शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
5
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
6
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
7
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
8
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
9
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
10
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
11
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
12
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
13
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
14
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
15
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
16
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
17
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
18
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
19
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
20
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?

महसूल अधिकार्‍यांचे होणार ‘मूल्य’मापन!

By admin | Updated: September 1, 2023 14:13 IST

अशोक निंबाळकर, अहमदनगर खासगी कंपन्यांमधील कर्मचार्‍यांप्रमाणेच सरकारी अधिकारी व कर्मचार्‍यांना आता ‘परफॉर्मन्स’ द्यावा लागणार आहे.

अशोक निंबाळकर, अहमदनगर खासगी कंपन्यांमधील कर्मचार्‍यांप्रमाणेच सरकारी अधिकारी व कर्मचार्‍यांना आता ‘परफॉर्मन्स’ द्यावा लागणार आहे. त्यावरच त्यांच्या ‘प्रगतिपुस्तका’चा आलेख अवलंबून राहील. ‘मूल्य’ घसरलेल्यांच्या ‘सर्व्हिस बुकात’ तशी नोंद होईल. या ‘मूल्य’मापनाचा कामचुकारांनी चांगलाच धसका घेतला आहे. स्वमूल्यमापनाची ही पद्धत नगरचे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी जिल्हा प्रशासनात आणली आहे. त्यांनी पुणे जि.प.त सीईओ असताना असेच उपक्रम राबविले होते. प्रशासन गतिमान व्हावे आणि सर्वसामान्यांची पिळवणूक थांबावी हा त्यामागे उद्देश आहे. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, अव्वल कारकून, सर्कल आणि तलाठ्यांनाही या मूल्यमापनास सामोरे जावे लागेल. येत्या १ जूनपासून त्यांच्या कामांचे मूल्यमापन होणार आहे. त्यासाठी त्यांना प्रशिक्षणही दिले आहे. एखाद्या कामासाठी किती वेळ, किती दिवस लागतील. त्यासाठी कोणती कागदपत्रे अपेक्षित आहेत. काम कोणत्या कार्यालयात होईल. याची माहिती नागरिकांना दिली जाईल. यासाठीही आराखडा तयार आहे. काम न झाल्यास संबंधित अधिकार्‍यास जाब विचारला जाईल. असा ठरेल स्कोअर योजना राबविणे, महसूल वसुली, जमीन अधिग्रहण, पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती, व्यवस्थापन, नावीन्यपूर्ण प्रयोग आदी १५ कामांसाठी गुणांक ठरवून दिले आहे. त्याप्रमाणे काम न झाल्यास गुण कमी होतील. अधिकारी नागरिकांशी कसे वागतात यासाठीही गुण आहेत. साप्ताहिक बैठकीद्वारे कामांचा आढावा, दप्तर तपासणी केली जाईल. वर्षाच्या शेवटी संबंधितांनीच कामाचे स्वमूल्यमापन करायचे आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी सर्वांचे प्रगतीपुस्तक तपासतील. परफॉर्मन्स देणार्‍यास ‘बक्षिसी’ आणि घसरलेल्यांना कारवाईस सामोरे जावे लागेल. कौतुकाची बाब - अण्णा नागरिकांना कायदे माहिती नसतात. त्यामुळे सरकारी अधिकारी त्यांची अडवणूक करतात. हे टाळण्यासाठी लोकपालसह ‘नागरिकांची सनद’ची मागणी आहे. नगरचे जिल्हाधिकारी कवडे त्याची अंमलबजावणी करीत असतील तर कौतुकाची बाब आहे. मात्र, सर्व जिल्हाधिकार्‍यांनी असा प्रयोग करायला हवा. तरच भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि नागरिकांचे हेलपाटे वाचतील, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले़ एक कोटीचा खर्च क्रयशक्ती वाढविण्यासाठी सुविधा पुरविण्यात येतील. मानसिकता बदलासाठी वेळोवेळी प्रशिक्षण शिबिरे घेतली जातील. त्यांच्या नेमक्या गरजा काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी खासगी संस्था सर्व्हे करणार आहे. हा अभिनव उपक्रम राबविण्यासाठी सुमारे एक कोटी रूपयांची आवश्यकता आहे. तो निधी डीपीडीसीतून उपलब्ध केला जाईल. हा उपक्रम सरकारी नियमानुसार आहे, असे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी सांगितले़