शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

सव्वा सहा लाख विद्यार्थी परत करणार पाठ्यपुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:21 IST

पहिली ते आठवी : गतवर्षीच्या पुस्तकांचा करणार पुनर्वापर अहमदनगर : सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत ...

पहिली ते आठवी : गतवर्षीच्या पुस्तकांचा करणार पुनर्वापर

अहमदनगर : सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत पुस्तके दिली जातात. परंतु यंदा जुन्या पुस्तकांचा पुनर्वापर करण्यासाठी गतवर्षीची पुस्तके परत करण्याचे आवाहन पालकांना करण्यात आले असून त्यानुषंगाने जिल्ह्यातील पहिली ते आठवीचे एकूण सव्वासहा लाख विद्यार्थी पुस्तके परत करणार आहेत.

दरवर्षी शासनाकडून पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून करण्यात येते. मागील वर्षी पहिली ते आठवीपर्यंतच्या एकूण ६ लाख २१ हजार विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. पण मागील वर्ष कोरोनामध्येच गेले. विद्यार्थी घरीच असल्याने त्यांच्याकडून पुस्तकांची हाताळणी इतर वर्षीच्या तुलनेने कमी झाली असावी. यातून पुस्तके सुस्थितीत असल्याचा अंदाज व्यक्त करत तसेच यावर्षी कोरोनामुळे पुन्हा पुस्तके वाटप करण्याच्या अनुषंगाने शासनापुढे आर्थिक अडचण असल्याने मागील वर्षीची सुस्थितीत असलेली पुस्तके विद्यार्थ्यांकडून जमा करून ती या वर्षी इतर विद्यार्थ्यांना द्या, असे शासनाने शिक्षण विभागाला कळवले आहे. त्या अनुषंगाने शिक्षण विभागाने शिक्षकांना सूचना दिलेल्या आहेत. शिक्षक आपापल्या परीने पालकांशी संपर्क करून पाठ्यपुस्तके जमा करून घेण्याचे काम करत आहेत, मात्र कोरोनाची स्थिती असल्याने त्याचा वेग कमी आहे.

------------

कोणत्या वर्गात किती विद्यार्थी

वर्ग. विद्यार्थी संख्या

पहिली ६८७१६

दुसरी ७४८९६

तिसरी ७८४५१

चौथी ८०४४९

पाचवी ७९६०५

सहावी ७९७१६

सातवी ७९७७८

आठवी ८००६८

नववी ८१२००

अकरावी ६३८२२

-----------------------------

एकूण. ६२१६७९

-------------------

यावर्षी मागणी किती ?

सुस्थितीत असलेली पुस्तके जमा केल्यानंतर यावर्षी किती पुस्तके पुन्हा वाटपासाठी लागतील याचा हिशेब करून शासन काही प्रमाणात नवीन पुस्तके विद्यार्थ्यांना देऊ शकते.

----------

कोरोनामुळे पुस्तके जमा करण्यात अडचणी

ग्रामीण भागात कोरोना रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पुस्तके जमा करण्याचे मोठे आव्हान शिक्षकांसमोर आहे. काही गावांमध्ये जनता कर्फ्यूही आहे. त्यामुळे पुस्तके जमा करण्यात शिक्षकांसमोर अडचणी येत आहेत.

------------

सर्व शिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून नवीन पुस्तके दिली जातात. परंतु यंदा पाठ्यपुस्तके जमा करण्याचे आवाहन पालकांना केलेले आहे. पुस्तके जमा करून ती खालच्या वर्गांना देणार आहोत. त्यातून पुस्तकाचा पुनर्वापर होईल.

- गुलाब सय्यद, शिक्षणाधिकारी, प्राथमिक

--------------

पुस्तके जमा करण्याबद्दल शिक्षकांकडून समजले आहे. परंतु कोरोना संसर्गामुळे अद्याप जमा केले नाही. वातावरण निवळताच पुस्तके शाळेत जमा केले जातील.

- संजय सोनवणे, पालक

जि.प.प्रा.शाळा निबेदेवकर वस्ती, ता. राहाता

---------------

पुस्तकाचा पुनर्वापर करणे चांगली गोष्ट आहे. आमच्या विद्यार्थ्यांचे पुस्तके इतर विद्यार्थ्यांच्या कामी येत असतील तर चांगली बाब आहे. शिक्षकांचा आवाहनानुसार लवकरच पुस्तके परत केली जातील.

- पाराजी खरात, पालक

जि. प शाळा वरशिंदे, ता. राहुरी

--------

नेट फोटो- डमी

बुक गाईड हेरो बुक्स

०७ टेक्सबुक रिटर्न डमी

बुक गाईड हिरो बुक्स