शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मुळा धरणातून विसर्ग बंद; वांबोरी चारी आवर्तनासाठी तीन दिवसांची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 17:38 IST

राहुरी : मुळा धरणातून जायकवाडीकडे होणारा पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. धरणाकडे पारनेर तालुक्यातील होणारी पाण्याची आवक मंदावली आहे. वांबोरी ...

राहुरी : मुळा धरणातून जायकवाडीकडे होणारा पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. धरणाकडे पारनेर तालुक्यातील होणारी पाण्याची आवक मंदावली आहे. वांबोरी चारीच्या पाईपची दुरूस्ती अंतिंम टप्प्यात असून येत्या दोन तीन दिवसात पुन्हा चारी सुरू होणार आहे.मुळा धरणातून जायकवाडीकडे यंदाच्या पावसाळयात ६ हजार दशलक्ष घनफूट पाणी गेले आहे. मुळा धरणातून पाण्याचा विसर्ग दीर्घकाळ सुरू राहिल्याने नदीकाठी असलेल्या शेतीला दिलासा मिळाला आहे. नदीपात्रात असलेले बंधा-यात पाणी साठले आहे. त्यामुळे विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली असून उसाचे क्षेत्र वाढण्यास चालना मिळणार आहे.मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी यंदा ५ हजार ६०० दशलक्ष घनफूट  पाणी सोडण्यात आले आहे. आवर्तन सुरू राहिल्याने आम्हाला पाणी नको, अशी मागणी पाटबंधारे खात्याकडे शेतक-यांना करावी लागली होती. त्यानंतर उजवा कालवा बंद करण्यात आला होता. धरणाच्या उजव्या कालव्यातून यंदाच्या पावसाळयात ९०० दशलक्ष घनफूट पाणी शेतीसाठी सोडण्यात आले. दोन्ही कालव्याखाली असलेल्या क्षेत्रावर पावसाने सातत्य ठेवल्याने दोन्ही कालवे बंद करावे लागले होते.भागडा चारीखाली असलेले तळे भरण्याचे काम सध्या सुरू आहे. ५० क्युसेकेसने पाण्याचे आवर्तन सुरू आहे. वांबोरी चारीची दुरूस्तीमुळे गेल्या तीन दिवसांपासून तळ््यासाठी सोडण्यात आलेले पाणी आवर्तन बंद आहे. लिकेज काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा मुळा धरणातून आवर्तन सुरू करण्यात येणार आहे. मुळा धरणातून १०२ बंधा-यापैकी ७० बंधारे पूर्ण क्षमतेकडे भरण्याचे काम सुरू होते. अन्य बंधा-यात पाणी जाण्यास तांत्रिक अडचणी असून जास्तीत जास्त क्षमतेने बंधारे भरण्याचे नियोजन सुरू आहे.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरWaterपाणी