शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

१० जूननंतर जिल्ह्यात पावसाचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 16:28 IST

विदर्भ व मराठवाड्यासह अहमदनगर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचे आगमन झाले आहे़ उकाडा असहाय झाला असून १० जूननंतर जिल्ह्यात पावसाचे आगमन होण्याचे संकेत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने दिले आहेत.

राहुरी : विदर्भ व मराठवाड्यासह अहमदनगर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचे आगमन झाले आहे़ उकाडा असहाय झाला असून १० जूननंतर जिल्ह्यात पावसाचे आगमन होण्याचे संकेत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने दिले आहेत.गेल्या वर्षाच्या तुलनेत पावसाचे प्रमाण वाढणार आहे़ सरासरी ९६ टक्के पाऊस होण्याची शक्यता शास्त्रज्ञ डॉ़ रवींद्र आंधळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. २९ मे पर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार आहे़ अहमदनगर जिल्ह्यात आज ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे़ शनिवारी जिल्ह्याचे तापमान नोंद ४१़६ सेल्सिअस होते़आज तापमान दीड अंश सेल्सिअसने घसरले आहे़ रात्रीचे तापमान २३ ते २५ अंश सेल्सिअस या दरम्यान राहणार आहे़ १० जूनच्या दरम्यान जिल्ह्यात पाऊस होणे अपेक्षित आहे. दोन चार दिवस पाऊस मागे पुढे होऊ शकतो.अहमदनगर जिल्ह्याची सरासरी ९६ टक्के इतकी आहे़ यंदा सरासरी ९६ टक्के पाऊस अपेक्षित आहे़गेल्यावर्षी अहमदनगर जिल्ह्यात केवळ २४४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती़ म्हणजे गेल्या वर्षी केवळ ४४ टक्के पाऊस पडला होता़ त्यामुळे दुष्काळाची तीव्रता वाढली होती़ यंदा पावसाचे प्रमाण वाढणार आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे वेधले आहे़बीटी कपाशीची लागवड २५ मे रोजी करण्यास शेतकऱ्यांनी सुरूवात केली आहे़ पाऊस पडल्यानंतर कपाशीची लागवड करावी़ मे महिन्यात कपाशीची लागवड केल्यास जमिनीत उष्णतेचे प्रमाण जास्त आहे़ त्यामुळे उगवण कमी होईल़ त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात कपाशी लागवडीचा निर्णय घ्यावा़ बागायती भागात जमीन ओलावून लागवड केली तरी तापमानाचा उगवण क्षमतेवर परिणाम होणार आहे़ -डॉ़ रवींद्र आंधळे, सहयोगी प्राध्यापक, हवामान विभाग, कृषी विद्यापीठयंदा उष्णतेची लाट आहे़ त्यामुळे मे ऐवजी जूनच्या पहिल्या आठवड्यात कपाशीची लागवड करणार आहे़ फार उशिरा लागवड केल्यास पुढील गव्हाचे पीक घेता येत नाही़ जूनमध्ये पहिल्या आठवड्यात पाऊस आल्यास कपाशीला फायदेशीर ठरेल़ मात्र पाऊस लांबल्याने कपाशी उत्पादकांचे लक्ष आभाळाकडे वेधले आहे़ यंदा चांगल्या पावसाची अपेक्षा आहे़ -विलास वराळे, अध्यक्ष, मुळाथडी शेतकरी बचत गट

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी