शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

अहमदनगर जिल्ह्यातील महसूल प्रशासनच वाळूतस्करीचे भागीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 11:46 IST

जिल्ह्यात वाळूचे बेकायदेशीर उत्खनन सुरु असताना अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, जिल्हा खनिकर्म अधिकारी संजय बामणे आणि तालुक्यांचे तहसीलदार दुर्लक्ष करत आहेत. हे अधिकारी वाळूबाबत ठोस कारवाई करत तर नाहीच, पण नदीपात्रांत पाणी असल्याचे माहिती असतानाही ठेके काढून अवैध वाळू उपशाला प्रोत्साहन दिले जात आहे. तहसीलदारांना दिलेली माहिती काही क्षणात ठेकेदारांपर्यंत पोहोचते याचा अनुभव आज ‘लोकमत’नेच घेतला. 

ठळक मुद्देअधिकाऱ्यांची ठेकेदारांशी मिलीभगत भानुदास पालवे, खनिकर्म अधिकारी बामणे यांचे अवैध उपशाकडे दुर्लक्षनदीत पाणी असतानाही वाळूचे लिलाव राहुरी तालुक्यातील प्रकारतहसीलदारच देतात ठेकेदारांना माहिती

सुधीर लंकेअहमदनगर : जिल्ह्यात वाळूचे बेकायदेशीर उत्खनन सुरु असताना अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, जिल्हा खनिकर्म अधिकारी संजय बामणे आणि तालुक्यांचे तहसीलदार दुर्लक्ष करत आहेत. हे अधिकारी वाळूबाबत ठोस कारवाई करत तर नाहीच, पण नदीपात्रांत पाणी असल्याचे माहिती असतानाही ठेके काढून अवैध वाळू उपशाला प्रोत्साहन दिले जात आहे. तहसीलदारांना दिलेली माहिती काही क्षणात ठेकेदारांपर्यंत पोहोचते याचा अनुभव आज ‘लोकमत’नेच घेतला. श्रीगोंदा तालुक्यात भीमा नदीपात्रात पाणी असतानाही महसूल प्रशासनाने वाळूचा लिलाव केला होता. नदीत पाणी असताना वाळू उपसता येत नाही. असे असताना अजनूज येथे ठेकेदारांनी यांत्रिक बोटी लावून उपसा सुरु केला. याबाबत ‘लोकमत’मध्ये पुराव्यांसह वृत्त प्रकाशित होताच उपसा बंद करण्यात आला. अर्थात यांत्रिक बोटींच्या सहाय्याने वाळू उपसा केला जात असल्याचे आढळले नाही, अशी सारवासारव तेव्हा महसूल प्रशासनाने केली.  सध्याही राहुरी तालुक्यात मुळा नदीपात्रात पाणी आहे. असे असतानाही महसूल प्रशासनाने बारागाव नांदूर व इतर ठिकाणचे लिलाव काढले. पाणी असतानाही हा वाळूउपसा सुरु झाला आहे. याकडे तहसीलदार, जिल्हा खनिकर्म अधिकारी व अप्पर जिल्हाधिकारीही सोयीस्कर कानाडोळा करताना दिसत आहेत. यासंदर्भात काही नागरिकांनी ‘लोकमत’ला माहिती कळवली. बारागाव नांदूरला उपसा सुरु आहे का? याबाबत ‘लोकमत’ने तहसीलदारांकडे विचारणा करताच काही क्षणात उपसा बंद झाला. या उपशाबाबत कारवाई काय झाली हे समजू शकले नाही, मात्र ‘लोकमत’ने तहसीलदारांकडे तक्रार केल्याची बाब संबंधित यंत्रणेपर्यंत तत्काळ पोहोचली होती. 

बारागाव नांदूर येथे वाळूउपसा सुरु असल्याची छायाचित्रे ‘लोकमत’ला मिळाली होती. ही बाब ‘लोकमत’ने बुधवारी दुपारी राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर काही काळातच कारवाई न होता वाळूउपसा बंद झाला. तहसीलदारांना दिलेली माहिती ठेकेदारापर्यंत कशी पोहोचली ? असा प्रश्न यातून निर्माण होतो.याबाबत तहसीलदार दौंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता रात्रीपर्यंत त्यांनी दूरध्वनीला प्रतिसाद दिला नाही. ‘अधिकारीच वाळू ठेकेदारांना मिळाले आहेत का?’ असा प्रश्न ‘लोकमत’ने अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांना केला असता त्यांनीही बोलण्याचे टाळत फोन बंद केला.

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नमहसूल प्रशासनाला मिळणारी माहिती तहसीलदारांकडून गोपनीय राहत नसेल तर कायदा सुव्यवस्थेचाच प्रश्न आहे. नागरिकांच्या जीवितालाही यातून धोका आहे. वाळूतस्करांकडून हल्ले झाले की अधिकारी संघटितपणे ओरड करतात. मात्र, वाळूच्या उत्खननाबाबत महसूल प्रशासनाला मिळणारी माहिती बाहेर जाते कशी? याबाबत जिल्हाधिका-यांपासून कुणीही शहानिशा करत नाही. पोलीसही या प्रकाराकडे दुर्लक्ष करत आहेत.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcollectorजिल्हाधिकारीRahuriराहुरी