शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

दहशत माजविणा-यांची भाजपमध्ये रांग : सुजय विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 10:48 IST

भाजप हा आयात उमेदवारांचा पक्ष आहे. त्यांची वैयक्तिक संघटना शून्य आहे. पैसा, सत्ता आणि दबावाच्या जोरावर त्यांनी उमेदवार आयात केले.

अहमदनगर : भाजप हा आयात उमेदवारांचा पक्ष आहे. त्यांची वैयक्तिक संघटना शून्य आहे. पैसा, सत्ता आणि दबावाच्या जोरावर त्यांनी उमेदवार आयात केले. नगर शहरातही दहशत माजविणा-यांची या पक्षात रांग लागली आहे. केडगावचे आमचे उमेदवार त्यांनी दहशत करुन पळविले, अशी टीका काँग्रेसचे युवक नेते डॉ. सुजय विखे यांनी केली.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विखे यांनी ‘लोकमत’ फेसबुक लाईव्हमध्ये आपली भूमिका मांडली.कॉंग्रेसचे नगरसेवक भाजपात कसे गेले? या प्रश्नावर ते म्हणाले, हा विषय अचानक घडला. ते कोतकर यांचे समर्थक होते. त्यांच्या आदेशाने ते भाजपात गेले. मात्र २४ तासात तिथे काँग्रेसने दुसरे उमेदवार दिले. भाजपने दबाव टाकून या लोकांना पक्षात घेतले.दोन्ही कॉंग्रेस नगर शहरात दहशत करते या शिवसेनेच्या आरोपाकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, दहशत कोण करतेय हे शिवसेनेने नावानिशी सांगावे. दहशत करणारे आज निवडूनच येऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. लोक अशा दादांना पराभूत करतात. आपणही दहशतीला कधीच मदत करणार नाही. दहशतीपेक्षा काम करणे महत्त्वाचे आहे. संग्राम जगताप, संदीप कोतकर, सुवर्णा कोतकर यांनी शहरात चांगले काम केले म्हणूनच लोकांनी त्यांना स्वीकारले. संदीप कोतकर आणि संग्राम जगताप हे महापौर असताना आघाडीच्या काळात कोट्यवधी रुपयांचा निधी महापालिकेला आला, हीही बाब लक्षात घ्यावी लागेल. केवळ टीका करणे गैर आहे.गांधी यांना शून्य गुणखासदार दिलीप गांधी यांना त्यांच्या कामाबद्दल किती गुण द्याल, असा प्रश्न केला असता विखे म्हणाले, शून्यापेक्षाही कमी गुण देईल. भाजप आज शहरात विकासाचे फलक लावत आहे. मग, आजवर त्यांनी काय दिले लावले? हेही सांगावे.महापौर पदाचे उमेदवार जाहीर करामहापालिकेच्या निवडणुकीपूर्वी महापौर पदाचे उमेदवार जाहीर होणे आवश्यक आहे. लोक एकतर महापौर पदाचा चेहरा पाहून मतदान करतात किंवा नगरसेवक पदाचा उमेदवार पाहून. कॉंग्रेस कमी जागांवर लढत असल्याने आम्ही राष्टÑवादीच्या पाठिशी राहणार आहोत. शहरात आघाडीचा महापौर होणार हे निश्चित आहे.आमच्याकडे शहर विकासाचे खाते नव्हतेविखे, थोरात हे मातब्बर नेते जिल्ह्यात असताना नगर शहर का सुधारले नाही? या प्रश्नावर विखे म्हणाले, आपल्या वडिलांकडे मंत्रिपद होते. मात्र, शहराचा विकास करता येईल असे नगरविकास किंवा गृहखाते नव्हते. ते असते तर वेगळे घडले असते. तरीपण आपले आजोबा व वडिलांमुळे आरटीओ कार्यालयाची जागा व इतर अनेक प्रश्न सुटले आहेत.मी बोलू कोणाविरुद्धमी कोणाविरुद्ध बोलू, अशी माझी संभ्रमावस्था झाली आहे. दहावे आणि लग्न करणे ही निवडून येण्याची पात्रता नसली पाहिजे. विकास कामे करणे हीच खरी पात्रता आहे. राहाता तालुक्यात भरपूर कामे केली आहेत. कोणत्याही पक्षावर मला टीका करायची नाही. मात्र दुर्दैवाने मला भाजपवर टीका करावी लागते. मी कोणाविरुद्ध बोललो की मलाच त्रास होतो.उड्डाणपूल हे केवळ भूत‘वो स्त्री यहॉ मत आना’ या ‘स्त्री’ चित्रपटातील कथेसारखी उड्डाणपुलाची स्थिती आहे. वो उड्डाणपूल यहाँ मत आना. उड्डाणपूल हे केवळ भूत आहे. निवडणूक आली की हे भूत येते. उड्डाणपुलाचे फलक लावले. मात्र प्रत्यक्ष काय कार्यवाही झाली? सर्वे, भूसंपादन, याची कुठेच माहिती नाही. उड्डाणपूल जाऊ द्या, मात्र बाह्यवळण रस्त्याला २५ कोटी दिले तरी खूप काही होईल. या रस्त्याची आज काय दुर्दशा झाली आहे, हे आपण सर्वजण पाहतो आहोत. उड्डाणपूल करायचे काम हे महापालिकेचे नव्हे तर निवडून आलेल्या खासदारांचे आहे. केंद्राच्या निधीतूनच पूल झाला पाहिजे. महापालिकेची सत्ता आणि पुलाचा काहीही संबंध नाही. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी हे देशातील रस्त्यांची कामे करीत आहेत. त्याअंतर्गत हा पूल आहे. त्यासाठी खासदारांनी पाठपुरावा केला पाहिजे. महापालिकेचे अनेक वर्षांचे बजेट एकत्र केले तरी पूल होणार नाही.‘लोकमत’च्या मुलाखतींना तुफान प्रतिसादमहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने सुरू केलेल्या रोखठोक फेसबुक लाईव्ह मुलाखतींना तुफान प्रतिसाद मिळत आहे.आ. संग्राम जगताप यांची मुलाखत साडे आठ हजारांहून अधिक फेसबुक वाचकांनी पाहिली.अनिल राठोड यांच्या मुलाखतीला पहिल्या दोनच दिवसात सहा हजार ‘व्ह्युज’ मिळाल्या आहेत.सुजय विखे यांच्या मुलाखतीला पहिल्या चार तासात अडीच हजार ‘व्ह्युज’ मिळाल्या आहेत. नगर शहरात प्रथमच असा प्रयोग होत आहे. या प्रयोगाबद्दल वाचकांनी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले आहेत.व्हिडिओ पाहण्यासाठी ` lokmat Ahmednagar` या फेसबुक पेजला भेट द्या.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका