शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

शेतीपंपाची सव्वाचार कोटींची थकबाकी वसुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : तालुक्यात महावितरण कंपनीकडून ‘महावितरण कृषिपंप वीज धोरण - २०२०’ या योजनेंतर्गत ५५ गावांमधील ५ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : तालुक्यात महावितरण कंपनीकडून ‘महावितरण कृषिपंप वीज धोरण - २०२०’ या योजनेंतर्गत ५५ गावांमधील ५ हजारांहून अधिक शेतीपंपाच्या ग्राहकांकडून ऑक्टोबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या पाच महिन्यांच्या कालावधीत ४ कोटी २४ लाख ३९ हजार इतक्या रकमेची वसुली करण्यात आली आहे.

कोपरगाव तालुक्यात एकूण ७९ गावे आहेत. त्यापैकी कोपरगाव महावितरण कार्यालयांतर्गत तालुक्यातील एकूण ५५ गावे आहेत. तर उर्वरित २४ गावे ही राहाता उपविभागीय कार्यालयांतर्गत येतात. कोपरगावातील ५५ गावांमध्ये एकूण १८ हजार ७९० शेतीपंपाचे ग्राहक आहेत. या सर्व ग्राहकांची एकूण थकबाकी सुमारे १९५ कोटी ३४ लाख इतकी आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी राज्य शासनाने शेतीपंपाच्या थकीत ग्राहकांसाठी ‘महावितरण कृषिपंप वीज धोरण - २०२०’ ही योजना अंमलात आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून बिलाच्या मूळ थकबाकीतून व्याज व दंड माफ करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थकबाकी भरताना ५० टक्केच रक्कम भरावी लागणार आहे. तालुक्यातील शेतकरी या योजनेत सहभागी होऊन आपली थकबाकी भरत आहेत.

........

ब्राम्हणगावात सर्वाधिक ४६ लाखांची वसुली

कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगावातील सर्वाधिक ३६० ग्राहकांनी फेब्रुवारीअखेर या योजनेत सहभागी होत, सुमारे ४६ लाख १५ हजार ८२३ इतकी थकबाकी भरली आहे. तर याउलट चासनळी गावातील फक्त दोनच शेतकऱ्यांनी सहभागी होत सर्वात कमी ३० हजार इतकी थकबाकी भरली आहे.

.............

या योजनेंतर्गत केलेल्या वसुलीचा फायदा हा त्या-त्या गावातील ग्रामपंचायतीला होणार आहे. या जमा झालेल्या वीजबिलाच्या रकमेतून ३३ टक्के रक्कम ही त्या गावातील नवीन जोडणी तसेच पायाभूत सुविधा व विद्युत प्रणाली सक्षमीकरण व बळकटीकरण करण्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर विभागीय कार्यालयाद्वारे वापरण्यात येणार आहे. तसेच ३३ टक्के रक्कम ही त्या तालुक्यातील खासदार, आमदार यांनी सुचविलेल्या महावितरणच्या कामासाठी खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेत उत्फूर्तपणे सहभाग नोंदवून महावितरणला सहकार्य करावे.

- दिनेश चावडा, उपकार्यकारी अभियंता, महावितरण कार्यालय, कोपरगाव