शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

१० जूननंतर जिल्ह्यात पावसाचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 16:28 IST

विदर्भ व मराठवाड्यासह अहमदनगर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचे आगमन झाले आहे़ उकाडा असहाय झाला असून १० जूननंतर जिल्ह्यात पावसाचे आगमन होण्याचे संकेत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने दिले आहेत.

राहुरी : विदर्भ व मराठवाड्यासह अहमदनगर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचे आगमन झाले आहे़ उकाडा असहाय झाला असून १० जूननंतर जिल्ह्यात पावसाचे आगमन होण्याचे संकेत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने दिले आहेत.गेल्या वर्षाच्या तुलनेत पावसाचे प्रमाण वाढणार आहे़ सरासरी ९६ टक्के पाऊस होण्याची शक्यता शास्त्रज्ञ डॉ़ रवींद्र आंधळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. २९ मे पर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार आहे़ अहमदनगर जिल्ह्यात आज ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे़ शनिवारी जिल्ह्याचे तापमान नोंद ४१़६ सेल्सिअस होते़आज तापमान दीड अंश सेल्सिअसने घसरले आहे़ रात्रीचे तापमान २३ ते २५ अंश सेल्सिअस या दरम्यान राहणार आहे़ १० जूनच्या दरम्यान जिल्ह्यात पाऊस होणे अपेक्षित आहे. दोन चार दिवस पाऊस मागे पुढे होऊ शकतो.अहमदनगर जिल्ह्याची सरासरी ९६ टक्के इतकी आहे़ यंदा सरासरी ९६ टक्के पाऊस अपेक्षित आहे़गेल्यावर्षी अहमदनगर जिल्ह्यात केवळ २४४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती़ म्हणजे गेल्या वर्षी केवळ ४४ टक्के पाऊस पडला होता़ त्यामुळे दुष्काळाची तीव्रता वाढली होती़ यंदा पावसाचे प्रमाण वाढणार आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे वेधले आहे़बीटी कपाशीची लागवड २५ मे रोजी करण्यास शेतकऱ्यांनी सुरूवात केली आहे़ पाऊस पडल्यानंतर कपाशीची लागवड करावी़ मे महिन्यात कपाशीची लागवड केल्यास जमिनीत उष्णतेचे प्रमाण जास्त आहे़ त्यामुळे उगवण कमी होईल़ त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात कपाशी लागवडीचा निर्णय घ्यावा़ बागायती भागात जमीन ओलावून लागवड केली तरी तापमानाचा उगवण क्षमतेवर परिणाम होणार आहे़ -डॉ़ रवींद्र आंधळे, सहयोगी प्राध्यापक, हवामान विभाग, कृषी विद्यापीठयंदा उष्णतेची लाट आहे़ त्यामुळे मे ऐवजी जूनच्या पहिल्या आठवड्यात कपाशीची लागवड करणार आहे़ फार उशिरा लागवड केल्यास पुढील गव्हाचे पीक घेता येत नाही़ जूनमध्ये पहिल्या आठवड्यात पाऊस आल्यास कपाशीला फायदेशीर ठरेल़ मात्र पाऊस लांबल्याने कपाशी उत्पादकांचे लक्ष आभाळाकडे वेधले आहे़ यंदा चांगल्या पावसाची अपेक्षा आहे़ -विलास वराळे, अध्यक्ष, मुळाथडी शेतकरी बचत गट

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी