शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात अर्थव्यवस्थेची भरारी; शिर्डी दौऱ्यापूर्वी विखे पाटलांची बैठक

By शिवाजी पवार | Updated: October 24, 2023 16:18 IST

पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त श्रीरामपुरात बैठक

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : पंतप्रधान मोदींमुळे भारताची अर्थव्यवस्था ही तिसऱ्या क्रमांकावर आली. त्याकडे विस्तृत नजरेतून पहायला हवे. देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी आणि देशाचे संरक्षण करणारा जवान यांच्यासाठी समर्पित भावनेने काम करणाऱ्यांबद्दल आदर निर्माण झाला तर देशाचा विकास होईल, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त येथील स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या नियोजनाच्या बैठकीत मंत्री विखे बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, भाजप तालुकाध्यक्ष दीपक पटारे, ज्येष्ठ नेते इंद्रनाथ थोरात, नानासाहेब पवार, शरद नवले, उपसभापती अभिषेक खंडागळे, मारुती बिंगले, केतन खोरे, गिरीधर आसने, नितीन दिनकर आदी उपस्थित होते.

विखे पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे कोविड काळात कोट्यवधी लोकांना लस मिळाली. गरजू घटकांना मोफत धान्य दिले जात आहे. २०२४ पर्यंत प्रत्येक घराला नळाने पाणी पुरवले जाणार आहे. मात्र ज्यांनी या सेवा दिल्या, त्यांच्याबद्दल आपण संवेदना व्यक्त करतो का? याचाही अंतर्मुख होऊन विचार करावा. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देश सामर्थ्याने पुढे जात आहे. विश्वनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अशावेळी आपला पक्ष, देश, नेता, आपली योजना या भावनेतून किती कार्यकर्त्यांनी फलक लावले? संघटनेचे बळकटीकरण करण्यासाठी यापुढे कार्यकर्त्यांना आचारसंहितेची चौकट तयार करावी लागेल. पक्षाचा सभासद आहे की नाही हे पाहून शिस्त लावावी लागेल.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलNarendra Modiनरेंद्र मोदी