शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

श्रीगोंद्यातील जांभळाची पुणेकरांना गोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 15:45 IST

श्रीगोंदा-चांडगाव रस्त्यावर शेती असणा-या संपत किसन कोथिंबीरे यांच्या जांभळाची पुणेकरांना गोडी लागली आहे. जांभळाला प्रति किलो अडीचशे रूपयांचा भाव मिळत आहे. यासाठी अगाऊ मागणी होत असून आॅनलाईन पेमेंट मिळाल्यानंतर जांभूळ पोहोच केले जात आहे.  कोरोना काळात शेतकरी हतबल झालेले असतानाच कोथिंबीरे यांच्या जांभळाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

शरद शिंदे  । 

आढळगाव : श्रीगोंदा-चांडगाव रस्त्यावर शेती असणा-या संपत किसन कोथिंबीरे यांच्या जांभळाची पुणेकरांना गोडी लागली आहे. जांभळाला प्रति किलो अडीचशे रूपयांचा भाव मिळत आहे. यासाठी अगाऊ मागणी होत असून आॅनलाईन पेमेंट मिळाल्यानंतर जांभूळ पोहोच केले जात आहे.  कोरोना काळात शेतकरी हतबल झालेले असतानाच कोथिंबीरे यांच्या जांभळाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

संपत कोथिंबीरे यांना साडेनऊ एकर शेती आहे. त्यामध्ये पाच एकर द्राक्षे, तीन एकर डाळिंब आहे. जेमतेम शिक्षण असलेले कोथिंबीरे शेतीच्या अभ्यासासाठी राज्यभर फिरले आहेत. त्या अभ्यासातून त्यांनी जांभूळाचे व्यावसायिक महत्व ओळखले. केवळ सव्वा एकर क्षेत्रात चार वर्षापूर्वी बहाडोली वानाचे जांभूळ लावले. सोळा बाय सोळा फूट अंतरावर लागवड केली.  त्यात अडीचशे झाडे बसली. शेणखताचा जास्तीत जास्त वापर केला. औषधी गुणधर्माबरोबरच उत्तम सौंदर्य प्रसाधक असलेल्या आंबट, गोड आणि तुरट चव असणाºया रसाळ जांभूळाला मोठी मागणी असते. गेल्या वर्षी फळांना सुरुवात झाली. यावर्षी कोथिंबीरे परिवाराने जांभळाच्या शेतीला विशेष लक्ष देऊन जोमदार फळ आणले. 

कोथिंबीरे यांच्या पत्नी नंदा दिवसभर स्थानिक मजुरांच्या मदतीने निगुतीने झाडावरून फळे काढून घेतात. शाळांना लॉकडाऊन असल्यामुळे घरीच असलेली मुले सोनाली, वैष्णवी आणि ओम हे फळांची प्रतवारी करून प्रत्येक फळ पाहून बॉक्समध्ये भरतात. मागणीनुसार बॉक्स भरून सकाळीच्या वेळी लवकरच स्वत: संपत कोथिंबिरे पुण्याला रवाना होतात. यातून त्यांना दहा लाखाच्या उत्पन्नाची आशा आहे. तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के, कृषी सहाय्यक अजिनाथ फंड यांनी भेट देऊन जांभूळ शेतीचे कौतुक केले.

शेतक-यानेच ठरविला भावकोरोनाच्या संकटामुळे शहरांतील फळविक्रीची साखळी ब्रेक झाली होती. कोथिंबीरे यांचा कष्टाने मिळविलेल्या आपल्या उत्पादनावर विश्वास असल्यामुळे पुण्याची बाजारपेठ काबीज करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाला न घाबरता आरोग्याची काळजी  घेऊन पुणे परिसरातील रहिवासी सोसायट्यांमध्ये एक किलोच्या आकर्षक पॅकिंगच्या ‘कोथिंबीरे फार्म’च्या ब्रँडने जांभूळ विक्री सुरू केली.  दर्जेदार जांभळामुळे दिवसेंदिवस मागणी वाढत गेली. पुण्याच्या बाजारपेठेत व्यापा-यांच्या नाही तर कोथिंबीरेंच्या मतावर जांभळाचा बाजार ठरला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा