शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

राजूरची नळपाणीपुरवठा योजना अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:21 IST

पाटबंधारे विभागाने निळवंडे धरणाच्या टनेल दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. टनेलची पाणीपातळी धरणाच्या ६१० मीटर तलांक इतकी आहे, ...

पाटबंधारे विभागाने निळवंडे धरणाच्या टनेल दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. टनेलची पाणीपातळी धरणाच्या ६१० मीटर तलांक इतकी आहे, तर धरणाच्या कडेला राजूर नळपाणीपुरवठा करणारी विहीर आहे. या विहिरीची पाणी पातळीही धरणाच्या ६१० मीटर तलांक इतकीच आहे. हे काम दुरुस्ती करणे अत्यावश्यक असल्याने पाटबंधारे विभागाने निळवंडे धरणातील पाणी सोडून दिले आहे. राजूर पाणीपुरवठा विहिरीची पाणी पातळी यामुळे खाली गेली आणि पाणीपुरवठा करणारे विद्युतपंप उघडे पडले आणि पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाली. त्यामुळे भरउन्हाळ्यात राजूरकरांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

टनेल दुरुस्तीच्या कामासाठी किमान आठ दिवस लागणार असल्याचे पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता अभिजित देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे राजूरचा नळपाणीपुरवठा टनेल दुरुस्ती होईपर्यंत बंद राहणार आहे.

जॅक वेलच्या पाणीपातळीच्या खाली निळवंडे धरणाचे पाणी गेल्यामुळे इतक्या दिवस सुरळीत चालू असलेली नळपाणीपुरवठा योजना अडचणीत सापडली आहे. धरणाच्या टनेल दुरुस्तीस आठ दिवस लागणार असल्याचे पाटबंधारे विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले. यात काही अडचणी लक्षात घेऊन गावची पाणीपुरवठा योजना दहा दिवस बंद राहणार असल्याची दवंडी गावातून दिली आहे. त्यामुळे दहा दिवस ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच गणपत देशमुख यांनी ग्रामपंचायतच्या वतीने केले आहे.