शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पावसाचा रतनवाडीने मोडला घाटघरचा विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 18:18 IST

नगर जिल्ह्याची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणा-या घाटघरच्या एकूण पावसाचा विक्रम यावर्षी रतनवाडीने मोडीत काढला.

राजूर : नगर जिल्ह्याची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणा-या घाटघरच्या एकूण पावसाचा विक्रम यावर्षी रतनवाडीने मोडीत काढला. यावर्षी रतनवाडी येथे बुधवारपर्यंत सुमारे साडेसहा हजार मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या काही वर्षांची एकूण पावसाची नोंद पाहता यावर्षी रतनवाडीत रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली.सह्याद्रीच्या पर्वत रांगात रतनवाडी हे एक आदिवासी खेडे. निसर्ग आणि पर्यटनदृष्ट्या संपन्नतेचा वारसा असणा-या रतनवाडी गावाला यावर्षी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. जूनच्या अखेरीस उशिराने पावसाचे आगमन झाले. तरीही बुधवारी सकाळी येथे ६ हजार ४४९ मिमी एवढा विक्रमी पाऊस पडला आहे. जून महिन्यात ३८६ मिमी पावसाची नोंद झाली होती. जुलै व आॅगस्ट या दोन महिन्यात रतनवाडी परिसराला चार ते पाच वेळा अतिवृष्टीचा तडाखा बसला. या दोन महिन्यात तब्बल ५ हजार २६५ मिमी पावसाची नोंद झाली. सप्टेंबर महिन्याच्या अकरा दिवसात येथे ८१२ मिमी पावसाची नोंद झाली. अद्यापही येथे पाऊस पडत आहे.जिल्ह्याची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणा-या भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील घाटघर येथे अनेक वेळा सहा हजार मिमीहून अधिक पावसाची अद्यापपर्यंत नोंद झाली आहे. २००५ साली तर तेथे तब्बल ७ हजार १०९ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. २००६ मध्येही तेथे ६ हजार ८५९ मिमी, २००८ मध्ये ६ हजार २७ मिमी पाऊस पडला होता. या वर्षीही बुधवारपर्यंत ६ हजार १६०  मिमी पावसाची नोंद झाली आहे. भंडारदºयात ४ हजार ५३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. अद्यापपर्यंत भंडारदरा येथे मागील चाळीस वर्षांत ४ हजार ५४४ मिमी पावसाची नोंद झाली होती. पाणलोटातील पांजरे येथे बुधवारपर्यंत ४ हजार ७०५ मिमी  तर वाकी येथे ३ हजार ८०७ मिमी पावसाची आजपर्यंत नोंद झाली आहे.

टॅग्स :Rainपाऊस