शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
3
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
4
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
5
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
6
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
7
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
8
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
9
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
10
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
11
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
12
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
13
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
14
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
15
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
16
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
17
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
18
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
19
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
20
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

जिल्ह्यातील दहावीच्या ७३ हजार विद्यार्थ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:21 IST

राज्यासह देशभरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता सर्वांत प्रथम सीबीएससी बोर्डाने दहावीच्या परीक्षा ...

राज्यासह देशभरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता सर्वांत प्रथम सीबीएससी बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. त्यानंतर लागलीच आयसीएसई बोर्डानेही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या केंद्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंडळांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने गुणांचे समानीकरण या मुद्द्यावर राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी घेतला, तर बारावीची परीक्षा होणार असून, ती पुढे ढकलण्यात आली आहे.

यापूर्वी राज्य सरकारने पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा रद्द करून या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेशित केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे केवळ दहावी आणि बारावी या विद्यार्थ्यांच्या परीक्षाबाबतचा निर्णय प्रलंबित होता. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. दहावीची परीक्षा रद्द होणार असली तरी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन केले जाणार आहे. ते कोणत्या आधारे आणि कोणत्या निकषावर करायचे याबाबतच्या सूचना शालेय शिक्षण विभाग येत्या काही दिवसांत देईल. मात्र, या अंतर्गत मूल्यमापनातून कोणीही विद्यार्थी अनुत्तीर्ण होणार नाही, याची काळजी शासन घेणार असल्याचे समजते. ज्या विद्यार्थ्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करायची आहे, त्यांनाही वेगळी संधी दिली जाईल, असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, नगर जिल्ह्यातून दहावीसाठी एकूण ७० हजार १३९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यात ४२ हजार ५९७ विद्यार्थी, तर ३० हजार ५३४ विद्यार्थिनींचा समावेश होता. २९ एप्रिलपासून या विद्यार्थ्यांची परीक्षाही सुरू होणार होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जूनपासून शाळा बंद होत्या. नोव्हेंबरपासून दहावी, बारावीचे वर्ग सुरू झाले. मात्र, त्यालाही फारशी उपस्थिती नव्हती. बहुतांश अभ्यासक्रम ऑनलाइनच शिकवला गेला. ग्रामीण भागात मात्र तंत्रज्ञानाची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी अडचण होत होती. परीक्षा रद्दच्या निर्णयामुळे या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

--------------

परीक्षा शुल्काचा प्रश्न

परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांनी भरलेले परीक्षा शुल्क शासन पुन्हा माघारी देणार आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी रामदास हराळ यांना विचारले असता शासन यावर धोरण जाहीर करेल, असे ते म्हणाले.

--------------

जिल्ह्यातून दहावीला प्रविष्ट झालेले विद्यार्थी

विद्यार्थी- ४२,५९७

विद्यार्थिनी- ३०,५३४

एकूण- ७३,१३९