शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

पाच तालुुक्यांत पावसाची हजेरी : आतापर्यत सरासरी ६६ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 11:20 IST

गणरायाच्या आगमनाबरोबर कमी-अधिक प्रमाणात पावसाला सुरूवात झाल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवित होऊ लागल्या आहेत. बुधवारी सायंकाळी नगर शहरासह नेवासा, पारनेर, श्रीगोंदा व कर्जत तालुक्यांत समाधानकारक पावसाने हजेरी लावली.

अहमदनगर : गणरायाच्या आगमनाबरोबर कमी-अधिक प्रमाणात पावसाला सुरूवात झाल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवित होऊ लागल्या आहेत. बुधवारी सायंकाळी नगर शहरासह नेवासा, पारनेर, श्रीगोंदा व कर्जत तालुक्यांत समाधानकारक पावसाने हजेरी लावली.पावसाळ्याचे सुरूवातीचे साडेतीन महिने कोरडे गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पुरेशा पावसाअभावी खरीप हंगामातील पिके धोक्यात आली असून, उत्पादनात घट होण्याची शक्यता असताना आता रबीसाठी तरी पाऊस पडावा, अशी प्रार्थना शेतकरी गणरायाकडे करत आहेत. तीन दिवसांपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. बुधवारी नेवासा तालुक्यातील सलाबतपूर (१७), कुकाणा (३), चांदा (२८), घोडेगाव (१९), बडाळा बहिरोबा (७४), सोनई (१६), नगर तालुक्यातील नगर (१४), केडगाव (२१), चास (२३), भिंगार (२८), वाळकी (३७), चिंचोडी पाटील (८), सावेडी (२८), पारनेर तालुक्यातील पारनेर (१७), सुपा (१२), निघोज (१५), वाडेगव्हाण (५२), श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळा (२१), काष्टी (२१), बेलवंडी (३५), देवदैठण (२३), कोळगाव (२६), तर कर्जत तालुक्यातील कर्जत (१४), कोंभळी (१९), माही (१५), मिरजगाव (३१) वांबोरी (३०) आदी ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला. पाथर्डी, शेवगाव, जामखेड, श्रीरामपूर, राहुरी व राहाता या तालुक्यांत मात्र बुधवारच्या पावसाने पाठ फिरवली.शेतक-यांचे परतीच्या पावसाकडे डोळे४जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ६६ टक्के पाऊस झाला असला तरी अकोले तालुका वगळता इतर तालुक्यांत पावसाचे प्रमाण कमी आहे. शेतक-यांच्या सर्व आशा आता परतीच्या पावसाकडे लागल्या आहेत. उत्तरेतील मुळा, भंडारदरा, निळवंडे हे मोठे प्रकल्प वगळता जिल्ह्यातील इतर ठिकाणची धरणे, तलाव, बंधारे अद्याप कोरडेच आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRainपाऊस