शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील दहावीच्या ७३ हजार विद्यार्थ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:21 IST

राज्यासह देशभरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता सर्वांत प्रथम सीबीएससी बोर्डाने दहावीच्या परीक्षा ...

राज्यासह देशभरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता सर्वांत प्रथम सीबीएससी बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. त्यानंतर लागलीच आयसीएसई बोर्डानेही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या केंद्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंडळांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने गुणांचे समानीकरण या मुद्द्यावर राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी घेतला, तर बारावीची परीक्षा होणार असून, ती पुढे ढकलण्यात आली आहे.

यापूर्वी राज्य सरकारने पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा रद्द करून या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेशित केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे केवळ दहावी आणि बारावी या विद्यार्थ्यांच्या परीक्षाबाबतचा निर्णय प्रलंबित होता. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. दहावीची परीक्षा रद्द होणार असली तरी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन केले जाणार आहे. ते कोणत्या आधारे आणि कोणत्या निकषावर करायचे याबाबतच्या सूचना शालेय शिक्षण विभाग येत्या काही दिवसांत देईल. मात्र, या अंतर्गत मूल्यमापनातून कोणीही विद्यार्थी अनुत्तीर्ण होणार नाही, याची काळजी शासन घेणार असल्याचे समजते. ज्या विद्यार्थ्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करायची आहे, त्यांनाही वेगळी संधी दिली जाईल, असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, नगर जिल्ह्यातून दहावीसाठी एकूण ७० हजार १३९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यात ४२ हजार ५९७ विद्यार्थी, तर ३० हजार ५३४ विद्यार्थिनींचा समावेश होता. २९ एप्रिलपासून या विद्यार्थ्यांची परीक्षाही सुरू होणार होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जूनपासून शाळा बंद होत्या. नोव्हेंबरपासून दहावी, बारावीचे वर्ग सुरू झाले. मात्र, त्यालाही फारशी उपस्थिती नव्हती. बहुतांश अभ्यासक्रम ऑनलाइनच शिकवला गेला. ग्रामीण भागात मात्र तंत्रज्ञानाची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी अडचण होत होती. परीक्षा रद्दच्या निर्णयामुळे या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

--------------

परीक्षा शुल्काचा प्रश्न

परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांनी भरलेले परीक्षा शुल्क शासन पुन्हा माघारी देणार आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी रामदास हराळ यांना विचारले असता शासन यावर धोरण जाहीर करेल, असे ते म्हणाले.

--------------

जिल्ह्यातून दहावीला प्रविष्ट झालेले विद्यार्थी

विद्यार्थी- ४२,५९७

विद्यार्थिनी- ३०,५३४

एकूण- ७३,१३९