शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
4
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
5
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
6
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
7
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
8
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
9
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
10
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
11
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
12
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
13
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
15
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
16
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
17
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
18
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
19
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
20
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा जोर कायम

By admin | Updated: August 27, 2014 23:08 IST

अहमदनगर: शहरासह जिल्ह्यात गेल्या सोमवारी सुरू झालेल्या पावसाचा जोर बुधवारीही कायम होता़

अहमदनगर: शहरासह जिल्ह्यात गेल्या सोमवारी सुरू झालेल्या पावसाचा जोर बुधवारीही कायम होता़ जिल्ह्यात मंगळवारी ११ मि़मी़ पाऊस झाला असून, बुधवारी मुसळधार पावसाने नगरकरांना झोडपून काढले़गेल्या दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली़ गेल्या सोमवारी सायंकाळी प्रथमच १४० मि़मी़ पाऊस झाला़ पारनेर वगळता सर्वत्र हा पाऊस झाला असून, संगमनेर व श्रीरामपूर शहरात सर्वाधिक पाऊस झाला़ दुसऱ्या दिवशी मंगळवारी शहरासह जिल्ह्यात ११़ ९७ मि़ मी़ पावसाची नोंद झाली़ राहुरी तालुक्यांत सर्वाधिक ४२़४ मि़ मी़ पाऊस झाला़ नगर तालुक्यातही ३२ मि़मी़ पाऊस झाला असून, कोपरगाव परिसरात ३३ मि़ मी़ पाऊस झाला आहे़याशिवाय शेवगाव, पाथर्डी आणि पारनेर तालुक्यांत मंगळवारी पाऊस झाला़ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे़ तिसऱ्या दिवशी बुधवारीही नगर शहरासह तालुक्यांत मुसळधार पाऊस झाला आहे़पावसाचा जोर वाढत असल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे़शहरात दुपारी मुसळधार पाऊस झाला़ शहरातील सावेडी, बालिकाश्रम रस्ता, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, कोठला, सर्जेपुरा, माळीवाडा, सारसनगर, केडगाव, नालेगाव, गुलमोहर रस्ता, निर्मलननगर, महापालिका कार्यालय परिसर, मुकुंदनगर परिसरात मुसळधार पाऊस झाला़ याशिवाय जिल्ह्यातही कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे़ पावसाचा जोर वाढतच असून, बुधवारी राहुरी तालुक्यातील गुहा सोनगाव रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला़ मुळा लाभ क्षेत्रातील खरीप पिकांसाठी सुरू झालेले आवर्तनही पावसामुळे बंद करण्यात आले आहे़ लाभक्षेत्रात काही ठिकाणी झालेल्या पावसाचा आढावा घेऊन पाटबंधारे विभागाने आवर्तन बंद करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे़ पावसामुळे मुळाचे दोन्ही कालवे बंद१मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात गेल्या तीन दिवसांत समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने शेतीसाठी सोडलेले आवर्तन बंद करण्यात आले आहे. मुळाचा उजवा व डावा असे दोन्ही कालवे बंद झाल्याने ६००० दशलक्ष घनफूट पाणी वाचणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यात धरण भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. २खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांच्या मागणीवरून मुळा धरणाचे आवर्तन गेल्या तीन दिवसांपूर्वी सोडले होते. परंतु त्यानंतर लगेच लाभक्षेत्रावर वरूणराजाने कृपादृष्टी दाखवल्याने पिकांचे भरणे आपोआप झाले. परिणामी दोन्ही कालवे बंद करण्याचा निर्णय पाटबंधारे खात्याने घेतला़ ३२६००० दलघफू पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात बुधवारी रात्री २०६२५ दलघफू पाणी साठ्याची नोंद झाली़ धरणाकडे २२४७ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. पाणलोट क्षेत्रावर गेल्या दोन दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नाही़ बुधवारी दुपारी पाणलोट क्षेत्रावर पाऊस सुरू होता़ सायंकाळीही हलक्या सरी पडल्या. कोतूळ येथे ९, तर मुळानगर येथे ४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली़ ३० आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज महात्मा फु ले कृषी विद्यापीठाचे हवामान विभाग प्रमुख डॉ़ रवींद्र आंधळे यांनी व्यक्त केला़ जिल्ह्यातील टँकरच्या संख्येत घटपावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे़ परंतु नुकत्याच झालेल्या पावसामुळे टँकरची संख्या कमी झाली आहे़ पाऊस झालेल्या परिसरातील टँकर बंद करण्यात आले आहेत़ मागील आठवड्यात ३३३ टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू होता़ सोमवारी सायंकाळी झालेल्या दमदार पावसामुळे विविध गावांतील टँकर कमी करण्यात आले असून,टँकरची संख्या २८० झाली आहे़ नुकत्याच झालेल्या पावसामुळे ५३ टँकर कमी झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविले आहे़कुठे किती पाऊसअकोले- ९ संगमनेर-१, कोपरगाव-३३, राहुरी- ४२़२, नेवासा- १, नगर- ३२, शेवगाव- १२, पाथर्डी- १६, पारनेर- १३, कर्जत- २, जामखेड- ६़२