शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

देवदर्शनाला जाणाऱ्या महिलांना संरक्षण द्यावे

By admin | Updated: April 2, 2016 23:59 IST

अहमदनगर : शनिशिंगणापूर व तत्सम देवस्थानांमध्ये महिलांना दर्शन व पूजा करण्याची कायद्यानेच परवानगी दिल्याने देवस्थान समिती व ग्रामस्थांनी विरोधाची भूमिका घेणे चुकीचे आहे़

अहमदनगर : शनिशिंगणापूर व तत्सम देवस्थानांमध्ये महिलांना दर्शन व पूजा करण्याची कायद्यानेच परवानगी दिल्याने देवस्थान समिती व ग्रामस्थांनी विरोधाची भूमिका घेणे चुकीचे आहे़ देवस्थानात दर्शनासाठी जाणाऱ्या महिलांना शासनाने संरक्षण द्यावे, अशी भूमिका अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी मांडली़ तसेच शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी गेलेल्या महिलांना झालेल्या मारहाणीचा पाटील यांनी निषेध केला़ पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील शनिशिंगणापूर, महालक्ष्मी मंदिर व इतर हिंदू देवस्थानांच्या ठिकाणी महिलांना प्रवेश देणे १९५६ सालच्या कायद्याने बंधनकारक आहे़ याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची व कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे़ स्थानिक जिल्हा प्रशासनाने योग्य भूमिका घेणे गरजेचे आहे़ अंनिसतर्फे डिसेंबर २००० मध्ये मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यामध्ये महाराष्ट्र शासन, धर्मादाय आयुक्त, शनिशिंगणापूर देवस्थान व महालक्ष्मी देवस्थान यांना प्रतिवादी करण्यात आले होते़ न्यायालयाने त्यांचे मत मागून घेतले, परंतु नंतरच्या कालावधीत सदर याचिकेची होऊ शकली नाही़ भूमाता ब्रिगेडच्यावतीने शनिच्या चौथऱ्यावर प्रवेश करण्याचे प्रयत्न सुरू झाले़ त्याला स्थानिकासह विश्वस्तांनी विरोध केला़ जिल्हा प्रशासनाचेही त्यांचेच समर्थन केल्याने त्याविरोधात अंनिसने ७ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर राज्यव्यापी धरणे आंदोलन केले़ यावेळी दिलेल्या निवेदनाला नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी उत्तर दिले नाही़ न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे मात्र, अंनिसने गेली अठरा वर्षे केलेल्या संघर्षाला यश आले आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी आता स्थानिक प्रशासन आणि राज्य शासनाची असल्याचे पाटील म्हणाले़ यावेळी कॉ़ बाबा आरगडे, अंनिसच्या जिल्हा कार्याध्यक्षा रंजना गवांदे, अर्जुन हरेल, महेश धनवटे, डॉ़ प्रकाश गरुड आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)