शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बंद केलेल्या शाळा पुन्हा सुरु करण्याबाबत शासनाचा पुनर्विचार; बंद शाळांतील अंतराचे मोजमाप सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 15:57 IST

जिल्हा परिषदेच्या पटसंख्या कमी असलेल्या बंद करण्यात येणा-या दोन शाळांमधील अंतराचे मोजमाप जिल्हा परिषदेने सुरू केले असून, शिक्षण अधिका-यांची तातडीची बैठकही पुणे येथे बोलविण्यात आली आहे. 

अहमदनगर: जिल्हा परिषदेच्या पटसंख्या कमी असलेल्या बंद करण्यात येणा-या दोन शाळांमधील अंतराचे मोजमाप जिल्हा परिषदेने सुरू केले असून, शिक्षण अधिका-यांची तातडीची बैठकही पुणे येथे बोलविण्यात आली आहे. शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार होण्याची शक्यता यामुळे व्यक्त होत आहे.शिक्षण खात्याने १० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामध्ये नगर जिल्ह्यातील ४९ शाळांचाही समावेश आहे. तसा आदेश जिल्हा परिषदेला प्राप्त झाला असून, जिल्हा परिषदेने आतापर्यंत २२ शाळा बंद करून तेथील शिक्षक व विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत समायोजन केले. दरम्यान हिवाळी अधिवेशनात या मुद्यावरून शिक्षणमंत्री टीकेचे धनी ठरले. त्यामुळे खडबडून जाग आलेल्या शासनाने शाळा बंद करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पुणे येथील शिक्षण आयुक्तांनी जिल्हा परिषदेला बंद शाळांबाबत अहवाल तातडीने मागविला आहे. त्यामध्ये बंद केलेल्या शाळेपासून समायोजन केलेल्या शाळेचे अंतर किती आहे, समायोजित शाळेत जाण्यासाठी रस्ता आहे का, समयोजनात प्रमुख अडथळा काय आहे, आदी माहिती घेऊन शिक्षण अधिका-यांना बैठकीसाठी बोलविले आहे़ सदर माहिती जमविण्यासाठी शिक्षण विभागाची लगीनघाई सध्या जिल्हा परिषदेत सुरू आहे़ गट शिक्षण अधिका-यांना व्हॉटसअपवरून अर्ज पाठविण्यात आला आहे. तो भरून त्यांनी जिल्हा परिषदेला सादर करायचा आहे. त्यासाठी त्यांना दोन दिवसांची मुदत देण्यात आली होती. परंतु, काहींनी ही माहिती न दिल्याने त्यांना स्मरणपत्रही सोशल मीडियाव्दारे पाठविण्यात आली. बंद झालेल्या शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता प्रशासकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे.

शिक्षण समितीचा ठराव

शाळा बंद करण्यात आल्याने बालकांच्या शिक्षणाच्या अधिकारावर गदा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने शाळा बंद करू नयेत, असा ठराव जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या सभेत करण्यात आला आहे. तो शासनाकडे पाठविण्याचाही निर्णय सभेत झाला असून, इतर जिल्हा परिषदांच्या शिक्षण समित्यांनी असा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरzp schoolजिल्हा परिषद शाळा