शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

विदेशात शिकलो तरी शेतीशी नाळ कायम-ऋतुराज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 13:44 IST

विदेशात शिकलो असलो तरी मुळात आम्ही शेतकरी आहोत. त्यामुळे आमची शेतीशी नाळ कायम आहे. घरात मोठी राजकीय, सामाजिक परंपरा आहे. काम करताना याबाबींचे थोडे दडपण असते. मात्र गेल्या दहा वर्षापासून समाजात काम करत असल्याने आता दडपण वाटत नाही, असे विचार कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केले.

संगमनेर : विदेशात शिकलो असलो तरी मुळात आम्ही शेतकरी आहोत. त्यामुळे आमची शेतीशी नाळ कायम आहे. घरात मोठी राजकीय, सामाजिक परंपरा आहे. काम करताना याबाबींचे थोडे दडपण असते. मात्र गेल्या दहा वर्षापासून समाजात काम करत असल्याने आता दडपण वाटत नाही, असे विचार कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केले.संगमनेर येथील अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या मेधा २०२० युवा संस्कृतीत महोत्सवात संवाद तरुणाईशी या कार्यक्रमात प्रसिध्द गायक अवधूत गुप्ते यांनी घेतलेल्या मुलाखतीत आमदार पाटील बोलत होते. घरातील मोठ्यांचा वारसा सांभाळताना दडपण येते का? याबाबत पाटील म्हणाले, अगदी लहापणापासून डी.वाय.पाटील, सतेज पाटील यांचा संघर्ष जवळून पाहिला आहे. त्यांचे राजकीय, सामाजिक जीवन, त्यांची काम करण्याची पद्धत समजून घेतली. आता नवी पिढी म्हणून ही परंपरा सांभाळताना थोडे दडपण असते. समाजात काम करत असताना मागच्या पिढीची आणि नव्या पिढीच्या कामाची तुलना होते. त्यामुळे चांगले काम करावे लागते. कष्ट करावे लागतात. मी कायम कार्यकर्ता म्हणूनच काम करत आहे आणि करत राहणार, असे पाटील यांनी सांगितले.विदेशात शिक्षण घेतले तेथील वातावरण पाहून तेथेच रहावे वाटले नाही का? या प्रश्नावर पाटील म्हणाले, अमेरिकेत शिक्षण झाले. मात्र आमच्या कुटुंबाची परंपरा समाजसेवेची आहे. त्यामुळे आम्ही विदेशात राहणे शक्यच नाही. आपल्या मातृभूमीत काही तरी केले पाहिजे याची ओढ होतीच. आपले राज्य कसे पुढे गेले पाहिजे हाच मनात ठेऊन येथे आलो. त्यातूनतच सध्या समाजात काम करीत आहे, असेही पाटील म्हणाले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRuturaj Patilऋतुराज पाटीलSangamnerसंगमनेरinterviewमुलाखत