शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

‘महाकरंडक’ला राज्यभरातून प्रतिसाद

By admin | Updated: December 22, 2015 23:11 IST

अहमदनगर : महाकरंडक’ एकांकिका स्पर्धेला यंदा राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, दहा दिवसांत प्राथमिक फेरीसाठी तब्बल ५० प्रवेशिका आल्या आहेत़

अहमदनगर : महाराष्ट्रातील सर्वांत मोठी एकांकिका स्पर्धा म्हणून गौरविलेल्या ‘अहमदनगर महाकरंडक’ एकांकिका स्पर्धेला यंदा राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, दहा दिवसांत प्राथमिक फेरीसाठी तब्बल ५० प्रवेशिका आल्या आहेत़ स्पर्धेच्या अंतिम फेरीला नगर शहरात २१ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे़ यंदा या स्पर्धेचे आयोजन पूर्णत: डिजिटल पद्धतीने करण्यात आले आहे़ प्रवेश अर्ज आॅनलाईन, परीक्षकांचे आयपॅडवर परीक्षण तर सहभागी सर्व कलाकारांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध, असे स्पर्धेचे स्वरुप राहणार आहे़ ‘रंगभूमीची रणभूमी’अशा टॅगलाईन असलेल्या या स्पर्धेच्या माध्यमातून नगरच्या नाट्यक्षेत्राचे चांगलेच ग्लॅमर वाढले आहे़ यंदा या स्पर्धेत स्थानिक कलाकारांनाही मोठी संधी मिळणार आहे़ मागील वर्षी स्थानिक ठिकाणच्या १५ संघांना प्रवेश देण्यात आला होता़ यंदा ही संख्या वाढवून २० करण्यात आली आहे़ स्पर्धेत एकूण ३ लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत़ त्यामुळे महाकरंडक स्पर्धेतील सहभागासाठी राज्यभरातील संघांनी रंगीत तालमींना सुरुवात केली आहे़ महाकरंडक एकांकिका स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे. अनुष्का मोशन पिक्चर्स अ‍ॅण्ड एंटरटेन्मेंट व महावीर प्रतिष्ठानद्वारे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २ ते १० जानेवारी दरम्यान नगर, नाशिक, पुणे, मुंबई, जळगाव, कोल्हापूर, कोकण आणि औरंगाबाद या केंद्रांवर यंदा प्राथमिक फेरी घेण्यात येणार आहे. प्राथमिक फेरीतून दर्जेदार २५ एकांकिकांना अंतिम फेरीत प्रवेश दिला जाणार आहे.