शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

उखलगाव येथील विलगीकरण कक्षात राहण्यास नकार; तिस-याच दिवशी ‘ते’ दोघे गेले घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 12:48 IST

श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव येथील पती, पत्नी असलेल्या त्या दोन व्यक्ती दोन दिवस विलगीकरण कक्षात राहून तिस-या दिवशी घरी निघून गेल्या असल्याचे कोरोना ग्रामसुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा सरपंच अनिल ढवळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव येथील दोन व्यक्ती ३ मे रोजी देहू (जि.पुणे) येथून आल्या होत्या. त्यांना गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सुरू केलेल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यांची राहण्याची चांगली व्यवस्था करण्यात आली होती. तरी त्या दोन व्यक्ती दोन दिवस विलगीकरण कक्षात राहून तिस-या दिवशी घरी निघून गेल्या असल्याचे कोरोना ग्रामसुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा सरपंच अनिल ढवळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अशा प्रकारे लोक जर बाहेर गावाहून येऊन सरकारने सुरू केलेल्या निवारागृहात राहण्यासाठी नकार देऊ लागले तर ग्रामीण भागातील परिस्थिती गंभीर बनणार आहे. विशेष म्हणजे त्या व्यक्तीच्या मुलाशी चर्चा केली असता. त्याने सांगितले की, माझे आई, वडील गावात आल्यानंतर गावात काही लोक आले. मात्र त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले नाही. विलगीकरण कक्षात ठेवताना गाव समितीकडून पक्षपातीपणा केला जात आहे. यामुळे मी आई, वडिलांना घरी घेऊन गेलो असल्याचे त्याने सांगितले. याबाबत आरोग्य कर्मचाºयांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, १ मे नंतर संबंधित क्वारंटाईन केलेल्या दोनच व्यक्ती गावात आल्या आहेत. इतर लोक मात्र ३० एप्रिलपूर्वीच आल्या असल्याने त्यांना त्यांच्या घरातच क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र त्यांना १ ते ५ मे दरम्यान क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आले आहेत. तशा प्रकारच्या संबंधित कर्मचा-यांच्या रजिस्टरला नोंदी आहेत. बाहेर गावातून आलेल्या संबंधित व्यक्तींच्या घरी स्वतंत्र व्यवस्था असल्यास त्यांना घरीच क्वारंटाईन करण्यासाठी परवानगी आहे. मात्र ग्रामसुरक्षा समितीने पाहणी करून परवानगी देणे गरजेचे आहे. बाहेर गावातून आलेल्या व्यक्ती शेजारच्या घरी क्वारंटाईन असल्या तरी शेजारी राहणा-या लोकांना भीती वाटू लागली आहे. विलगीकरण कक्षात सर्व सुविधाकोरेगव्हाण येथील विलगीकरण कक्षात श्रीरामपूर येथून आलेल्या एकाच कुटुंबातील चार व्यक्ती आनंदाने रहात आहेत. त्यांची कोणत्याही प्रकारची तक्रार नाही. त्यांचे नातेवाईक त्यांना जेवण पोहोच करीत आहेत. विलगीकरण कक्षात पाणी, वीज व स्वच्छतागृहाची चांगली सोय करण्यात आली असल्याचे सरपंच संतोष नरोडे यांनी सांगितले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याShrigondaश्रीगोंदा