शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

विधवा-विधुरांच्या जुळणार रेशीमगाठी!

By admin | Updated: January 12, 2015 13:44 IST

प्रथम वर-वधुंच्या परिचय मेळाव्याची सगळीकडेच धूम असते. मात्र अकाली वैधव्य-विधुरत्व आलेले समाजात दुर्लक्षित राहतात. त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी कोणालाच वेळ नसतो.

पद्मशाली समाजाचा पुढाकार : एकटेपणाचे जीवन पुन्हा आनंदाने बहरणार

अहमदनगर -  प्रथम वर-वधुंच्या परिचय मेळाव्याची सगळीकडेच धूम असते. मात्र अकाली वैधव्य-विधुरत्व आलेले समाजात दुर्लक्षित राहतात. त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी कोणालाच वेळ नसतो. जोडीदाराच्या कायमच्या जाण्यामुळे एकटेपणाचे जीवन त्यांच्या वाट्याला येते. अशा दुर्लक्षितांच्या जीवनात पुन्हा आनंद फुलविण्यासाठी पद्मशाली समाजाने पुढाकार घेतला आहे. विधवा-विधुरांच्या रेशीमगाठी जुळविण्यासाठी समाजाचे प्रमुख कार्यकर्ते सध्या महाराष्ट्र पिंजून काढत आहेत.पद्मशाली समाजाचे महाराष्ट्रात बहुतांश शहरांमध्ये वास्तव्य आहे. राज्यात १६ ते १७ लाख एवढी पद्मशाली समाजाची लोकसंख्या आहे. मिळेल तिथे काम करणे,हा त्यांचा स्वभावगुण! कापड व्यवसाय, विडी काम यामध्ये पद्मशाली समाजाचे मोठे योगदान आहे. शिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या हा समाज बराच मागे आहे. इतर समाजाप्रमाणेच वधु-वरांचे मेळावे घेण्याचे काम या समाजातील कार्यकर्ते जोमाने करीत आहेत. पहिल्यांदा ज्यांचे लग्न होते, त्यांच्यासाठी सर्वच काम करतात. ज्यांना अकाली वैधव्य, विधुरत्व आले आहे, ते एका कोपर्‍यात राहतात. पुन्हा लग्न करायचे की नाही, असा विषय काढण्याची अनेकांना चोरी वाटते. पुरोगामीत्वाचे कितीही डांगोरे पिटले तरी पुनर्विवाह हा विषय अजूनही तसा दुर्लक्षितच आहे. पिंपरी-चिंचवड येथील प्रा. सदानंद बोगम यांनी नुकतीच पुनर्विवाह संस्था स्थापन करून पद्मशाली समाजातील दुर्लक्षितांच्या रेशीमगाठी जुळविण्याचे काम हाती घेतले आहे. बोगम यांनी पद्मशाली समाजाची नगरला बैठक घेऊन पुनर्विवाह मेळाव्याचे आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला. हा मेळावा ८ फेब्रुवारी २0१५ रोजी पिंपरी चिंचवड येथे होणार आहे. या मेळाव्याबाबत महाराष्ट्र पद्मशाली वधू-वर सूचक मंडळाचे अध्यक्ष अंबादास चिट्टय़ाल म्हणाले, कोणाचा जावई गेला, कोणाची लेक गेली, कोणाचा अपघात झाला, तर कोणाचा घटस्फोट झाला, कोणी कोणाला टाकून दिले, अशा वार्ता कानावर रोजच आदळत होत्या. अशा घटनांमुळे संबंधित कुटुंबाची वाताहत झालेली बघून मन व्यथित झाले. ज्यांचा आधार गेला, असे किती लोक आहेत, याचा शोध घेतला. आधी काहीच सांगण्यास नकार देणारे आता स्वत: पुढे येऊन विवाहाबद्दल बोलू लागले आहेत. त्यांचे, त्यांच्या नातेवाईकांचे प्रबोधन करून दुसर्‍या विवाहासाठी अनेकांना तयार केले. त्यानंतर इच्छुकांची संख्या वाढत गेल्याने मेळावा आयोजित करण्याचा विचार पुढे आला. 

 पिंपरी चिंचवडला होणारा पुनर्विवाह इच्छुकांचा पहिला मेळावा आहे. हा मेळावा फक्त पद्मशाली समाजातील लोकांसाठीच आहे. यापुढे अशा मेळाव्यांचे स्वरुप व्यापकपणे हाती घेतले जाणार आहे. सर्वच समाजातील विधवा-विदुरांची लग्ने जुळविण्यासाठी कार्य हाती घेण्यात येणार आहे. असा मेळावा पुढील सहा महिन्यात नगरला करण्याचे नियोजन आहे.- अंबादास चिट्टय़ाल, ज्येष्ठ कार्यकर्ते, अहमदनगर राज्यामध्येही असा इच्छुकांचा शोध सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून पुनर्विवाह मेळाव्याची पूर्वतयारी सुरू आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नगरमध्ये पद्मशाली समाजाची लोकसंख्या ५0 हजार एवढी आहे. सर्वात जास्त पुनर्विवाह इच्छुकांची नोंदणी (९५ जणांची) नगरमध्ये झाली. त्यामध्ये ६0 पुरुष आणि ३५ स्त्रिया आहेत. विधुर-विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता यांचा शोध घेणे, त्यांच्यात जागृती करून त्यांच्या रेशीमगाठी जुळवून आणणे यासाठी प्रयत्न आहेत.- प्रा. सदानंद बोगम, पुनर्विवाह संस्था, पिंपरी-चिंचवड सुदाम देशमुख■