शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

उखलगाव येथील विलगीकरण कक्षात राहण्यास नकार; तिस-याच दिवशी ‘ते’ दोघे गेले घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 12:48 IST

श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव येथील पती, पत्नी असलेल्या त्या दोन व्यक्ती दोन दिवस विलगीकरण कक्षात राहून तिस-या दिवशी घरी निघून गेल्या असल्याचे कोरोना ग्रामसुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा सरपंच अनिल ढवळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव येथील दोन व्यक्ती ३ मे रोजी देहू (जि.पुणे) येथून आल्या होत्या. त्यांना गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सुरू केलेल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यांची राहण्याची चांगली व्यवस्था करण्यात आली होती. तरी त्या दोन व्यक्ती दोन दिवस विलगीकरण कक्षात राहून तिस-या दिवशी घरी निघून गेल्या असल्याचे कोरोना ग्रामसुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा सरपंच अनिल ढवळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अशा प्रकारे लोक जर बाहेर गावाहून येऊन सरकारने सुरू केलेल्या निवारागृहात राहण्यासाठी नकार देऊ लागले तर ग्रामीण भागातील परिस्थिती गंभीर बनणार आहे. विशेष म्हणजे त्या व्यक्तीच्या मुलाशी चर्चा केली असता. त्याने सांगितले की, माझे आई, वडील गावात आल्यानंतर गावात काही लोक आले. मात्र त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले नाही. विलगीकरण कक्षात ठेवताना गाव समितीकडून पक्षपातीपणा केला जात आहे. यामुळे मी आई, वडिलांना घरी घेऊन गेलो असल्याचे त्याने सांगितले. याबाबत आरोग्य कर्मचाºयांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, १ मे नंतर संबंधित क्वारंटाईन केलेल्या दोनच व्यक्ती गावात आल्या आहेत. इतर लोक मात्र ३० एप्रिलपूर्वीच आल्या असल्याने त्यांना त्यांच्या घरातच क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र त्यांना १ ते ५ मे दरम्यान क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आले आहेत. तशा प्रकारच्या संबंधित कर्मचा-यांच्या रजिस्टरला नोंदी आहेत. बाहेर गावातून आलेल्या संबंधित व्यक्तींच्या घरी स्वतंत्र व्यवस्था असल्यास त्यांना घरीच क्वारंटाईन करण्यासाठी परवानगी आहे. मात्र ग्रामसुरक्षा समितीने पाहणी करून परवानगी देणे गरजेचे आहे. बाहेर गावातून आलेल्या व्यक्ती शेजारच्या घरी क्वारंटाईन असल्या तरी शेजारी राहणा-या लोकांना भीती वाटू लागली आहे. विलगीकरण कक्षात सर्व सुविधाकोरेगव्हाण येथील विलगीकरण कक्षात श्रीरामपूर येथून आलेल्या एकाच कुटुंबातील चार व्यक्ती आनंदाने रहात आहेत. त्यांची कोणत्याही प्रकारची तक्रार नाही. त्यांचे नातेवाईक त्यांना जेवण पोहोच करीत आहेत. विलगीकरण कक्षात पाणी, वीज व स्वच्छतागृहाची चांगली सोय करण्यात आली असल्याचे सरपंच संतोष नरोडे यांनी सांगितले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याShrigondaश्रीगोंदा