शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कोरोना आणि रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:16 IST

कोरोनामुळे ॲडमिट कराव्या लागणाऱ्या रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्यामुळे होणाऱ्या गुंतागुंतीचे प्रमाण २०-३० टक्के आढळून आले आहे. त्यामुळे कोरोनाबाधित जे ...

कोरोनामुळे ॲडमिट कराव्या लागणाऱ्या रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्यामुळे होणाऱ्या गुंतागुंतीचे प्रमाण २०-३० टक्के आढळून आले आहे.

त्यामुळे कोरोनाबाधित जे रुग्ण ॲडमिट करावे लागतात, त्यांना रक्त पातळ करणारी औषधे देणे गरजेचे ठरते.

सौम्य कोरोनाबाधित रुग्ण ज्यांना ॲडमिट करायची गरज पडत नाही, त्यांना रक्त पातळ करणारी किंवा अँटी प्लेटलेट औषधे देण्याची गरज नाही.

कोरोनाबाधित रुग्णांमध्ये डिस्चार्जनंतर रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण हे जवळपास १.५ ते १.७ टक्के इतके आहे.

त्यामुळे डिस्चार्जनंतर कोरोनाबाधित रुग्णांना रक्त पातळ करणारी औषधे दिल्यास या गुंतागुंतीचा प्रतिबंध करता येतो.

लसीकरणानंतर मात्र अशी औषधे घेण्याची गरज नाही.

जर एखाद्या पेशंटला आधीपासूनच रक्त पातळ करणारी औषधे चालू असतील तर ती औषधे चालूच ठेवावी व उपचार करणाऱ्या डॉक्टरांना त्याची कल्पना द्यावी.

डी-डायमर (D-dimer) नावाची तपासणी करून रक्ताच्या गुठळ्या होऊन गुंतागुंत होण्याची शक्यता किती आहे, हे जाणून घेता येते; परंतु गरोदर स्त्रियांमध्ये ती तपासणी उपयोगी पडत नाही.

..............

-डॉ. अभिजित बाहेती, औरंगाबाद.

इंडियन मेडिकल असोसिएशन अहमदनगर शाखा.