शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

भंडारदरा धरणाचे आवर्तन नदीपात्रातच जिरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 12:06 IST

भंडारदरा धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी सोडलेले आवर्तन तब्बल ९० तासानंतर श्रीरामपुरात दाखल झाले आहे. प्रवरा नदीपात्रात ओझरपर्यंत असणाऱ्या वाळूच्या बंधाऱ्यांमुळेच पाणी पोहोचण्यास उशीर झाल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे.

श्रीरामपूर : भंडारदरा धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी सोडलेले आवर्तन तब्बल ९० तासानंतर श्रीरामपुरात दाखल झाले आहे. प्रवरा नदीपात्रात ओझरपर्यंत असणाऱ्या वाळूच्या बंधाऱ्यांमुळेच पाणी पोहोचण्यास उशीर झाल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे. पुढील काळात पाण्यावरून मोठा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.पिण्याच्या पाण्याकरिता धरणातून ३ मे रोजी दुपारी ३ वाजता आवर्तन सोडण्यात आले. ओझरपर्यंत नदीपात्र हाच कालवा असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर पाणी उचलले जाते. त्याचा श्रीरामपूर व नेवासे तालुक्याला जबर फटका बसला आहे.श्रीरामपूर शहरात मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजता पाणी दाखल झाले. त्यासाठी तब्बल ९० तास खर्च झाले. साधारणपणे ७० ते ७५ तासांमध्ये हे पाणी पोहोचणे अपेक्षित होते. उन्हाची तीव्रता व नदीपात्र कोरडे असल्याने जास्तीचा वेळ जमेस धरूनही हा कालावधी फार मोठा आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सुरेश ताके यांनी दिली. निळवंडे धरणाच्या निर्मितीपूर्वी भंडारदरा ते ओझर हे अंतर अधिक होते. त्यात आता घट होऊनही पाणी मुरते याकडे ताके यांनी लक्ष वेधले आहे.दरम्यान, भंडारदरा व निळवंडे धरणात दोन हजार ७०० दशलक्ष घनफूट पाणी साठा शिल्लक आहे. या आवर्तनातून ७५० एमसीएफटी पाणी खर्च होणार आहे. एक हजार ६०० क्यूसेकने पाणी सोडण्यात आले आहे. त्यातून श्रीरामपूर नगरपालिका तसेच पाटबंधारे विभागाकडे आरक्षित असणाºया पाणी योजनांना पुरवठा केला जाणार आहे. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी गावतळी भरून देण्याची मागणी केली आहे.या सर्व बाबी विचारात घेता पाटबंधारेकडून विशेष सतर्कता बाळगली जात आहे. प्रवरा नदीपात्राच्या परिसरात फिरते पथक तैैनात करण्यात आले आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व पाटबंधारेच्या कर्मचाºयांचा त्यात समावेश आहे. असे असले तरी त्यात फारसे यश मिळत नसल्याचेच दिसून येत आहे.श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव, उंदिरगाव, माळेवाडी, मुठेवाडगाव, माळवाडगावसह काही गावांना मागील शेतीच्या आवर्तनात पाणी मिळाले नव्हते. या गावांमध्ये भीषण टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे चालू आवर्तनातून प्राधान्याने या भागाला कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले आहे. त्यातून गावतळी भरली जातील, अशी माहिती पाटबंधारेकडून देण्यात आली.पाटपाण्याचे नियोजन कोलमडल्याने भविष्यात श्रीरामपूरचा अकोले, संगमनेर व राहाता तालुक्यांशी पाणी संघर्ष होण्याची भीती व्यक्त होत आहे. शेतकरी संघटना तसेच माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी अनेकदा हा विषय जाहिररीत्या छेडला आहे.प्रवरेचे नदीपात्र कोरडे असून उन्हाळ्यामुळे काही प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. मात्र नदीकाठच्या भागात २० तास शेतीपंपांचा वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. फिरते भरारी पथकही नेमले आहे. त्यामुळे चोरी होण्याचा प्रश्नच नाही. -किरण देशमुख, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग.नदीपात्रामध्ये वाळूचे बंधारे बांधले जातात. अनेक ठिकाणी खड्डे घेऊन पाणी अडविले जाते. आपण ही बाब जिल्हाधिकाºयांच्या निदर्शनास आणून देणार आहे. -सुरेश ताके, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर