शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

पुणे ते मनमाड रेल्वे मार्गावरील रेल्वे पॅसेंजर १६ जूनपर्यंत बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 14:13 IST

२५ एप्रिलपासून दौंड-नांदेड, नांदेड-दौंड, पुणे-निजामाबाद व निजामाबाद-पुणे या दिवसा चालणाऱ्या या चार रेल्वे पॅसेंजर गाड्या बंद आहेत. पुणे ते मनमाड रेल्वे मार्गावरील पॅसेंजर गाडया १६ जूनपर्यंत बंद राहणार आहेत. यापूर्वी त्या २३ मे पर्यंत बंद राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

ठळक मुद्दे२५ एप्रिलपासून दौंड-नांदेड, नांदेड-दौंड, पुणे-निजामाबाद व निजामाबाद-पुणे या दिवसा चालणाऱ्या या चार रेल्वे पॅसेंजर गाड्या बंद आहेत.पुणे ते मनमाड रेल्वे मार्गावरील पॅसेंजर गाडया १६ जूनपर्यंत बंद राहणार आहेत. यापूर्वी त्या २३ मे पर्यंत बंद राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

विसापूर : पुणे ते मनमाड रेल्वे मार्गावरील पॅसेंजर गाडया १६ जूनपर्यंत बंद राहणार आहेत. यापूर्वी त्या २३ मे पर्यंत बंद राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. ऐन सुट्ट्या व लग्नसराईच्या दिवसांमध्ये पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद राहिल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.२५ एप्रिलपासून दौंड-नांदेड, नांदेड-दौंड, पुणे-निजामाबाद व निजामाबाद-पुणे या दिवसा चालणाऱ्या या चार रेल्वे पॅसेंजर गाड्या बंद आहेत. त्यामुळे या मार्गावरील विसापूरसह इतर लहान रेल्वे स्थानके प्रवाशांअभावी नावापुरती राहिली आहेत. पॅसेंजर बंद झाल्यामुळे या स्थानकांमधून प्रवास करणा-या प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. या रेल्वे स्थानकांवर शुकशुकाट झाल्याने त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. एक महिना या गाड्या बंद राहणार होत्या. त्यानुसार २४ मे पासून या पॅसेंजर त्यांच्या नियमित वेळेनुसार सुरू होतील, अशा सूचना रेल्वे प्रशासनाने प्रत्येक स्थानकातील फलकावर लिहिल्या होत्या. पण पॅसेंजर बंदचा कालावधी वाढवून १६ जूनपर्यंत या रेल्वे गाड्या बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.काही महिन्यांपूर्वीही सुमारे दीड ते दोन महिने या पॅसेंजर बंद ठेवण्यात आल्या होत्या. रेल्वे प्रशासनाकडून पॅसेंजर गाडयांना दुय्यम स्थान दिले जात असल्याने पॅसेंजरमधून प्रवास करणा-या प्रवाशांमध्ये नाराजी आहे. पॅसेंजर गाड्या सुरळीत होण्यासाठी प्रवाशांना आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.दौंड-नगर दरम्यान काही जलद व धिम्या गतीच्या लोकल सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे. या मार्गाचे संपूर्ण विद्युतीकरण झालेले आहे. त्यामुळे दिवसात तीन चार लोकल सुरू झाल्यास प्रवाशांची चांगली सोय होईल. लोकल सुरू झाल्यास पॅसेंजर गाड्या बंद असल्यास प्रवाशांना जास्त त्रास सहन करावा लागणार नाही. दौंड-नगर दरम्यान विसापूर हे महत्त्वाचे स्थानक आहे. येथे दहा-पंधरा गावांचा परिसर तसेच कारागृह, भिक्षेकरीगृह, पाटबंधारे विभाग यासारखी सरकारी कार्यालये आहेत. त्यामुळे या ठिकाणी काही एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. विसापूर येथे शिर्डी पंढरपूर या फास्ट पॅसेंजर गाडीला थांबा देण्याची मागणी विसापूरच्या ग्रामसभेत करण्यात आली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRailway Passengerरेल्वे प्रवासीShrigondaश्रीगोंदा