मंगळवारी बारागाव नांदूर येथे होडी धक्का ते जांभळी दरम्यान मुळा धरणाच्या पाण्यावर पुलाच्या कामाच्या सर्वेक्षणाप्रसंगी तनपुरे बोलत होते.
तनपुरे म्हणाले, धरणाच्या पलीकडील वावरथ, जांभळी, जांभुळबन गावांसाठी १९८२ साली मुळा प्रवरा वीज संस्थेच्या माध्यमातून वीज पोहोचविली. नालाबंडिंगची कामे केली. मुळा धरण, के.के. रेंज व कृषी विद्यापीठ या राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी या गावांचा त्याग मोठा आहे. त्यामुळे कितीही खर्च आला तरी पुलाचे काम करावे, असा आग्रह धरला. जलसंपदा व सार्वजनिक बांधकामच्या पन्नास-पन्नास टक्के निधीतून पुलाची उभारणी होईल.
या पुलामुळे पुण्याचे अंतर ३५ किलोमीटर तर मुंबईचे अंतर ५० किलोमीटरने कमी होईल. मराठवाड्याचा मार्ग जोडला जाईल. तालुक्यात आतापर्यंत सोळा पुलांची मालिका उभारली. आता माझ्या आयुष्यातील हा शेवटचा पूल असेल. येत्या महिनाभरात सर्वेक्षणाचे काम होईल.
यावेळी नगरच्या मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता काशिनाथ मासाळ, सुरेश वाबळे, सुरेश निमसे, ज्ञानेश्वर बाचकर, वर्षा बाचकर, विजय तमनर, खंडू बाचकर, पंढरीनाथ पवार, रवींद्र आढाव, प्रभाकर गाडे, बाळासाहेब गाडे, गंगाधर तमनर, निवृत्ती देशमुख, श्रीराम गाडे, वसंत गाडे, अविनाश ओहोळ, अण्णासाहेब खिलारी उपस्थित होते.