शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
4
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
5
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
6
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
7
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
8
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
9
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
10
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
11
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
12
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
13
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
14
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
15
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
16
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
17
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
18
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

स्वच्छतेची जबाबदारी नागरिकांचीही..

By admin | Updated: December 15, 2015 23:14 IST

अहमदनगर: नागरिक स्वच्छतेबाबत जागरुक नाहीत, असा जो आरोप केला जातो, तो सपशेल चुकीचा आहे़ स्वच्छतेबाबत नागरिक जागृत आहेतच़ त्यांना स्वच्छता हवी आहे

अहमदनगर: नागरिक स्वच्छतेबाबत जागरुक नाहीत, असा जो आरोप केला जातो, तो सपशेल चुकीचा आहे़ स्वच्छतेबाबत नागरिक जागृत आहेतच़ त्यांना स्वच्छता हवी आहे आणि त्यासाठी स्वत: ही जबाबदार आहेत, अशी ८० टक्के नागरिकांची मानसिकता असल्याचे ‘लोकमत’ ने केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे़ शहर स्वच्छतेबाबत ‘लोकमत’ कडून मंगळवारी शहरासह उपनगरांत सर्वेक्षण करण्यात आले़ सर्वेक्षणात नागरिकांना एकूण पाच प्रश्न विचारण्यात आले होते़ स्वत:चे घर, अंगण, कॉलनी आणि शहर स्वच्छतेबाबत नागरिकांना काय वाटते, ते जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला़ नागरिकांना पाच प्रश्न विचारले गेले़ या पाचही प्रश्नांची उत्तरे होय किंवा नाही, अशाच स्वरुपात दिली़ स्वत: चे घर स्वच्छ ठेवता का? या प्रश्नाचे १०० टक्के नागरिकांनी ‘होय’ असे उत्तर दिले आहे़ आपण आपले अंगण स्वच्छ ठेवता का? या प्रश्नावर १०० टक्के नागरिकांनी ‘होय’ अंगण स्वच्छ ठेवतो, असे उत्तर दिले़ घरासोबतच शहरातील १०० टक्के नागरिक आपण राहत असलेली कॉलनी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतात़ कॉलनीतील कचऱ्याची विल्हेवाट लावता का? या प्रश्नावर कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नाही, असेही नागरिकांकडून सांगण्यात आले़ कॉलनीतील कचऱ्याची विल्हेवाट लावतो, असे उत्तर देणाऱ्या नागरिकांची टक्केवारी ८० टक्के आहे़ तर कचऱ्याची विल्हेवाट लावत नाही, अशी स्पष्ट कबुलीच २० टक्के नागरिकांनी दिली़ स्वच्छ भारत अभियानही सध्या जोरात आहे़ या अभियानांतर्गत सप्तपदींची शपथही नागरिकांना दिली गेली़ शहरात स्वच्छता दूत नेमण्यात आले़ स्वच्छतेनिमित्त अनेक कार्यक्रमही घेण्यात आले़ पण, शहरातील कचऱ्यांचे ढीग अद्याप ओसरलेले नाहीत़ स्वच्छतेची जबाबदारी प्रशासनाची आहे़ स्वच्छतेबाबत नागरिक जागृक नाहीत, असा सूर प्रशासनात आहे़ प्रत्यक्षात मात्र वेगळी स्थिती आहे़ नागरिक स्वच्छतेबाबत जागृत आहेत़ शहरातील असस्वच्छतेला नागरिकही जबाबदार आहेत, तशी कबुलीही ८० टक्के नागरिकांनी दिली आहे़ तर १० टक्के नागरिकांना हा प्रश्न निटसा समजला नाही़ त्यांनी या प्रश्नावर सांगता येत नाही, असे उत्तर दिले असून, अस्वच्छतेला नागरिक जबाबदार नाहीत, असे १० टक्के नागरिकांचे मत आहे़ (प्रतिनिधी)