शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
3
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
4
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
5
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
6
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
7
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
8
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
9
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
10
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
11
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
12
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
13
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
14
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
15
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
16
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
17
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
18
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
19
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
20
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष

मुळा धरणातून विसर्ग बंद; वांबोरी चारी आवर्तनासाठी तीन दिवसांची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 17:38 IST

राहुरी : मुळा धरणातून जायकवाडीकडे होणारा पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. धरणाकडे पारनेर तालुक्यातील होणारी पाण्याची आवक मंदावली आहे. वांबोरी ...

राहुरी : मुळा धरणातून जायकवाडीकडे होणारा पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. धरणाकडे पारनेर तालुक्यातील होणारी पाण्याची आवक मंदावली आहे. वांबोरी चारीच्या पाईपची दुरूस्ती अंतिंम टप्प्यात असून येत्या दोन तीन दिवसात पुन्हा चारी सुरू होणार आहे.मुळा धरणातून जायकवाडीकडे यंदाच्या पावसाळयात ६ हजार दशलक्ष घनफूट पाणी गेले आहे. मुळा धरणातून पाण्याचा विसर्ग दीर्घकाळ सुरू राहिल्याने नदीकाठी असलेल्या शेतीला दिलासा मिळाला आहे. नदीपात्रात असलेले बंधा-यात पाणी साठले आहे. त्यामुळे विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली असून उसाचे क्षेत्र वाढण्यास चालना मिळणार आहे.मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी यंदा ५ हजार ६०० दशलक्ष घनफूट  पाणी सोडण्यात आले आहे. आवर्तन सुरू राहिल्याने आम्हाला पाणी नको, अशी मागणी पाटबंधारे खात्याकडे शेतक-यांना करावी लागली होती. त्यानंतर उजवा कालवा बंद करण्यात आला होता. धरणाच्या उजव्या कालव्यातून यंदाच्या पावसाळयात ९०० दशलक्ष घनफूट पाणी शेतीसाठी सोडण्यात आले. दोन्ही कालव्याखाली असलेल्या क्षेत्रावर पावसाने सातत्य ठेवल्याने दोन्ही कालवे बंद करावे लागले होते.भागडा चारीखाली असलेले तळे भरण्याचे काम सध्या सुरू आहे. ५० क्युसेकेसने पाण्याचे आवर्तन सुरू आहे. वांबोरी चारीची दुरूस्तीमुळे गेल्या तीन दिवसांपासून तळ््यासाठी सोडण्यात आलेले पाणी आवर्तन बंद आहे. लिकेज काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा मुळा धरणातून आवर्तन सुरू करण्यात येणार आहे. मुळा धरणातून १०२ बंधा-यापैकी ७० बंधारे पूर्ण क्षमतेकडे भरण्याचे काम सुरू होते. अन्य बंधा-यात पाणी जाण्यास तांत्रिक अडचणी असून जास्तीत जास्त क्षमतेने बंधारे भरण्याचे नियोजन सुरू आहे.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरWaterपाणी