शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

ग्रामसभेत शासकीय योजनांचे वाचन

By admin | Updated: April 24, 2016 23:13 IST

अहमदनगर : शासनाच्या अनेक योजना आहेत़ पण, त्यांची माहिती मिळत नाही़ त्यामुळे अनेकजण शासकीय योजनांपासून वंचित राहत आहेत.

अहमदनगर : शासनाच्या अनेक योजना आहेत़ पण, त्यांची माहिती मिळत नाही़ त्यामुळे अनेकजण शासकीय योजनांपासून वंचित राहत आहेत. मात्र, सरकारी योजनांची माहिती गावातच उपलब्ध करून देण्यात आली असून, पंचायत राज दिनानिमित्त रविवारी (दि.२४) जिल्ह्यातील ४८७ गावांत योजनांचे वाचन करण्यात आले आहे. शासकीय योजनांचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी सरकारकडून ‘ग्राम उदय से भारत उदय’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे़ उपक्रमांतर्गत गावात जावून शासकीय योजनांची माहिती दिली जाते़ या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातही २१ ते २४ एप्रिल, या काळात ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले. ग्रामसभेत जनधन योजना, अटल पेन्शन योजना, मागेल त्याला शेततळे यांसारख्या विविध विभागाच्या योजनांचे वाचन गावातीलच ग्रामसेवकाकडून करण्यात आले़ त्यात रविवारी पंचायत राज दिनाचे औचित्य साधून ४८७ गावांत ग्रामसभा घेण्यात आल्या़ या सभेत शासकीय योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली़ यापूर्वी तीन दिवसांत ८१० ग्रामसभांचे आयोजन करून योजनांची माहिती देण्यात आली असून, संगमनेर तालुक्यातील तीन गावांतील ग्रामसभा तहकूब करण्यात आल्या आहेत.स्थगित केलेल्या ग्रामसभा येत्या एक-दोन दिवसांत पुन्हा घेण्यात येतील, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली़ग्रामस्थांना गावातच योजनेची माहिती मिळावी, तसेच त्यासाठी काय अटी आहेत, याची माहिती मिळावी, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला होता़ ग्रामसभा घेऊन उपक्रमाची सांगता करण्यात आली़ त्यासाठी प्रत्येक तालुक्याला एका निरीक्षकांची नियुक्ती प्रशासनाकडून करण्यात आली होती़ ग्रामपंचायतीसाठी एक निरीक्षक कार्यरत होता़ गावातील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन किसान सभा व ग्रामसभांचे आयोजन करण्याचा कालावधी सरकारने निश्चित केला होता़ त्यानुसार हा उपक्रम गावागावात राबविण्यात आला असून, त्यातून लोकांना योजनेची माहिती देण्यात आली़(प्रतिनिधी)ग्राम उदय से भारत उदय अंतर्गत जिल्ह्यात रविवारी ४८७ गावांत ग्रामसभा घेण्यात आल्या़ त्यापूर्वी ८१० ग्रामसभा झाल्या़ त्यात योजनांची माहिती देण्यात आली़ तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश ऐकण्यासाठी प्रत्येक गावात दूरदर्शन संच व रेडिओची व्यवस्था करण्यात आली होती़ अखेरच्या दिवशी रविवारी पंचायत राज दिनही साजरा करण्यात आला़- प्रशांत शिर्के, जिल्हा समन्वयक, तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी