शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर जिल्ह्यातील महसूल प्रशासनच वाळूतस्करीचे भागीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 11:46 IST

जिल्ह्यात वाळूचे बेकायदेशीर उत्खनन सुरु असताना अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, जिल्हा खनिकर्म अधिकारी संजय बामणे आणि तालुक्यांचे तहसीलदार दुर्लक्ष करत आहेत. हे अधिकारी वाळूबाबत ठोस कारवाई करत तर नाहीच, पण नदीपात्रांत पाणी असल्याचे माहिती असतानाही ठेके काढून अवैध वाळू उपशाला प्रोत्साहन दिले जात आहे. तहसीलदारांना दिलेली माहिती काही क्षणात ठेकेदारांपर्यंत पोहोचते याचा अनुभव आज ‘लोकमत’नेच घेतला. 

ठळक मुद्देअधिकाऱ्यांची ठेकेदारांशी मिलीभगत भानुदास पालवे, खनिकर्म अधिकारी बामणे यांचे अवैध उपशाकडे दुर्लक्षनदीत पाणी असतानाही वाळूचे लिलाव राहुरी तालुक्यातील प्रकारतहसीलदारच देतात ठेकेदारांना माहिती

सुधीर लंकेअहमदनगर : जिल्ह्यात वाळूचे बेकायदेशीर उत्खनन सुरु असताना अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, जिल्हा खनिकर्म अधिकारी संजय बामणे आणि तालुक्यांचे तहसीलदार दुर्लक्ष करत आहेत. हे अधिकारी वाळूबाबत ठोस कारवाई करत तर नाहीच, पण नदीपात्रांत पाणी असल्याचे माहिती असतानाही ठेके काढून अवैध वाळू उपशाला प्रोत्साहन दिले जात आहे. तहसीलदारांना दिलेली माहिती काही क्षणात ठेकेदारांपर्यंत पोहोचते याचा अनुभव आज ‘लोकमत’नेच घेतला. श्रीगोंदा तालुक्यात भीमा नदीपात्रात पाणी असतानाही महसूल प्रशासनाने वाळूचा लिलाव केला होता. नदीत पाणी असताना वाळू उपसता येत नाही. असे असताना अजनूज येथे ठेकेदारांनी यांत्रिक बोटी लावून उपसा सुरु केला. याबाबत ‘लोकमत’मध्ये पुराव्यांसह वृत्त प्रकाशित होताच उपसा बंद करण्यात आला. अर्थात यांत्रिक बोटींच्या सहाय्याने वाळू उपसा केला जात असल्याचे आढळले नाही, अशी सारवासारव तेव्हा महसूल प्रशासनाने केली.  सध्याही राहुरी तालुक्यात मुळा नदीपात्रात पाणी आहे. असे असतानाही महसूल प्रशासनाने बारागाव नांदूर व इतर ठिकाणचे लिलाव काढले. पाणी असतानाही हा वाळूउपसा सुरु झाला आहे. याकडे तहसीलदार, जिल्हा खनिकर्म अधिकारी व अप्पर जिल्हाधिकारीही सोयीस्कर कानाडोळा करताना दिसत आहेत. यासंदर्भात काही नागरिकांनी ‘लोकमत’ला माहिती कळवली. बारागाव नांदूरला उपसा सुरु आहे का? याबाबत ‘लोकमत’ने तहसीलदारांकडे विचारणा करताच काही क्षणात उपसा बंद झाला. या उपशाबाबत कारवाई काय झाली हे समजू शकले नाही, मात्र ‘लोकमत’ने तहसीलदारांकडे तक्रार केल्याची बाब संबंधित यंत्रणेपर्यंत तत्काळ पोहोचली होती. 

बारागाव नांदूर येथे वाळूउपसा सुरु असल्याची छायाचित्रे ‘लोकमत’ला मिळाली होती. ही बाब ‘लोकमत’ने बुधवारी दुपारी राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर काही काळातच कारवाई न होता वाळूउपसा बंद झाला. तहसीलदारांना दिलेली माहिती ठेकेदारापर्यंत कशी पोहोचली ? असा प्रश्न यातून निर्माण होतो.याबाबत तहसीलदार दौंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता रात्रीपर्यंत त्यांनी दूरध्वनीला प्रतिसाद दिला नाही. ‘अधिकारीच वाळू ठेकेदारांना मिळाले आहेत का?’ असा प्रश्न ‘लोकमत’ने अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांना केला असता त्यांनीही बोलण्याचे टाळत फोन बंद केला.

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नमहसूल प्रशासनाला मिळणारी माहिती तहसीलदारांकडून गोपनीय राहत नसेल तर कायदा सुव्यवस्थेचाच प्रश्न आहे. नागरिकांच्या जीवितालाही यातून धोका आहे. वाळूतस्करांकडून हल्ले झाले की अधिकारी संघटितपणे ओरड करतात. मात्र, वाळूच्या उत्खननाबाबत महसूल प्रशासनाला मिळणारी माहिती बाहेर जाते कशी? याबाबत जिल्हाधिका-यांपासून कुणीही शहानिशा करत नाही. पोलीसही या प्रकाराकडे दुर्लक्ष करत आहेत.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcollectorजिल्हाधिकारीRahuriराहुरी