शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रवंदेच्या ‘फार्मिंग फर्स्ट’ला मुंबईची बाजारपेठ; शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्रीचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 17:11 IST

रवंदे गावातील २५ तरूण शेतक-यांनी स्थापन केलेल्या ‘फार्मिंग फर्स्ट’ गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागात पिकणा-या सेंद्रीय शेतीमालास मुंबईत बाजारपेठ मिळविली आहे. ‘शेतकरी ते थेट ग्राहक’ बाजारपेठेमुळे गटाचा मोठा आर्थिक फायदा झाला आहे.

रियाज सय्यदकोपरगाव : तालुक्यातील रवंदे गावातील २५ तरूण शेतक-यांनी स्थापन केलेल्या ‘फार्मिंग फर्स्ट’ गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागात पिकणा-या सेंद्रीय शेतीमालास मुंबईत बाजारपेठ मिळविली आहे. ‘शेतकरी ते थेट ग्राहक’ बाजारपेठेमुळे गटाचा मोठा आर्थिक फायदा झाला आहे.शेतीत विविध प्रयोग करून पिकविलेल्या मालाला बाजारभावच नसेल तर वेळप्रसंगी शेतीमाल फेकून द्यावा लागतो. त्यावर उपाय शोधून काढण्यासाठी रवंदे गावातील २५ तरूण शेतकरी एकत्र आले. सेंद्रीय शेती व दर्जेदार उत्पादनाची आवड असलेले हे शेतकरी आपल्या शेतात उत्पादीत मालास बाजारपेठ शोधत होते. त्यांना प्रभारी तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, प्रकाश आहेर व रवींद्र गायधनी यांनी मार्गदर्शन केले. त्यातून प्रेरणा घेत शेतक-यांनी ‘आत्मा’ अंतर्गत ‘फार्मिंग फर्स्ट’ नावाचा शेतकरी गट स्थापन केला. गटातील प्रवीण कदम यांच्या भावामार्फत शेतक-यांनी २५ नोव्हेंबर २०१७ रोजी मुंबईतील एका उच्चभ्रू सोसायटीशी ‘फार्मिंग फर्स्ट’ गटाचा करार केला. सोसायटीला लागणारा भाजीपाला व इतर शेतीमाल या गटाद्वारे आठवड्यात एकदा पुरविला जातो. त्यातून शेती व वाहतुकीचा खर्च वजा जाता ‘फार्मिंग फर्स्ट’ला मोठा आर्थिक नफा मिळत आहे. शेतीमालास बाजारभावापेक्षा जास्त दर मिळत असल्याने गटातील शेतक-यांचे मनोबल वाढले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव