शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

पावसाचा जोर कायम

By admin | Updated: August 27, 2014 23:08 IST

अहमदनगर: शहरासह जिल्ह्यात गेल्या सोमवारी सुरू झालेल्या पावसाचा जोर बुधवारीही कायम होता़

अहमदनगर: शहरासह जिल्ह्यात गेल्या सोमवारी सुरू झालेल्या पावसाचा जोर बुधवारीही कायम होता़ जिल्ह्यात मंगळवारी ११ मि़मी़ पाऊस झाला असून, बुधवारी मुसळधार पावसाने नगरकरांना झोडपून काढले़गेल्या दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली़ गेल्या सोमवारी सायंकाळी प्रथमच १४० मि़मी़ पाऊस झाला़ पारनेर वगळता सर्वत्र हा पाऊस झाला असून, संगमनेर व श्रीरामपूर शहरात सर्वाधिक पाऊस झाला़ दुसऱ्या दिवशी मंगळवारी शहरासह जिल्ह्यात ११़ ९७ मि़ मी़ पावसाची नोंद झाली़ राहुरी तालुक्यांत सर्वाधिक ४२़४ मि़ मी़ पाऊस झाला़ नगर तालुक्यातही ३२ मि़मी़ पाऊस झाला असून, कोपरगाव परिसरात ३३ मि़ मी़ पाऊस झाला आहे़याशिवाय शेवगाव, पाथर्डी आणि पारनेर तालुक्यांत मंगळवारी पाऊस झाला़ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे़ तिसऱ्या दिवशी बुधवारीही नगर शहरासह तालुक्यांत मुसळधार पाऊस झाला आहे़पावसाचा जोर वाढत असल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे़शहरात दुपारी मुसळधार पाऊस झाला़ शहरातील सावेडी, बालिकाश्रम रस्ता, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, कोठला, सर्जेपुरा, माळीवाडा, सारसनगर, केडगाव, नालेगाव, गुलमोहर रस्ता, निर्मलननगर, महापालिका कार्यालय परिसर, मुकुंदनगर परिसरात मुसळधार पाऊस झाला़ याशिवाय जिल्ह्यातही कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे़ पावसाचा जोर वाढतच असून, बुधवारी राहुरी तालुक्यातील गुहा सोनगाव रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला़ मुळा लाभ क्षेत्रातील खरीप पिकांसाठी सुरू झालेले आवर्तनही पावसामुळे बंद करण्यात आले आहे़ लाभक्षेत्रात काही ठिकाणी झालेल्या पावसाचा आढावा घेऊन पाटबंधारे विभागाने आवर्तन बंद करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे़ पावसामुळे मुळाचे दोन्ही कालवे बंद१मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात गेल्या तीन दिवसांत समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने शेतीसाठी सोडलेले आवर्तन बंद करण्यात आले आहे. मुळाचा उजवा व डावा असे दोन्ही कालवे बंद झाल्याने ६००० दशलक्ष घनफूट पाणी वाचणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यात धरण भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. २खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांच्या मागणीवरून मुळा धरणाचे आवर्तन गेल्या तीन दिवसांपूर्वी सोडले होते. परंतु त्यानंतर लगेच लाभक्षेत्रावर वरूणराजाने कृपादृष्टी दाखवल्याने पिकांचे भरणे आपोआप झाले. परिणामी दोन्ही कालवे बंद करण्याचा निर्णय पाटबंधारे खात्याने घेतला़ ३२६००० दलघफू पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात बुधवारी रात्री २०६२५ दलघफू पाणी साठ्याची नोंद झाली़ धरणाकडे २२४७ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. पाणलोट क्षेत्रावर गेल्या दोन दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नाही़ बुधवारी दुपारी पाणलोट क्षेत्रावर पाऊस सुरू होता़ सायंकाळीही हलक्या सरी पडल्या. कोतूळ येथे ९, तर मुळानगर येथे ४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली़ ३० आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज महात्मा फु ले कृषी विद्यापीठाचे हवामान विभाग प्रमुख डॉ़ रवींद्र आंधळे यांनी व्यक्त केला़ जिल्ह्यातील टँकरच्या संख्येत घटपावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे़ परंतु नुकत्याच झालेल्या पावसामुळे टँकरची संख्या कमी झाली आहे़ पाऊस झालेल्या परिसरातील टँकर बंद करण्यात आले आहेत़ मागील आठवड्यात ३३३ टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू होता़ सोमवारी सायंकाळी झालेल्या दमदार पावसामुळे विविध गावांतील टँकर कमी करण्यात आले असून,टँकरची संख्या २८० झाली आहे़ नुकत्याच झालेल्या पावसामुळे ५३ टँकर कमी झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविले आहे़कुठे किती पाऊसअकोले- ९ संगमनेर-१, कोपरगाव-३३, राहुरी- ४२़२, नेवासा- १, नगर- ३२, शेवगाव- १२, पाथर्डी- १६, पारनेर- १३, कर्जत- २, जामखेड- ६़२