शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सव्वा सहा लाख विद्यार्थी परत करणार पाठ्यपुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:21 IST

पहिली ते आठवी : गतवर्षीच्या पुस्तकांचा करणार पुनर्वापर अहमदनगर : सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत ...

पहिली ते आठवी : गतवर्षीच्या पुस्तकांचा करणार पुनर्वापर

अहमदनगर : सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत पुस्तके दिली जातात. परंतु यंदा जुन्या पुस्तकांचा पुनर्वापर करण्यासाठी गतवर्षीची पुस्तके परत करण्याचे आवाहन पालकांना करण्यात आले असून त्यानुषंगाने जिल्ह्यातील पहिली ते आठवीचे एकूण सव्वासहा लाख विद्यार्थी पुस्तके परत करणार आहेत.

दरवर्षी शासनाकडून पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून करण्यात येते. मागील वर्षी पहिली ते आठवीपर्यंतच्या एकूण ६ लाख २१ हजार विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. पण मागील वर्ष कोरोनामध्येच गेले. विद्यार्थी घरीच असल्याने त्यांच्याकडून पुस्तकांची हाताळणी इतर वर्षीच्या तुलनेने कमी झाली असावी. यातून पुस्तके सुस्थितीत असल्याचा अंदाज व्यक्त करत तसेच यावर्षी कोरोनामुळे पुन्हा पुस्तके वाटप करण्याच्या अनुषंगाने शासनापुढे आर्थिक अडचण असल्याने मागील वर्षीची सुस्थितीत असलेली पुस्तके विद्यार्थ्यांकडून जमा करून ती या वर्षी इतर विद्यार्थ्यांना द्या, असे शासनाने शिक्षण विभागाला कळवले आहे. त्या अनुषंगाने शिक्षण विभागाने शिक्षकांना सूचना दिलेल्या आहेत. शिक्षक आपापल्या परीने पालकांशी संपर्क करून पाठ्यपुस्तके जमा करून घेण्याचे काम करत आहेत, मात्र कोरोनाची स्थिती असल्याने त्याचा वेग कमी आहे.

------------

कोणत्या वर्गात किती विद्यार्थी

वर्ग. विद्यार्थी संख्या

पहिली ६८७१६

दुसरी ७४८९६

तिसरी ७८४५१

चौथी ८०४४९

पाचवी ७९६०५

सहावी ७९७१६

सातवी ७९७७८

आठवी ८००६८

नववी ८१२००

अकरावी ६३८२२

-----------------------------

एकूण. ६२१६७९

-------------------

यावर्षी मागणी किती ?

सुस्थितीत असलेली पुस्तके जमा केल्यानंतर यावर्षी किती पुस्तके पुन्हा वाटपासाठी लागतील याचा हिशेब करून शासन काही प्रमाणात नवीन पुस्तके विद्यार्थ्यांना देऊ शकते.

----------

कोरोनामुळे पुस्तके जमा करण्यात अडचणी

ग्रामीण भागात कोरोना रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पुस्तके जमा करण्याचे मोठे आव्हान शिक्षकांसमोर आहे. काही गावांमध्ये जनता कर्फ्यूही आहे. त्यामुळे पुस्तके जमा करण्यात शिक्षकांसमोर अडचणी येत आहेत.

------------

सर्व शिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून नवीन पुस्तके दिली जातात. परंतु यंदा पाठ्यपुस्तके जमा करण्याचे आवाहन पालकांना केलेले आहे. पुस्तके जमा करून ती खालच्या वर्गांना देणार आहोत. त्यातून पुस्तकाचा पुनर्वापर होईल.

- गुलाब सय्यद, शिक्षणाधिकारी, प्राथमिक

--------------

पुस्तके जमा करण्याबद्दल शिक्षकांकडून समजले आहे. परंतु कोरोना संसर्गामुळे अद्याप जमा केले नाही. वातावरण निवळताच पुस्तके शाळेत जमा केले जातील.

- संजय सोनवणे, पालक

जि.प.प्रा.शाळा निबेदेवकर वस्ती, ता. राहाता

---------------

पुस्तकाचा पुनर्वापर करणे चांगली गोष्ट आहे. आमच्या विद्यार्थ्यांचे पुस्तके इतर विद्यार्थ्यांच्या कामी येत असतील तर चांगली बाब आहे. शिक्षकांचा आवाहनानुसार लवकरच पुस्तके परत केली जातील.

- पाराजी खरात, पालक

जि. प शाळा वरशिंदे, ता. राहुरी

--------

नेट फोटो- डमी

बुक गाईड हेरो बुक्स

०७ टेक्सबुक रिटर्न डमी

बुक गाईड हिरो बुक्स