शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

श्रीगोंद्याच्या अमरधामात रामदास शोधतोय भाकरीचा चंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:46 IST

श्रीगोंदा : अडचणीच्या चटक्यांनी जेव्हा भावना करपतात तेव्हा जिवंतपणीच माणसं स्मशानभूमीकडे सरकतात..! गावची स्मशानभूमी, शहरातील अमरधाम म्हटले की माणसाचे ...

श्रीगोंदा : अडचणीच्या चटक्यांनी जेव्हा भावना करपतात तेव्हा जिवंतपणीच माणसं स्मशानभूमीकडे सरकतात..!

गावची स्मशानभूमी, शहरातील अमरधाम म्हटले की माणसाचे शेवटचे निवाराधाम. या धामात माणसं फक्त अंत्यसंस्कारसमयी उपस्थित राहतात. नंतर तिकडे फारसे कोणी फिरकत नाही; परंतु श्रीगोंद्याच्या याच अमरधामात रामदास वाघमारे हा इसम गेल्या कित्येक दिवसांपासून भाकरीचा शोध घेतोय.

पूर्वी गरीब कुटुंबांतील महिला स्मशानात राखेतील सोने शोधण्यासाठी धडपड करायच्या. बदलत्या सामाजिक प्रवाहात स्मशानातील सोने शोधण्याचे बंद झाले. माणूस पंचतारांकित जीवन जगू लागला. श्रीगोंद्याच्या अमरधाममध्ये अंत्यसंस्कार झाले की रक्षा जमा करण्याचा विधी होतो. हा विधी झाला की त्या ठिकाणी मृत व्यक्तीसाठी ठेवलेले अन्न, मिठाई आणि चहा यावर श्रीगोंद्यातील रामदास वाघमोडे आपली भूक भागवितात. हे ग्रहस्थ गेल्या तीन वर्षांपासून याच अमरधामात असून, येथेच उदरनिर्वाहाचे साधन शोधत आहेत. फावल्या वेळेत ते या परिसराची साफसफाईही करतात आणि आपला दिवस आनंदाने अमरधाममध्ये घालवितात. वाघमारे यांचे मूळ गाव सोलापूर; पण लहानपणी आई-वडिलांचे छत्र हरपले आणि रामदास श्रीगोंद्यात आले. त्यांनी स्वत:साठी घर घेतले. नातेवाईकांनी रामदास यांना चांगले शिकविले. पुढे त्यांनी बीए.बीएड.ची पदवीही घेतली; परंतु त्यानंतर त्यांनी नोकरी केली नाही आणि लग्नही केले नाही. पुढे त्यांचे अलिप्त जीवन सुरू झाले. सुरुवातीला ते सिद्धेश्वर घाट परिसरात ध्यानस्थ होत. आता गेल्या तीन वर्षांपासून रामदास हे अमरधाममध्येच जीवन जगत आहेत.

--------

मदतीची अपेक्षा नाही

वाघमारे यांच्याशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संवाद साधला असता, ते म्हणाले, मी पदवीधर आहे. पुणे विद्यापीठात शिकलो, पण नशिबाने साथ दिली नाही. जीवनात कधीच कुणाचा आधार घेतला नाही. परिस्थितीनुसार जीवन जगत राहिलो. मृत व्यक्ती अन्न खात नाही. ते अन्न खराब होण्यापेक्षा मी त्या अन्नावर माझी भूक भागवितो. वाघमारे यांना मदतीबाबत विचारले असता त्यांनी त्यासही नकार दिला. मला स्वत:चे घर आहे. अन्न, कपडे अमरधामात मिळतात. त्यामुळे मला मदतीची गरज नाही. मी आहे त्या परिस्थितीत आनंदी आहे, असे सांगत ते निघून गेले.

--------

फोटो - १६ रामदास वाघमारे

श्रीगोंद्याच्या अमरधाममध्ये रामदास वाघमारे हे गेल्या कित्येक दिवसांपासून उदरनिर्वाह भागवीत आहेत.