने महापालिकेकडे पाठपुरावा केला. मात्र नेहमीप्रमाणे देऊ असे उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले. वीज बिल अदा केले नाहीतर वीज तोडण्याची नोटीस महावितरण कंपनीने महापालिकेला पाठविली. मात्र त्यालाही महापालिकेने गांभीर्याने घेतले नाही. शहर विभागाच्या उपकार्यकारी अभियंता भालेराव यांनी स्वत: महापालिकेत पाच वेळेस पाठपुरावा केला. त्यालाही महापालिकेने प्रतिसाद दिला नाही. वसुलीसाठी अखेर महापालिकेची वीज तोडण्याचा निर्णय महावितरण कंपनीने घेतला. गुरूवारी दुपारनंतर वीज तोडण्यात आली. त्यामुळे महापालिकेचे शहरातील पथदिवे गुरूवारी रात्री लागलेच नाही. त्यानंतर नागरिकांना वीजजोड तोडल्याची माहिती समजली. माळीवाडा, बुरूडगाव, केडगाव, सारसनगर, भवानीनगर, टिळक रस्ता, पॉवर हाऊन परिसर पथदिवे न लागल्याने अंधारात बुडाला. (प्रतिनिधी)महापालिकेकडे महावितरण कंपनीची अडीच कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकी भरा अन्यथा वीज तोडण्याची नोटीस महावितरण कंपनीने पाठविली. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दुपारी साडेचार वाजता महापालिकेची वीज तोडण्यात आली.-भालेराव, उपकार्यकारी अभियंता,शहर विभाग.