शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

स्वच्छतेची जबाबदारी नागरिकांचीही..

By admin | Updated: December 15, 2015 23:14 IST

अहमदनगर: नागरिक स्वच्छतेबाबत जागरुक नाहीत, असा जो आरोप केला जातो, तो सपशेल चुकीचा आहे़ स्वच्छतेबाबत नागरिक जागृत आहेतच़ त्यांना स्वच्छता हवी आहे

अहमदनगर: नागरिक स्वच्छतेबाबत जागरुक नाहीत, असा जो आरोप केला जातो, तो सपशेल चुकीचा आहे़ स्वच्छतेबाबत नागरिक जागृत आहेतच़ त्यांना स्वच्छता हवी आहे आणि त्यासाठी स्वत: ही जबाबदार आहेत, अशी ८० टक्के नागरिकांची मानसिकता असल्याचे ‘लोकमत’ ने केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे़ शहर स्वच्छतेबाबत ‘लोकमत’ कडून मंगळवारी शहरासह उपनगरांत सर्वेक्षण करण्यात आले़ सर्वेक्षणात नागरिकांना एकूण पाच प्रश्न विचारण्यात आले होते़ स्वत:चे घर, अंगण, कॉलनी आणि शहर स्वच्छतेबाबत नागरिकांना काय वाटते, ते जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला़ नागरिकांना पाच प्रश्न विचारले गेले़ या पाचही प्रश्नांची उत्तरे होय किंवा नाही, अशाच स्वरुपात दिली़ स्वत: चे घर स्वच्छ ठेवता का? या प्रश्नाचे १०० टक्के नागरिकांनी ‘होय’ असे उत्तर दिले आहे़ आपण आपले अंगण स्वच्छ ठेवता का? या प्रश्नावर १०० टक्के नागरिकांनी ‘होय’ अंगण स्वच्छ ठेवतो, असे उत्तर दिले़ घरासोबतच शहरातील १०० टक्के नागरिक आपण राहत असलेली कॉलनी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतात़ कॉलनीतील कचऱ्याची विल्हेवाट लावता का? या प्रश्नावर कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नाही, असेही नागरिकांकडून सांगण्यात आले़ कॉलनीतील कचऱ्याची विल्हेवाट लावतो, असे उत्तर देणाऱ्या नागरिकांची टक्केवारी ८० टक्के आहे़ तर कचऱ्याची विल्हेवाट लावत नाही, अशी स्पष्ट कबुलीच २० टक्के नागरिकांनी दिली़ स्वच्छ भारत अभियानही सध्या जोरात आहे़ या अभियानांतर्गत सप्तपदींची शपथही नागरिकांना दिली गेली़ शहरात स्वच्छता दूत नेमण्यात आले़ स्वच्छतेनिमित्त अनेक कार्यक्रमही घेण्यात आले़ पण, शहरातील कचऱ्यांचे ढीग अद्याप ओसरलेले नाहीत़ स्वच्छतेची जबाबदारी प्रशासनाची आहे़ स्वच्छतेबाबत नागरिक जागृक नाहीत, असा सूर प्रशासनात आहे़ प्रत्यक्षात मात्र वेगळी स्थिती आहे़ नागरिक स्वच्छतेबाबत जागृत आहेत़ शहरातील असस्वच्छतेला नागरिकही जबाबदार आहेत, तशी कबुलीही ८० टक्के नागरिकांनी दिली आहे़ तर १० टक्के नागरिकांना हा प्रश्न निटसा समजला नाही़ त्यांनी या प्रश्नावर सांगता येत नाही, असे उत्तर दिले असून, अस्वच्छतेला नागरिक जबाबदार नाहीत, असे १० टक्के नागरिकांचे मत आहे़ (प्रतिनिधी)