शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
3
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
4
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
5
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
7
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
8
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
9
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
10
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
11
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
12
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
13
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
14
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
15
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
16
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
17
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
18
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
19
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
20
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

नगर जिल्ह्यात पावसाची विश्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 13:06 IST

गेल्या तीन आठवड्यांपासून अहमदनगर जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने खरिपाची पिके धोक्यात आली आहेत.

राहुरी : गेल्या तीन आठवड्यांपासून अहमदनगर जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. पुढील आठ दिवस पाऊस लांबल्याचे सांगण्यात येत असून जिल्ह्यात ७१ टक्के पेरण्या झालेल्या आहेत.पश्चिम बंगाल सागरात कमी दाबाचा पट्टा नसल्याने पाऊस रूसल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. यंदाच्या पावसाळयात नगर जिल्ह्यात १९३ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. खरिपाच्या उभ्या पिकांसाठी पावसाची गरज निर्माण झाली आहे. हवामानातील बदलामुळे पिकांच्या वाढीवर यंदा प्रतिकूल परिणाम झाला आहे. ऊस या पिकाचे गेल्या वर्षी एकरी उत्पादन वाढले होते. यंदा मात्र उसाची वाढ समाधानकारक नसल्याचे चित्र समोर आले आहे.पिकांवर रोगराई, किडींचा प्रादुर्भावढगाळ हवामानामुळे पिकांवर रोग व किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. कपाशी या पिकावर फुलकिडे, मावा, पांढरी माशी व तुडतुडे या रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. नियंत्रणासाठी १५ गॅ्रम अ‍ॅसिफे ट व ३ मिली इमिडॅक्लोप्रीड प्रति १० लिटर पाण्यात मिसळून हातपंपाने फवारणी करावी, असे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सांगितले आहे. रस शोषणा-या किडींच्या नियंत्रणासाठी मिश्र पीक, आंतरपीक, सापळा पिके म्हणून मका, चवळी, झेंडूची लागवड करण्याचा सल्ला विद्यापीठाने दिला आहे.भारत मौसम विज्ञान विभागाच्या अंदाजानुसार अहमदनगर जिल्ह्यात येत्या पाच दिवसात कमाल तापमान २७ ते २९ अंश सेल्सिअस राहील़ किमान तापमान २० ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश ढगाळ राहील़ कमाल आर्द्रता ७९ ते ८७ टक्के राहील. किमान आर्द्रता ७१ ते ७५ टक्के राहील. वा-याचा ताशी वेग १४ ते १९ किलोमीटर राहील.अशा परिस्थितीमुळे पाऊस लांबण्याची शक्यता आहे. - डॉ. रवींद्र आंधळे, सहयोगी प्राध्यापक, हवामान विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी