शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

पुणे ते मनमाड रेल्वे मार्गावरील रेल्वे पॅसेंजर १६ जूनपर्यंत बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 14:13 IST

२५ एप्रिलपासून दौंड-नांदेड, नांदेड-दौंड, पुणे-निजामाबाद व निजामाबाद-पुणे या दिवसा चालणाऱ्या या चार रेल्वे पॅसेंजर गाड्या बंद आहेत. पुणे ते मनमाड रेल्वे मार्गावरील पॅसेंजर गाडया १६ जूनपर्यंत बंद राहणार आहेत. यापूर्वी त्या २३ मे पर्यंत बंद राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

ठळक मुद्दे२५ एप्रिलपासून दौंड-नांदेड, नांदेड-दौंड, पुणे-निजामाबाद व निजामाबाद-पुणे या दिवसा चालणाऱ्या या चार रेल्वे पॅसेंजर गाड्या बंद आहेत.पुणे ते मनमाड रेल्वे मार्गावरील पॅसेंजर गाडया १६ जूनपर्यंत बंद राहणार आहेत. यापूर्वी त्या २३ मे पर्यंत बंद राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

विसापूर : पुणे ते मनमाड रेल्वे मार्गावरील पॅसेंजर गाडया १६ जूनपर्यंत बंद राहणार आहेत. यापूर्वी त्या २३ मे पर्यंत बंद राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. ऐन सुट्ट्या व लग्नसराईच्या दिवसांमध्ये पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद राहिल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.२५ एप्रिलपासून दौंड-नांदेड, नांदेड-दौंड, पुणे-निजामाबाद व निजामाबाद-पुणे या दिवसा चालणाऱ्या या चार रेल्वे पॅसेंजर गाड्या बंद आहेत. त्यामुळे या मार्गावरील विसापूरसह इतर लहान रेल्वे स्थानके प्रवाशांअभावी नावापुरती राहिली आहेत. पॅसेंजर बंद झाल्यामुळे या स्थानकांमधून प्रवास करणा-या प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. या रेल्वे स्थानकांवर शुकशुकाट झाल्याने त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. एक महिना या गाड्या बंद राहणार होत्या. त्यानुसार २४ मे पासून या पॅसेंजर त्यांच्या नियमित वेळेनुसार सुरू होतील, अशा सूचना रेल्वे प्रशासनाने प्रत्येक स्थानकातील फलकावर लिहिल्या होत्या. पण पॅसेंजर बंदचा कालावधी वाढवून १६ जूनपर्यंत या रेल्वे गाड्या बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.काही महिन्यांपूर्वीही सुमारे दीड ते दोन महिने या पॅसेंजर बंद ठेवण्यात आल्या होत्या. रेल्वे प्रशासनाकडून पॅसेंजर गाडयांना दुय्यम स्थान दिले जात असल्याने पॅसेंजरमधून प्रवास करणा-या प्रवाशांमध्ये नाराजी आहे. पॅसेंजर गाड्या सुरळीत होण्यासाठी प्रवाशांना आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.दौंड-नगर दरम्यान काही जलद व धिम्या गतीच्या लोकल सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे. या मार्गाचे संपूर्ण विद्युतीकरण झालेले आहे. त्यामुळे दिवसात तीन चार लोकल सुरू झाल्यास प्रवाशांची चांगली सोय होईल. लोकल सुरू झाल्यास पॅसेंजर गाड्या बंद असल्यास प्रवाशांना जास्त त्रास सहन करावा लागणार नाही. दौंड-नगर दरम्यान विसापूर हे महत्त्वाचे स्थानक आहे. येथे दहा-पंधरा गावांचा परिसर तसेच कारागृह, भिक्षेकरीगृह, पाटबंधारे विभाग यासारखी सरकारी कार्यालये आहेत. त्यामुळे या ठिकाणी काही एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. विसापूर येथे शिर्डी पंढरपूर या फास्ट पॅसेंजर गाडीला थांबा देण्याची मागणी विसापूरच्या ग्रामसभेत करण्यात आली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRailway Passengerरेल्वे प्रवासीShrigondaश्रीगोंदा