शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
2
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
3
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
4
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
5
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
7
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
8
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
9
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
10
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
11
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
12
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
13
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
14
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
15
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
16
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
17
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
18
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
19
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
20
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?

पावसाचा जोर कायम

By admin | Updated: August 27, 2014 23:08 IST

अहमदनगर: शहरासह जिल्ह्यात गेल्या सोमवारी सुरू झालेल्या पावसाचा जोर बुधवारीही कायम होता़

अहमदनगर: शहरासह जिल्ह्यात गेल्या सोमवारी सुरू झालेल्या पावसाचा जोर बुधवारीही कायम होता़ जिल्ह्यात मंगळवारी ११ मि़मी़ पाऊस झाला असून, बुधवारी मुसळधार पावसाने नगरकरांना झोडपून काढले़गेल्या दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली़ गेल्या सोमवारी सायंकाळी प्रथमच १४० मि़मी़ पाऊस झाला़ पारनेर वगळता सर्वत्र हा पाऊस झाला असून, संगमनेर व श्रीरामपूर शहरात सर्वाधिक पाऊस झाला़ दुसऱ्या दिवशी मंगळवारी शहरासह जिल्ह्यात ११़ ९७ मि़ मी़ पावसाची नोंद झाली़ राहुरी तालुक्यांत सर्वाधिक ४२़४ मि़ मी़ पाऊस झाला़ नगर तालुक्यातही ३२ मि़मी़ पाऊस झाला असून, कोपरगाव परिसरात ३३ मि़ मी़ पाऊस झाला आहे़याशिवाय शेवगाव, पाथर्डी आणि पारनेर तालुक्यांत मंगळवारी पाऊस झाला़ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे़ तिसऱ्या दिवशी बुधवारीही नगर शहरासह तालुक्यांत मुसळधार पाऊस झाला आहे़पावसाचा जोर वाढत असल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे़शहरात दुपारी मुसळधार पाऊस झाला़ शहरातील सावेडी, बालिकाश्रम रस्ता, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, कोठला, सर्जेपुरा, माळीवाडा, सारसनगर, केडगाव, नालेगाव, गुलमोहर रस्ता, निर्मलननगर, महापालिका कार्यालय परिसर, मुकुंदनगर परिसरात मुसळधार पाऊस झाला़ याशिवाय जिल्ह्यातही कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे़ पावसाचा जोर वाढतच असून, बुधवारी राहुरी तालुक्यातील गुहा सोनगाव रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला़ मुळा लाभ क्षेत्रातील खरीप पिकांसाठी सुरू झालेले आवर्तनही पावसामुळे बंद करण्यात आले आहे़ लाभक्षेत्रात काही ठिकाणी झालेल्या पावसाचा आढावा घेऊन पाटबंधारे विभागाने आवर्तन बंद करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे़ पावसामुळे मुळाचे दोन्ही कालवे बंद१मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात गेल्या तीन दिवसांत समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने शेतीसाठी सोडलेले आवर्तन बंद करण्यात आले आहे. मुळाचा उजवा व डावा असे दोन्ही कालवे बंद झाल्याने ६००० दशलक्ष घनफूट पाणी वाचणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यात धरण भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. २खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांच्या मागणीवरून मुळा धरणाचे आवर्तन गेल्या तीन दिवसांपूर्वी सोडले होते. परंतु त्यानंतर लगेच लाभक्षेत्रावर वरूणराजाने कृपादृष्टी दाखवल्याने पिकांचे भरणे आपोआप झाले. परिणामी दोन्ही कालवे बंद करण्याचा निर्णय पाटबंधारे खात्याने घेतला़ ३२६००० दलघफू पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात बुधवारी रात्री २०६२५ दलघफू पाणी साठ्याची नोंद झाली़ धरणाकडे २२४७ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. पाणलोट क्षेत्रावर गेल्या दोन दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नाही़ बुधवारी दुपारी पाणलोट क्षेत्रावर पाऊस सुरू होता़ सायंकाळीही हलक्या सरी पडल्या. कोतूळ येथे ९, तर मुळानगर येथे ४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली़ ३० आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज महात्मा फु ले कृषी विद्यापीठाचे हवामान विभाग प्रमुख डॉ़ रवींद्र आंधळे यांनी व्यक्त केला़ जिल्ह्यातील टँकरच्या संख्येत घटपावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे़ परंतु नुकत्याच झालेल्या पावसामुळे टँकरची संख्या कमी झाली आहे़ पाऊस झालेल्या परिसरातील टँकर बंद करण्यात आले आहेत़ मागील आठवड्यात ३३३ टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू होता़ सोमवारी सायंकाळी झालेल्या दमदार पावसामुळे विविध गावांतील टँकर कमी करण्यात आले असून,टँकरची संख्या २८० झाली आहे़ नुकत्याच झालेल्या पावसामुळे ५३ टँकर कमी झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविले आहे़कुठे किती पाऊसअकोले- ९ संगमनेर-१, कोपरगाव-३३, राहुरी- ४२़२, नेवासा- १, नगर- ३२, शेवगाव- १२, पाथर्डी- १६, पारनेर- १३, कर्जत- २, जामखेड- ६़२