शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

शासकीय दराने दूध, उडीद खरेदीसाठी कर्जतमध्ये रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 15:58 IST

कर्जत तालुक्यातील भारनियमन बंद करावे, शेतक-यांचा उडीद विनाअट खरेदी करावा, शासकीय दराने दूध खरेदी करावी, अहमदनगर-सोलापूर राज्य मार्गाची दुरुस्ती करावी, माहिजळगाव परिसराला कुकडीचे पाणी नियमित मिळावे, या मागण्यांसाठी रास्ता रोको

कर्जत : शासकी दराने दूध, उडीद खरेदीसह विविध मागण्यांसाठी बुधवारी माहिजळगाव येथे दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतक-यांच्या मागण्या मान्य न झाल्यास २४ आॅक्टोबर रोजी कर्जत येथे दंडूके मोर्चा काढून शासकीय कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.कर्जत तालुक्यातील भारनियमन बंद करावे, शेतक-यांचा उडीद विनाअट खरेदी करावा, शासकीय दराने दूध खरेदी करावी, अहमदनगर-सोलापूर राज्य मार्गाची दुरुस्ती करावी, माहिजळगाव परिसराला कुकडीचे पाणी नियमित मिळावे, या मागण्यासाठी कर्जत तालुका काँग्रेसचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली माहिजळगाव येथे चौफुल्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन दोन तास चालले. यावेळी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. संतप्त शेतक-यांनी केंद्र व राज्य सरकार यांच्या कारभारावर जोरदार टीका केली. तसेच पालकमंत्री राम शिंदे यांच्या बाबत नाराजी व्यक्त केली. भाजपचे सरकार अच्छे दिन आणेल, असा सर्वांना विश्वास होता. मात्र या सरकारने भ्रमनिरास केला. हे शेतकरी हिताचे नाही तर व्यापारी हिताचे सरकार आहे, कशी टीका करण्यात आली. यामुळे ऐन दिवाळीत शेतक-यांना त्यांच्या विविध प्रकारच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले आहे. या आंदोलनात माहिजळगाव व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी किरण पाटील, युवक काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे अध्यक्ष दादासाहेब सोनमाळी, काँग्रेस नेते बाळासाहेब साळुंके, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रविण घुले, कैलास शेवाळे, शेतकरी संघटनेचे संजय तोरडमल, भानुदास हाके यांची भाषणे झाली़ आंदोलनात सतिष पाटील, संतोष धुमाळ, किशोर कोपनर, सुभाष महारनवर, कांतिलाल देवगिरे, गोकुळ इरकर, विष्णू खेडकर, नवनाथ कदम यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी आंदोलक उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी बदलला मार्ग

पालकमंत्री राम शिंदे हे आज सकाळी चौंडी येथे होते़ ते माहिजळगावमार्गे नगरला जाणार होते. मात्र या आंदोलनामुळे पालकमंत्र्यांनी मार्ग बदलला व ते जामखेडमार्गे नगरला गेले. पालकमंत्र्यांनी आंदोलकांना घाबरुन मार्ग बदलला, असे कर्जत तालुका काँग्रेसचे अध्यक्ष किरण पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरीStrikeसंप