शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेची जबाबदारी नागरिकांचीही..

By admin | Updated: December 15, 2015 23:14 IST

अहमदनगर: नागरिक स्वच्छतेबाबत जागरुक नाहीत, असा जो आरोप केला जातो, तो सपशेल चुकीचा आहे़ स्वच्छतेबाबत नागरिक जागृत आहेतच़ त्यांना स्वच्छता हवी आहे

अहमदनगर: नागरिक स्वच्छतेबाबत जागरुक नाहीत, असा जो आरोप केला जातो, तो सपशेल चुकीचा आहे़ स्वच्छतेबाबत नागरिक जागृत आहेतच़ त्यांना स्वच्छता हवी आहे आणि त्यासाठी स्वत: ही जबाबदार आहेत, अशी ८० टक्के नागरिकांची मानसिकता असल्याचे ‘लोकमत’ ने केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे़ शहर स्वच्छतेबाबत ‘लोकमत’ कडून मंगळवारी शहरासह उपनगरांत सर्वेक्षण करण्यात आले़ सर्वेक्षणात नागरिकांना एकूण पाच प्रश्न विचारण्यात आले होते़ स्वत:चे घर, अंगण, कॉलनी आणि शहर स्वच्छतेबाबत नागरिकांना काय वाटते, ते जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला़ नागरिकांना पाच प्रश्न विचारले गेले़ या पाचही प्रश्नांची उत्तरे होय किंवा नाही, अशाच स्वरुपात दिली़ स्वत: चे घर स्वच्छ ठेवता का? या प्रश्नाचे १०० टक्के नागरिकांनी ‘होय’ असे उत्तर दिले आहे़ आपण आपले अंगण स्वच्छ ठेवता का? या प्रश्नावर १०० टक्के नागरिकांनी ‘होय’ अंगण स्वच्छ ठेवतो, असे उत्तर दिले़ घरासोबतच शहरातील १०० टक्के नागरिक आपण राहत असलेली कॉलनी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतात़ कॉलनीतील कचऱ्याची विल्हेवाट लावता का? या प्रश्नावर कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नाही, असेही नागरिकांकडून सांगण्यात आले़ कॉलनीतील कचऱ्याची विल्हेवाट लावतो, असे उत्तर देणाऱ्या नागरिकांची टक्केवारी ८० टक्के आहे़ तर कचऱ्याची विल्हेवाट लावत नाही, अशी स्पष्ट कबुलीच २० टक्के नागरिकांनी दिली़ स्वच्छ भारत अभियानही सध्या जोरात आहे़ या अभियानांतर्गत सप्तपदींची शपथही नागरिकांना दिली गेली़ शहरात स्वच्छता दूत नेमण्यात आले़ स्वच्छतेनिमित्त अनेक कार्यक्रमही घेण्यात आले़ पण, शहरातील कचऱ्यांचे ढीग अद्याप ओसरलेले नाहीत़ स्वच्छतेची जबाबदारी प्रशासनाची आहे़ स्वच्छतेबाबत नागरिक जागृक नाहीत, असा सूर प्रशासनात आहे़ प्रत्यक्षात मात्र वेगळी स्थिती आहे़ नागरिक स्वच्छतेबाबत जागृत आहेत़ शहरातील असस्वच्छतेला नागरिकही जबाबदार आहेत, तशी कबुलीही ८० टक्के नागरिकांनी दिली आहे़ तर १० टक्के नागरिकांना हा प्रश्न निटसा समजला नाही़ त्यांनी या प्रश्नावर सांगता येत नाही, असे उत्तर दिले असून, अस्वच्छतेला नागरिक जबाबदार नाहीत, असे १० टक्के नागरिकांचे मत आहे़ (प्रतिनिधी)