शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
2
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, महापालिका निवडणुकीत नवा वाद; प्रचार संपला तरीही उमेदवारांना...
4
एका दिवसात १ लाख कोटींचा धुराळा! टाटांच्या 'या' कंपनीचा शेअर धडाम; संक्रांतीपूर्वीच गुंतवणूकदारांना 'धक्का'
5
T20 Word Cup: ४ परदेशी खेळाडूंना भारताचा व्हिसा नाकारला; 'पाकिस्तान कनेक्शन' पडले महागात
6
"...तर तेव्हा उपमुख्यमंत्री झाले नसते'; बसवलेला मुख्यमंत्री म्हणत राज ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा
7
'काँग्रेसचा वाण नाही, पण गुण लागला' राज ठाकरेंच्या सभेनंतर उदय सामंतांचा टोला!
8
दुपारी जेवणानंतर का येते झोप? सायंटिफीक कारण समजल्यावर तुम्हीही नक्कीच घ्याल 'पॉवर नॅप'
9
तुम्ही संभाजीनगरचे पालक, पण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मालक; संजय केनेकर शिरसाटांवर संतापले
10
IND vs NZ: विराट-शिखरचा विक्रम धोक्यात! श्रेयस अय्यर वनडे क्रिकेटमध्ये रचणार 'असा' इतिहास
11
२०००% नं वधारला हा स्मॉलकॅप शेअर, ₹54 वर आलाय भाव; आता कंपनी ₹84 कोटींचे भांडवल उभारणार
12
तुमच्या कुटुंबाचे भविष्य करा सुरक्षित! वर्षाला फक्त २० रुपये भरा आणि मिळवा २ लाखांचे कवच
13
मतदानादिवशी ठाकरे बंधूंचे 'भगवा गार्ड' मैदानात उतरणार, दुबार, बोगस मतदारांना पकडणार आणि...
14
Rohit Sharmaची पत्नी रितिकाच्या हातातल्या महागड्या पर्सची रंगली चर्चा, किंमत ऐकून थक्क व्हाल
15
"हेडगेवारांना कारावास झाला होता, पण...", भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील RSS च्या भूमिकेवर ओवेसींनी उपस्थित केला सवाल
16
'या' विमान कंपनीची नवी ऑफर: प्रवाशांना मोठी भेट; मोठ्यांना १,४९९ रुपयांपासून तर मुलांना १ रुपयांत विमान प्रवास
17
Nashik Municipal Election 2026 : उद्धवसेनेची अस्तित्वासाठी लढाई; नावालाच आघाडी, मैत्री मनसेशीच
18
Bornhan: मकर संक्रांत ते रथसप्तमी: बाळाची पहिली संक्रांत? मग 'बोरन्हाण' घालताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात!
19
Travel : एकटं फिरायचंय? टेन्शन सोडा! सोलो ट्रॅव्हलिंगसाठी 'ही' ५ ठिकाणे आहेत सर्वात बेस्ट
20
"हा साप मला चावलाय, माझ्यावर उपचार करा" सापाला खिशात घालून रिक्षा चालकानं गाठलं रुग्णालय
Daily Top 2Weekly Top 5

राधाकृष्ण विखे नैराश्येतून बोलतात; त्यांच्या बोलण्याला महत्व देऊ नका : थोरात यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 16:26 IST

राधाकृष्ण विखे यांचे बोलणे नैराश्यातून येत असते. त्यामुळे त्याला फार महत्व देऊ नये, असेही थोरात म्हणाले.

संगमनेर : संगमनेरात घडलेली घटना दुर्दैवी आहे. असे घडायला नको होते. पोलीस त्यांचे कर्तव्य पार पाडत असताना त्यांना ज्या पद्धतीची वागणूक दिली गेली. ती अत्यंत चुकीची आहे. जो चुकीचा वागला त्याला शिक्षा झालीच पाहिजे. मग तो कुणीका असेना. त्या पद्धतीने पोलिसांनी, प्रशासनाने काम करावे, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. तसेच राधाकृष्ण विखे यांचे बोलणे नैराश्यातून येत असते. त्यामुळे त्याला फार महत्व देऊ नये, असेही थोरात म्हणाले.

गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला करत दगडफेक केल्याची घटना गुरूवारी (दि. ६) संगमनेर शहरातील दिल्ली नाका (तीन बत्ती) परिसरात घडली होती. या प्रकरणी सहा निष्पन्न आरोपींसह अज्ञात १० ते १५ जणांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांवर संगमनेरात झालेल्या हल्ल्याबाबत माध्यम प्रतिनिधींनी महसूलमंत्री थोरात यांच्यांशी संवाद साधला. सर्व प्रशासन यंत्रणा पोलिसांसह काम करते आहे. ते काम नागरिकांच्या हिताकरिता, त्यांच्या आरोग्याकरिता आहे, असेही थोरात म्हणाले.

   राधाकृष्ण विखे काय बोलतात याला फार महत्व देत जाऊ नका. शेवटी ते आता विरोधी पक्षाची भूमिका बजावत असताना नैराश्यातून बोलत असतात. जे इथे घडले तसे त्यांच्याकडे काही चुकीचे घडत नाही, असे नाही. शेवटी तो मानवी स्वभाव आहे. नैराश्यातून राधाकृष्ण विखे पाटलांचे बोलणे येत असते. त्यामुळे त्याला फार महत्व देऊ नये. असेही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. संगमनेरच्या लोकप्रतिनिधींचा त्यांच्या मतदार संघात संपर्क राहिला नसल्याचे विखे बोलले होते. त्यावर महसूलमंत्री थोरात यांनी पलटवार केला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलSangamnerसंगमनेर