शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

परतीच्या पावसाने बंधारे-तलाव ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2016 00:47 IST

अहमदनगर : परतीच्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून दुष्काळी नगर तालुक्याला अक्षरश: झोडपून काढले आहे. जोरदार पावसामुळे नगर तालुक्यातील बहुतेक ठिकाणचे बंधारे

अहमदनगर : परतीच्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून दुष्काळी नगर तालुक्याला अक्षरश: झोडपून काढले आहे. जोरदार पावसामुळे नगर तालुक्यातील बहुतेक ठिकाणचे बंधारे, तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. जलयुक्त शिवाराला या पावसाने दिलासा दिला आहे. गुंडेगावमध्ये पावसाने तांडव केल्याने सारे गाव जलमय झाले आहे. अनेक नद्या व ओढ्यांना पूर आल्याने विहिरीची पातळी झपाट्याने वाढली असून या पावसामुळे सारा नगर तालुका सुखावला आहे.गेल्या दोन दिवसापासून नगर तालुक्याला पावसाने जोर धरला आहे. चिचोंडीपाटील येथील केळ तलाव पूर्ण भरला असून सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहू लागले आहे. भातोडी, मांडवे येथे जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मेहकरी नदी तब्बल सात वर्षानंतर पहिल्यांदा वाहती झाली आहे. यामुळे या भागात समाधान व्यक्त होत आहे. जेऊर परिसरात जोरदार पावसाने उच्छाद मांडला, तर इमामपूरमधील व आसपासच्या गावातील बंधारे तुडूंब भरल्याने ओसंडून वाहत आहेत. तालुक्यातील डोंगरगण, मांजरसुंबा भागात बंधारे भरले असून धबधबे खळखळून वाहते झाले आहेत. पिंपळगाव माळवी, कापुरवाडी या मोठ्या तलावात पावसाची आवक सुरु झाल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे. नारायण डोहो, दरेवाडी, मेहकरी, जांब, कौडगाव, आठवड या भागात जोरदार पावसाने दुष्काळी शाप धुऊन टाकला. चास, कामरगाव, भोयरे पठार परिसरात हस्ताच्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला. अनेक गावांची पाण्यासाठी होणारी भटकंती या पावसाने बंद केल्याने पाण्यापासून वंचित असणाऱ्या अनेक गावांना या पावसाने सुखद दिलासा दिल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. वाळकी, मठपिंप्री, हातवळण, रुई या गावांना जोरदार पावसाने झोडपले आहे.(तालुका प्रतिनिधी)सुमारे साडे तीन वर्षापूर्वी लोकसहभागातून केलेल्या ४७ लाख रुपयांच्या १५ कि.मी.नदी खोलीकरण व रुंदीकरण तसेच लाखो वृक्ष लागवडीने या गावाने टँकरला दोन वर्षापासून बाय-बाय केला तसेच सततच्या दुष्काळावर कायमची मात केली. परतीच्या पावसाने गावातील १६ बंधारे ओव्हरफ्लो झाले असून सारे गाव जलमय झाले आहे. गावतील तलाव भरल्याने शेजारील देऊळगाव,राळेगणम्हसोबा या गावांना ओव्हरफ्लो पाण्याचा लाभ मिळाला आहे. पावसाने गावातील साडे चार हजार क्षेत्र ओलिताखाली येणार असून सर्व क्षेत्र आता बागायती होणार असल्याने गुंडेगाव दुष्काळमुक्त झाले आहे, असे जि.प.सदस्य बाळासाहेब हराळ यांनी सांगितले.खडकी, खंडाला, बाबुर्डी बेंद या परिसरात आजच्या पावसाने शेतात पाणी साचले. सारोळा कासार, अकोळनेर, भोरवादी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने टँकरसाठी धावाधाव करण्यापासून तूर्त या गावांची सुटका झाली आहे. सारोळा कासार येथे सुमारे ५० लाख रुपये खर्च करून जलयुक्तचे काम करण्यात आले पण पावसाने हुलकावणी दिल्याने येथे मोठ्या पावसाची प्रतीक्षा होती. ती दोन दिवसापासून पडणाऱ्या पावसाने संपवली.