शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

विदेशात शिकलो तरी शेतीशी नाळ कायम-ऋतुराज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 13:44 IST

विदेशात शिकलो असलो तरी मुळात आम्ही शेतकरी आहोत. त्यामुळे आमची शेतीशी नाळ कायम आहे. घरात मोठी राजकीय, सामाजिक परंपरा आहे. काम करताना याबाबींचे थोडे दडपण असते. मात्र गेल्या दहा वर्षापासून समाजात काम करत असल्याने आता दडपण वाटत नाही, असे विचार कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केले.

संगमनेर : विदेशात शिकलो असलो तरी मुळात आम्ही शेतकरी आहोत. त्यामुळे आमची शेतीशी नाळ कायम आहे. घरात मोठी राजकीय, सामाजिक परंपरा आहे. काम करताना याबाबींचे थोडे दडपण असते. मात्र गेल्या दहा वर्षापासून समाजात काम करत असल्याने आता दडपण वाटत नाही, असे विचार कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केले.संगमनेर येथील अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या मेधा २०२० युवा संस्कृतीत महोत्सवात संवाद तरुणाईशी या कार्यक्रमात प्रसिध्द गायक अवधूत गुप्ते यांनी घेतलेल्या मुलाखतीत आमदार पाटील बोलत होते. घरातील मोठ्यांचा वारसा सांभाळताना दडपण येते का? याबाबत पाटील म्हणाले, अगदी लहापणापासून डी.वाय.पाटील, सतेज पाटील यांचा संघर्ष जवळून पाहिला आहे. त्यांचे राजकीय, सामाजिक जीवन, त्यांची काम करण्याची पद्धत समजून घेतली. आता नवी पिढी म्हणून ही परंपरा सांभाळताना थोडे दडपण असते. समाजात काम करत असताना मागच्या पिढीची आणि नव्या पिढीच्या कामाची तुलना होते. त्यामुळे चांगले काम करावे लागते. कष्ट करावे लागतात. मी कायम कार्यकर्ता म्हणूनच काम करत आहे आणि करत राहणार, असे पाटील यांनी सांगितले.विदेशात शिक्षण घेतले तेथील वातावरण पाहून तेथेच रहावे वाटले नाही का? या प्रश्नावर पाटील म्हणाले, अमेरिकेत शिक्षण झाले. मात्र आमच्या कुटुंबाची परंपरा समाजसेवेची आहे. त्यामुळे आम्ही विदेशात राहणे शक्यच नाही. आपल्या मातृभूमीत काही तरी केले पाहिजे याची ओढ होतीच. आपले राज्य कसे पुढे गेले पाहिजे हाच मनात ठेऊन येथे आलो. त्यातूनतच सध्या समाजात काम करीत आहे, असेही पाटील म्हणाले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRuturaj Patilऋतुराज पाटीलSangamnerसंगमनेरinterviewमुलाखत